AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asia Cup : उपांत्य फेरीत भारताने श्रीलंकेला 8 गडी राखून केलं पराभूत, वैभव-आयुषकडून निराशा

अंडर 19 आशिया कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारत आणि श्रीलंका हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात भारताने श्रीलंकेचा 8 गडी राखून धुव्वा उडवला आणि अंतिम फेरीत धडक मारली आहे. आता अंतिम फेरीत पाकिस्तानशी लढत होणार आहे.

Asia Cup : उपांत्य फेरीत भारताने श्रीलंकेला 8 गडी राखून केलं पराभूत, वैभव-आयुषकडून निराशा
Asia Cup : उपांत्य फेरीत भारताने श्रीलंकेला गडी राखून केलं पराभूत, वैभव-आयुषकडून निराशाImage Credit source: ACC Twitter
| Updated on: Dec 19, 2025 | 6:40 PM
Share

अंडर 19 आशिया कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारत विरुद्ध श्रीलंका सामना पार पडला. या सामन्यात नाणेफेकीचा कौल टीम इंडियाच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. पावसामुळे खेळपट्टी ओली झाल्याने हा सामना 20 षटकांचा करण्यात आला होता. श्रीलंकेने 20 षटकात 8 गडी गमवून 138 धावा केल्या आणि विजयासाठी 139 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान भारताने 18 षटकात गडी गमवून पूर्ण केलं. या विजयासह भारताने अंतिम फेरीत धडक मारली आहे. आता अंतिम फेरीत भारताचा सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानशी होणार आहे. पाकिस्तानने दुसऱ्या उपांत्य फेरीत बांगलादेशला 8 गडी राखून पराभूत केलं. त्यामुळे अंतिम फेरीत भारत पाकिस्तान हा हायव्होल्टेज सामना पाहता येणार आहे.

श्रीलंकेने विजयासाठी दिलेल्या 139 धावांचा पाठलाग करताना भारताची सुरुवात काही चांगली झाली नाही. दुसर्‍या षटकातच टीम इंडियाला कर्णधार आयुष म्हात्रेच्या रुपाने धक्का बसला. त्याने 8 चेंडूत 1 षटकार मारत आणि 7 धावा करून बाद झाला. त्यामुळे वैभव सूर्यवंशीकडून चांगल्या खेळीची अपेक्षा होती. मात्र उपांत्य फेरीत वैभवदेखील फेल गेला. त्याने 6 चेंडूत 2 चौकार मारत 9 धावा केल्या आणि तंबूत परतला. दोन विकेट झटपट गेल्यानंतर टीम इंडियावर दडपण वाढलं होतं. रसिथ निमसाराने भेदक गोलंदाजी केली. पण एरोन जॉर्ज आणि विहान मल्होत्रा यांनी डाव सावरला आणि टीम इंडियाला विजयाची चव चाखून दिली.

विहान मल्होत्राने 35 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. तर अरोन जॉर्जनेही 42 चेंडूत 50 धावा केल्या आणि संघाच्या विजयात मोलाची साथ दिली. विहान मल्होत्राने नाबाद 61 धावा, तर अरोन जॉर्जने नाबाद 58 धावांची खेळी केली. या दोघांच्या शतकी भागीदारीमुळे टीम इंडियाला विजय मिळाला. श्रीलंकेकडून कर्णधार विमथ दिनसारा याने 32, चमिका हीनाटीगालाने याने 42 आणि सेठमिका सेनेविरत्ने याने 30 धावांची खेळी केली. या व्यतिरिक्त एकही फलंदाज मोठी धावसंख्या करून शकलं नाही. भारताकडून हेनिल पटेल आणि कनिष्क चौहान यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. तर किशन कुमार सिंग, दीपेश देवेंद्रन आणि खिलन पटेल यांनी प्रत्येकी एक विकेट काढली.

Follow Us
पंतप्रधानांच्या नेदरलँड दौऱ्यात 17 करारांवर स्वाक्षऱ्या, सामान्यांना..
पंतप्रधानांच्या नेदरलँड दौऱ्यात 17 करारांवर स्वाक्षऱ्या, सामान्यांना...
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती संस्थानला अ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती संस्थानला अ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा.
मोदींना लिहिलेल्या पत्रावरून खोत- पडळकरांचा पवारांना खोचक टोला
मोदींना लिहिलेल्या पत्रावरून खोत- पडळकरांचा पवारांना खोचक टोला.
मोठी बातमी! डॉलरच्या तुलनेत रुपया ऐतिहासिक निच्चांकीवर, धक्कादायक आकडे
मोठी बातमी! डॉलरच्या तुलनेत रुपया ऐतिहासिक निच्चांकीवर, धक्कादायक आकडे.
पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड, नंतर 15...असह्य वेदनेने महिला ओरडत राहिली,
पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड, नंतर 15...असह्य वेदनेने महिला ओरडत राहिली,.
मोठी बातमी! दोन दिवस कसून चौकशी, रात्रभर प्रश्नांचा मारा...अखेर
मोठी बातमी! दोन दिवस कसून चौकशी, रात्रभर प्रश्नांचा मारा...अखेर.
मुख्यमंत्र्यांच्या त्या वक्तव्यावर संजय राऊतांचं हटके उत्तर चर्चेत...
मुख्यमंत्र्यांच्या त्या वक्तव्यावर संजय राऊतांचं हटके उत्तर चर्चेत....
पेपरफुटीपासून आत्महत्यांपर्यंत….भाजपच जबाबदार, राऊतांचे गंभीर आरोप
पेपरफुटीपासून आत्महत्यांपर्यंत….भाजपच जबाबदार, राऊतांचे गंभीर आरोप.
गटातटांनी राष्ट्रवादीला पोखरलं... थेट सुनेत्रा पवार मैदानात उतरणार...
गटातटांनी राष्ट्रवादीला पोखरलं... थेट सुनेत्रा पवार मैदानात उतरणार....
ठो ठो आवाज आला... एकदा नव्हे दोनदा... नागपूरमधल्या गजबजलेल्या भागात...
ठो ठो आवाज आला... एकदा नव्हे दोनदा... नागपूरमधल्या गजबजलेल्या भागात....