AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asia Cup : उपांत्य फेरीत भारताने श्रीलंकेला 8 गडी राखून केलं पराभूत, वैभव-आयुषकडून निराशा

अंडर 19 आशिया कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारत आणि श्रीलंका हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात भारताने श्रीलंकेचा 8 गडी राखून धुव्वा उडवला आणि अंतिम फेरीत धडक मारली आहे. आता अंतिम फेरीत पाकिस्तानशी लढत होणार आहे.

Asia Cup : उपांत्य फेरीत भारताने श्रीलंकेला 8 गडी राखून केलं पराभूत, वैभव-आयुषकडून निराशा
Asia Cup : उपांत्य फेरीत भारताने श्रीलंकेला गडी राखून केलं पराभूत, वैभव-आयुषकडून निराशाImage Credit source: ACC Twitter
| Updated on: Dec 19, 2025 | 6:40 PM
Share

अंडर 19 आशिया कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारत विरुद्ध श्रीलंका सामना पार पडला. या सामन्यात नाणेफेकीचा कौल टीम इंडियाच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. पावसामुळे खेळपट्टी ओली झाल्याने हा सामना 20 षटकांचा करण्यात आला होता. श्रीलंकेने 20 षटकात 8 गडी गमवून 138 धावा केल्या आणि विजयासाठी 139 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान भारताने 18 षटकात गडी गमवून पूर्ण केलं. या विजयासह भारताने अंतिम फेरीत धडक मारली आहे. आता अंतिम फेरीत भारताचा सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानशी होणार आहे. पाकिस्तानने दुसऱ्या उपांत्य फेरीत बांगलादेशला 8 गडी राखून पराभूत केलं. त्यामुळे अंतिम फेरीत भारत पाकिस्तान हा हायव्होल्टेज सामना पाहता येणार आहे.

श्रीलंकेने विजयासाठी दिलेल्या 139 धावांचा पाठलाग करताना भारताची सुरुवात काही चांगली झाली नाही. दुसर्‍या षटकातच टीम इंडियाला कर्णधार आयुष म्हात्रेच्या रुपाने धक्का बसला. त्याने 8 चेंडूत 1 षटकार मारत आणि 7 धावा करून बाद झाला. त्यामुळे वैभव सूर्यवंशीकडून चांगल्या खेळीची अपेक्षा होती. मात्र उपांत्य फेरीत वैभवदेखील फेल गेला. त्याने 6 चेंडूत 2 चौकार मारत 9 धावा केल्या आणि तंबूत परतला. दोन विकेट झटपट गेल्यानंतर टीम इंडियावर दडपण वाढलं होतं. रसिथ निमसाराने भेदक गोलंदाजी केली. पण एरोन जॉर्ज आणि विहान मल्होत्रा यांनी डाव सावरला आणि टीम इंडियाला विजयाची चव चाखून दिली.

विहान मल्होत्राने 35 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. तर अरोन जॉर्जनेही 42 चेंडूत 50 धावा केल्या आणि संघाच्या विजयात मोलाची साथ दिली. विहान मल्होत्राने नाबाद 61 धावा, तर अरोन जॉर्जने नाबाद 58 धावांची खेळी केली. या दोघांच्या शतकी भागीदारीमुळे टीम इंडियाला विजय मिळाला. श्रीलंकेकडून कर्णधार विमथ दिनसारा याने 32, चमिका हीनाटीगालाने याने 42 आणि सेठमिका सेनेविरत्ने याने 30 धावांची खेळी केली. या व्यतिरिक्त एकही फलंदाज मोठी धावसंख्या करून शकलं नाही. भारताकडून हेनिल पटेल आणि कनिष्क चौहान यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. तर किशन कुमार सिंग, दीपेश देवेंद्रन आणि खिलन पटेल यांनी प्रत्येकी एक विकेट काढली.

Follow Us
लातूरमध्ये अवकाळीचा मोठा फटका, वादळी वाऱ्यासह गारपीठमुळे मोठं नुकसान
लातूरमध्ये अवकाळीचा मोठा फटका, वादळी वाऱ्यासह गारपीठमुळे मोठं नुकसान.
महिलेची तक्रार येताच कोर्टाने विचारलं... भोंदू खरातने हातच जोडले
महिलेची तक्रार येताच कोर्टाने विचारलं... भोंदू खरातने हातच जोडले.
प्रफुल पटेलांच्या प्रश्नावर सुनेत्रा पवारांचा नकार; निवडणूक आयोगाला...
प्रफुल पटेलांच्या प्रश्नावर सुनेत्रा पवारांचा नकार; निवडणूक आयोगाला....
भोंदू अशोक खरातला कोर्टात व्हीसीद्वारे हजर करणार, कारण...
भोंदू अशोक खरातला कोर्टात व्हीसीद्वारे हजर करणार, कारण....
सोलापुरात महापुरुषांच्या पुतळ्यावरून वाद; पोलीस आणि आंदोलकांमध्ये तणाव
सोलापुरात महापुरुषांच्या पुतळ्यावरून वाद; पोलीस आणि आंदोलकांमध्ये तणाव.
राज्यभरात हनुमान जयंतीचा उत्साह, अंजनेरी मंदिरात भाविकांची गर्दी
राज्यभरात हनुमान जयंतीचा उत्साह, अंजनेरी मंदिरात भाविकांची गर्दी.
हा आयोग चोर आहे... राऊतांची निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयावर टीका
हा आयोग चोर आहे... राऊतांची निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयावर टीका.
अजितदादाच्या राष्ट्रवादीत मोठा भूकंप होणार? किती आमदार फुटणार?
अजितदादाच्या राष्ट्रवादीत मोठा भूकंप होणार? किती आमदार फुटणार?.
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर सुनील तटकरे यांचा यू-टर्न
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर सुनील तटकरे यांचा यू-टर्न.
अजब-गजब ऐतिहासिक दावे जैन मुनीच्याच अंगलट; जैन समाजातूनच तीव्र विरोध
अजब-गजब ऐतिहासिक दावे जैन मुनीच्याच अंगलट; जैन समाजातूनच तीव्र विरोध.