AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asia Cup : उपांत्य फेरीत भारताने श्रीलंकेला 8 गडी राखून केलं पराभूत, वैभव-आयुषकडून निराशा

अंडर 19 आशिया कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारत आणि श्रीलंका हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात भारताने श्रीलंकेचा 8 गडी राखून धुव्वा उडवला आणि अंतिम फेरीत धडक मारली आहे. आता अंतिम फेरीत पाकिस्तानशी लढत होणार आहे.

Asia Cup : उपांत्य फेरीत भारताने श्रीलंकेला 8 गडी राखून केलं पराभूत, वैभव-आयुषकडून निराशा
Asia Cup : उपांत्य फेरीत भारताने श्रीलंकेला गडी राखून केलं पराभूत, वैभव-आयुषकडून निराशाImage Credit source: ACC Twitter
| Updated on: Dec 19, 2025 | 6:40 PM
Share

अंडर 19 आशिया कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारत विरुद्ध श्रीलंका सामना पार पडला. या सामन्यात नाणेफेकीचा कौल टीम इंडियाच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. पावसामुळे खेळपट्टी ओली झाल्याने हा सामना 20 षटकांचा करण्यात आला होता. श्रीलंकेने 20 षटकात 8 गडी गमवून 138 धावा केल्या आणि विजयासाठी 139 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान भारताने 18 षटकात गडी गमवून पूर्ण केलं. या विजयासह भारताने अंतिम फेरीत धडक मारली आहे. आता अंतिम फेरीत भारताचा सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानशी होणार आहे. पाकिस्तानने दुसऱ्या उपांत्य फेरीत बांगलादेशला 8 गडी राखून पराभूत केलं. त्यामुळे अंतिम फेरीत भारत पाकिस्तान हा हायव्होल्टेज सामना पाहता येणार आहे.

श्रीलंकेने विजयासाठी दिलेल्या 139 धावांचा पाठलाग करताना भारताची सुरुवात काही चांगली झाली नाही. दुसर्‍या षटकातच टीम इंडियाला कर्णधार आयुष म्हात्रेच्या रुपाने धक्का बसला. त्याने 8 चेंडूत 1 षटकार मारत आणि 7 धावा करून बाद झाला. त्यामुळे वैभव सूर्यवंशीकडून चांगल्या खेळीची अपेक्षा होती. मात्र उपांत्य फेरीत वैभवदेखील फेल गेला. त्याने 6 चेंडूत 2 चौकार मारत 9 धावा केल्या आणि तंबूत परतला. दोन विकेट झटपट गेल्यानंतर टीम इंडियावर दडपण वाढलं होतं. रसिथ निमसाराने भेदक गोलंदाजी केली. पण एरोन जॉर्ज आणि विहान मल्होत्रा यांनी डाव सावरला आणि टीम इंडियाला विजयाची चव चाखून दिली.

विहान मल्होत्राने 35 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. तर अरोन जॉर्जनेही 42 चेंडूत 50 धावा केल्या आणि संघाच्या विजयात मोलाची साथ दिली. विहान मल्होत्राने नाबाद 61 धावा, तर अरोन जॉर्जने नाबाद 58 धावांची खेळी केली. या दोघांच्या शतकी भागीदारीमुळे टीम इंडियाला विजय मिळाला. श्रीलंकेकडून कर्णधार विमथ दिनसारा याने 32, चमिका हीनाटीगालाने याने 42 आणि सेठमिका सेनेविरत्ने याने 30 धावांची खेळी केली. या व्यतिरिक्त एकही फलंदाज मोठी धावसंख्या करून शकलं नाही. भारताकडून हेनिल पटेल आणि कनिष्क चौहान यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. तर किशन कुमार सिंग, दीपेश देवेंद्रन आणि खिलन पटेल यांनी प्रत्येकी एक विकेट काढली.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.