AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

29 धावात पाच विकेट, कार्तिक-पंतने 5 धावा पण नाही केल्या, दक्षिण आफ्रिकेला भिडण्याआधी वायजॅगमध्ये टीम इंडियाचा पराभव

टीम इंडिया (Team India) सध्या विशाखापट्टनम (vizag) येथे आहे. आज दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसरा टी 20 सामना (IND vs SA 3 rd T 20) आहे. भारतीय संघासाठी हा सामना 'करो या मरो' आहे.

29 धावात पाच विकेट, कार्तिक-पंतने 5 धावा पण नाही केल्या, दक्षिण आफ्रिकेला भिडण्याआधी वायजॅगमध्ये टीम इंडियाचा पराभव
Dinesh Karthik-Rishabh Pant Image Credit source: twitter
| Updated on: Jun 14, 2022 | 11:57 AM
Share

मुंबई: टीम इंडिया (Team India) सध्या विशाखापट्टनम (vizag) येथे आहे. आज दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसरा टी 20 सामना (IND vs SA 3 rd T 20) आहे. भारतीय संघासाठी हा सामना ‘करो या मरो’ आहे. कारण पहिले दोन सामने दक्षिण आफ्रिकेने जिंकले आहेत. आजची मॅचही ते जिंकले, तर मालिकेत विजयी आघाडी घेतील. त्यामुळे काहीही करुन भारताला आजचा सामना जिंकावाच लागेल. याआधी वायजॅग मध्ये झालेल्या सामन्यात टीम इंडियाला अनुकूल निकाल लागला नव्हता. भारताचा पराभव झाला होता. याआधी विशाखापट्टनम मध्ये खेळल्या गेलेल्या टी 20 सामन्यात भारताचा पराभव झाला होता. हा सामना तीन वर्षांपूर्वी 2019 साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध झाला होता. ऑस्ट्रेलियाने 3 विकेटने भारताला नमवलं होतं. पाच टी 20 सामन्यांच्या मालिकेतील आज तिसरा सामना आहे. या स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेचा हा दुसरा सामना आहे.

2019 च्या सामन्यात काय झालं होतं?

सध्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खराब कामगिरी करणाऱ्या टीम इंडियाला विशाखापट्टनममध्येही चांगली कामगिरी करता आली नव्हती. ऑस्ट्रेलिया विरुद्ध 2019 मध्ये ते इथे शेवटचा टी 20 सामना खेळले होते. खूप कमी धावसंख्या त्या सामन्यात झाली होती. भारताचा 3 विकेटने पराभव झाला होता. प्रथम फलंदाजी करताना भारताने निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 7 विकेट गमावून 126 धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाने 7 विकेट गमावून हे लक्ष्य पार केलं होतं.

सध्याच्या संघातील फक्त दोन खेळाडू त्या टीममध्ये होते

वायजॅगमधील मागच्या सामन्यात भारतीय फलंदाजांनी अत्यंत सुमार कामगिरी केली होती. फक्त 29 धावात पाच विकेट गेल्या होत्या. 80 ते 109 धावांदरम्यान 10 ते 17 ओव्हर्समध्ये या विकेट गेल्या होत्या. सध्याच्या संघातील ऋषभ पंत आणि दिनेश कार्तिकच त्या टीममध्ये होते. ऋषभ पंत आणि दिनेश कार्तिक दोघांनी पाच धावाही स्कोर बोर्डवर लावल्या नव्हत्या. पंतने फक्त 3 धावा आणि कार्तिकने 1 रन्स केला होता.

श्रीलंकेची टीम 82 रन्समध्ये ऑलआऊट

याआधी 2016 मध्ये भारतीय संघ वायजॅगमध्ये टी 20 सामना खेळला होता. तो सुद्धा लो स्कोरिंग सामना होता. श्रीलंकेचा संघ 82 धावात ऑलआऊट झाला होता. भारताने 9 विकेटने सामना जिंकला होता.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.