नादच करायचा नाय, सूर्यासेनेकडून विंडीजचा 10 वर्षांनंतर हिशोब चुकता, 2016 साली काय झालेलं?
India vs West Indies T20i World Cup 2026 : टीम इंडियाला वेस्ट इंडिजचा हिशोब करण्यासाठी 1 दशकाची प्रतिक्षा करावी लागली. मात्र भारताने या विंडीजचा करेक्ट कार्यक्रम करत स्पर्धेतून यशस्वीरित्या बाजार उठवलाय.

Sanju Suryakumar India vs West Indies T20i Wc 2026Image Credit source: Icc X Account and Bcci
टीम इंडियाने रविवारी 1 मार्च रोजी आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेच्या उपांत्य फेरीचं तिकीट मिळवलं. टीम इंडियाने 2 वेळा वर्ल्ड कप जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजला पराभवाचा झटका देत सेमी फायनलमध्ये धडक दिली. टीम इंडियाची सेमी फायनलमध्ये पोहचण्याची ही सलग तिसरी तर एकूण सहावा वेळ ठरली. तर टीम इंडिया विरूद्धच्या पराभवामुळे वेस्ट इंडिजचं स्पर्धेतून बाजार उठला. टीम इंडियासाठी हा विजय फार खास ठरला. टीम इंडियाने या विजयासह वेस्ट इंडिजचा टप्प्यात कार्यक्रम करत एक जुना हिशोब चुकता केला आहे. टीम इंडियाने नक्की काय केलं? हे जाणून घेऊयात.
Follow Us
