AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पंचाचा निर्णय बदलण्यासाठी रोहित शर्माने केली अशी खेळी, रिव्ह्यू गमावला तरी झाला असा फायदा

भारत आणि श्रीलंका यांच्यात दुसरा वनडे सामना सुरु आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक गमावली आणि प्रथम गोलंदाजी करावी लागली. अपेक्षेप्रमाणे श्रीलंकेने 50 षटकात 8 गडी गमवून 240 धावा केल्या आणि विजयासाठी 241 धावा दिल्या. पहिल्या सामन्यात एका धावेने सामना बरोबरीत सुटला होता. पण यावेळी रोहित शर्माने ती एक धाव वाचवली. कशी ते जाणून घ्या

पंचाचा निर्णय बदलण्यासाठी रोहित शर्माने केली अशी खेळी, रिव्ह्यू गमावला तरी झाला असा फायदा
Image Credit source: PTI
| Updated on: Aug 04, 2024 | 7:46 PM
Share

भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा वनडे सामना कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियममध्ये सुरु आहे. या सामन्यात श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 8 गडी गमवून 240 धावा केल्या आणि 241 धावांचं आव्हान दिलं. कदाचित रोहित शर्माने डोकं लावलं नसतं तर हे आव्हान 242 असू शकलं असतं. आता एका धावेने काय फरक पडतो असं तुम्हाला वाटत असेल तर पहिला सामना डोळ्यासमोर आणा. फक्त एका धावेमुळे हा सामना बरोबरीत सुटला होता. त्यामुळे रोहित शर्मासारखा अनुभवी कर्णधार मैदानात असेल तर तो उगाच एक धाव जाऊ देईल का? त्यामुळे रोहित शर्माच्या खेळीचं सर्वत्र कौतुक होत आहे. त्याच्या एका अपीलने पंचांना निर्णय बदलण्यास भाग पाडलं. नेमकं काय झालं? ते समजून घ्या. श्रीलंकेचा डाव सुरु असताना शेवटचं षटक कर्णधार रोहित शर्माने अर्शदीप सिंगच्या हाती सोपवलं.

अर्शदीपच्या पहिल्या चेंडूवर कामिंदु मेंडिसने 1 धाव घेतली. दुसऱ्या चेंडूवर धनंजयाने 1 धाव घेतली. तिसऱ्या चेंडूवर कामिंदुने चौकार मारला. चौथा चेंडू पंचांनी वाइट घोषित केला. पण इथेच रोहित शर्माने आपल्या डोक्याचा वापर केला. खरं तर चेंडू लेग साईडने फलंदाजाला किंचितसा घासून गेला होता. पंचांना हा आवाज आला नाही. त्यामुळे त्यांनी वाइड दिला. पण रोहित शर्माला हा आवाज आला होता. क्षणाचाही विलंब न करता रोहित शर्माने एलबीडब्ल्यूसाठी अपील केलं. त्यानंतर लगेचच रिव्ह्यू घेतला. त्यात चेंडू ग्लव्हजला घासून गेल्याचं दिसलं. तेव्हा तिसऱ्या पंचांनी वाइड मागे घेण्यास फिल्डवरच्या पंचांना सांगितलं. त्यामुळे रिव्ह्यू वाया गेला पण एक धाव वाचली.

आयपीएलप्रमाणे आंतरराष्ट्रीय सामन्यात वाइडसाठी रिव्ह्यू घेता येत नाही. त्यामुळे एलबीडब्ल्यूचं अपील केलं. तसं पण शेवटचं षटक असल्याने रिव्ह्यू ठेवून तरी काय करणार? असाही प्रश्न होता. त्यामुळे रोहित शर्माचा रिव्ह्यू नेमका कशासाठी आहे हे इतर खेळाडूंना माहिती होतं. त्यामुळे रोहित शर्माने एक धाव वाचवण्यासाठी रिव्ह्यू गमावणं योग्य असल्याचं जाणलं. त्याच्या या निर्णयाचं भारतीय क्रीडाप्रेमी कौतुक करत आहे. एक धाव किती महत्त्वाची असते याची जाणीव पहिल्या सामन्यात झाली आहे.

Follow Us
सर्वोच्च न्यायालयाची NTA ला पेपरफुटीप्रकरणी कडक ताकीद, उपाययोजनांची तप
सर्वोच्च न्यायालयाची NTA ला वरंवार पेपरफुटीप्रकरणी कडक ताकीद, उपाययोजनांची तपासणी
दिशा सालियान प्रकरण अपघात म्हणून मिटलं तरी... संजय राऊतांचां दावा
दिशा सालियान प्रकरण अपघात म्हणून मिटलं तरी... संजय राऊतांच्या मोठ्या दाव्याने खळबळ
गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांचं मोठं विधान, दोन मंत्री...
गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांचं मोठं विधान, दोन मंत्र्यांना तातडीचे आदेश
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी सतीश सालियान...
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी सतीश सालियान थेट वकीलांसह 'मातोश्री'ला जाणार
ममता बॅनर्जींच्या पाठिंब्यानंतर काँग्रेस उमेदवाराला अटक, बंगाल...
ममता बॅनर्जींच्या पाठिंब्यानंतर काँग्रेस उमेदवाराला अटक, नेमकं प्रकरण काय?
विविध ठिकाणी व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध, तीव्र आंदोलनाचा इशारा
विविध ठिकाणी व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध, तीव्र आंदोलनाचा इशारा
निवडणूक आयोगाने TMC चं चिन्ह गोठवताच, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय थेट
निवडणूक आयोगाने TMC चं चिन्ह गोठताच, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय थेट.... बंगालमध्ये राजकीय हालाचाली वाढल्या?
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड