AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SL, 2nd ODI : टीम इंडिया कोलकातात सीरिज जिंकणार? कशी असेल प्लेइंग इलेव्हन?

2nd ODI, IND v SL : टीम इंडियाला दुसरा सामना जिंकून मालिकाही जिंकण्याची संधी आहे. तर श्रीलंकासाठी 'करो या मरो'चा सामना आहे.

IND vs SL, 2nd ODI : टीम इंडिया कोलकातात सीरिज जिंकणार? कशी असेल प्लेइंग इलेव्हन?
| Updated on: Jan 11, 2023 | 11:46 PM
Share

IND vs SL, 2nd ODI : टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका (IND vs SL) यांच्यात गुरुवारी 12 जानेवारीला कोलकातामधील इडन गार्डनमध्ये (Eden Garden) दुसरा एकदिवसीय(2nd ODI) सामना खेळवण्यात येणार आहे. या सामन्याला दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. हा सामना मालिकेच्या दृष्टीने निर्णायक असणार आहे. टीम इंडियाला दुसरा सामना जिंकून मालिकाही जिंकण्याची संधी आहे. तर श्रीलंकासाठी ‘करो या मरो’चा सामना आहे. त्यामुळे या सामन्यात दोन्ही संघात चांगलीच झुंज पहायला मिळण्याची शक्यता आहे. (ind vs sl 2nd odi match preview team india playing eleven head to head against sri lanka at eden garden kolkata)

आकडेवारी कुणाच्या बाजूने?

दोन्ही संघात आतापर्यंत 163 सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये टीम इंडिया श्रीलंकावर वरचढ आहे. टीम इंडियाने 163 पैकी 94 सामन्यात श्रीलंकावर विजय मिळवला आहे. तर श्रीलंकेने टीम इंडियाचा 57 मॅचमध्ये पराभव केलाय. 11 सामने अनिर्णित राहिले आहेत. तर 1 सामना बरोबरीत सुटला आहे.

कशी असणार प्लेइंग इलेव्हन?

साधारणपणे विजयी संघातील प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल केला जात नाही. पहिल्या सामन्यात शुबमन गिलसाठी द्विशतकवीर इशान किशनला बाहेर बसवण्यात आलं होतं. तर सूर्यकुमार यादवऐवजी श्रेयस अय्यरला संधी देण्यात आली होती. या निर्णयामुळे टीम मॅनेजमेंट आणि कॅप्टन रोहित शर्मावर सडकून टीका करण्यात आली होती. मात्र आता दुसऱ्या सामन्यात रोहित आहे तीच प्लेइंग इलेव्हन कायम ठेवणार की इशान आणि सूर्यकुमारला संधी देणार, हे ही पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे.

वनडे सीरिजसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कॅप्टन), हार्दिक पंड्या (उप-कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, केएल राहुल, ईशान किशन, वॉशिंगटन सुंदर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक आणि अर्शदीप सिंह.

टीम श्रीलंका : दसुन शनाका (कर्णधार), कुशल मेंडिस (उपकर्णधार), पथुम निशांका, अविश्का फर्नांडो, सदीरा समरविक्रमे, चरिथ असालंका, धनंजय डि सिल्वा, आशेन बांद्रा, महीष तिक्षाणा, जेफरी वेंडरसे, चमिका करुणारत्ने, दिलशान मधुशंका, कसुन रजिथा, नुवांदु फर्नांडो, दुनिथ वेल्लागे, प्रमोद मुधशन आणि लाहिरु कुमारा.

Follow Us
सुपरस्टारसारखं स्वागत, मग राजीनामा का घेतला?
Priyanka Gandhi | सुपरस्टारसारखं स्वागत, मग राजीनामा का घेतला? धर्मेंद्र प्रधानांवरून प्रियांका गांधींचा सरकारवर जोरदार हल्लाबोल
कोणत्याही चौकशीला समोर जाण्याचं सांगून अ‍ॅकेडमीचा संचालक नॉट रिचेबल,
MPSC Paper Case | कोणत्याही चौकशीला समोर जाण्याचं सांगून अ‍ॅकेडमीचा संचालक नॉट रिचेबल, सकाळपासूनच... हे काय घडलं?
MHT-CET घोटाळ्यावर CET सेलचं मोठं स्पष्टीकरण; सोशल मीडियावरील दावे...
MHT-CET घोटाळ्यावर CET सेलचं मोठं स्पष्टीकरण; सोशल मीडियावरील दावे दिशाभूल करणारे, म्हणत केला मोठा खुलासा
एकच खळबळ! भाजप नगरसेवकाच्या मुलांचे मार्क थेट...
MHT-CET Paper Case | एकच खळबळ! भाजप नगरसेवकाच्या मुलांचे मार्क थेट... काँग्रेस नेत्याचा धक्कादायक दावा
13 लाखांत चांगले मार्क मिळवून देतो, नामांकित कॉलेजमध्ये... सीईटी...
CET Exam Scam | 13 लाखांत चांगले मार्क मिळवून देतो, नामांकित कॉलेजमध्ये... सीईटी परीक्षेबाबत पालकांच्या व्हायरल ऑडिओ क्लिपने खळबळ
पंतप्रधानांसोबत भेटीच्या दुसऱ्याच दिवशी मोठं घडलं; डाव फिरला अन्...
पंतप्रधानांसोबत भेटीच्या दुसऱ्याच दिवशी मोठं घडलं; डाव फिरला अन्...  प्रफुल पेटल आणि शरद पवार भेटीची इनसाइड स्टोरी
बारावीत 35%... MHT-CET मध्ये 100 पर्सेंटाईल? महाराष्ट्रात...
CET Exam Scam | बारावीत 35%... MHT-CET मध्ये 100 पर्सेंटाईल? महाराष्ट्रात महाघोटाळ्याच्या आरोपांनी खळबळ!
अजित पवारांसोबतचा जूना फोटो, खास कॅप्शन; सुप्रिया सुळेंची भावनिक पोस्ट
अजित पवारांसोबतचा जूना फोटो, खास कॅप्शन; सुप्रिया सुळेंची भावनिक पोस्ट चर्चेत
जय शिवाजी, जय महाराष्ट्र म्हणणारा जंतर-मंतरचा इरफान आहे तरी कोण?
CJP Protest | जय शिवाजी, जय महाराष्ट्र म्हणणारा जंतर-मंतरचा इरफान आहे तरी कोण? जाणून घ्या संपूर्ण कहाणी
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अचानक मोठा निर्णय, सर्व मंत्र्यांना बोलवल
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अचानक मोठा निर्णय, सर्व मंत्र्यांना बोलवलं अन् दीड वर्षाचा... काय घडलं?