AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs WI : वेस्ट इंडिज दौऱ्यावर भारताला झटका, मालिकेतून 2 दिग्गज खेळाडू बाहेर

एकदिवसीय मालिकेतून बाहेर पडला आहे. त्याचवेळी केएल राहुलला कोरोना झाला असून तो टी-20 मालिकेतून बाहेर पडला आहे. आता अशा खेळाडूंच्या गळतीमुळे टीम इंडियाची डोकेदुखी चांगलीच वाढली आहे.

IND vs WI : वेस्ट इंडिज दौऱ्यावर भारताला झटका, मालिकेतून 2 दिग्गज खेळाडू बाहेर
Asia Cup 2022 : आजच्या सामन्यात भारताला करो या मरो स्थिती, आव्हान टिकवण्यासाठी विजय महत्त्वाचाImage Credit source: tv9
| Updated on: Jul 23, 2022 | 7:38 AM
Share

मुंबई : वेस्ट इंडिज (West Indies) दौऱ्यात भारताला (India) दोन मोठे झटके बसले आहेत. संघातील 2 स्टार खेळाडू संपूर्ण मालिकेतून बाहेर गेले आहेत. रोहित शर्मा (Rohit Sharma), विराट कोहली (Virat Kohli), जसप्रीत बुमराह यांच्याशिवाय वेस्ट इंडिजमध्ये येणाऱ्या भारतीय संघाला यापुढे रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि केएल राहुलची (KL rahul) साथ मिळणार नाही. खरे तर दोघेही संपूर्ण मालिकेतून बाहेर गेले आहेत. पोर्ट ऑफ स्पेनमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या वनडे सामन्यापूर्वी जडेजाला दुखापत झाली होती. त्याच्या उजव्या गुडघ्याला दुखापत झाली आहे. त्यामुळे तो एकदिवसीय मालिकेतून बाहेर पडला आहे. त्याचवेळी केएल राहुलला कोरोना झाला असून तो टी-20 मालिकेतून बाहेर पडला आहे. आता अशा खेळाडूंच्या गळतीमुळे टीम इंडियाची डोकेदुखी वाढली आहे.

दुखापतीनंतर कोरोना

केएल राहुलला कोरोना झाला असून तो टी-20 मालिकेतून बाहेर पडला आहे. तथापि, केएल राहुल वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेचा भाग नव्हता. त्याला या मालिकेतून विश्रांती देण्यात आली असली तरी टी-20 मालिकेतील तो महत्त्वाचा भाग होता. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील एकदिवसीय मालिकेनंतर 5 टी-20 सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे, जी 29 जुलैपासून सुरू होणार आहे. राहुल या आठवड्यात वेस्ट इंडिजला रवाना होणार होता, मात्र आता तो टी-20 मालिकेतून बाहेर पडल्याच्या बातम्या येत आहेत. वास्तविक, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 5 टी-20 सामन्यांची मालिका सुरू होण्यापूर्वी राहुल जखमी झाला होता. त्यानंतर तो शस्त्रक्रियेसाठी जर्मनीलाही गेला होता. राहुलने काही दिवस एनसीएमध्ये नेटमध्ये फलंदाजीचा सरावही केला होता, मात्र आता त्याच्या दुखापतीच्या बातमीने टीम इंडियाची डोकेदुखी वाढली आहे

जडेजा एकदिवसीय मालिकेतून बाहेर?

क्रिकबझच्या वृत्तानुसार, टी-20 विश्वचषक पाहता बीसीसीआयला धोका पत्करायचा नाही, त्यामुळे जडेजाला संपूर्ण वनडे मालिकेतून विश्रांती दिली जाऊ शकते. जेणेकरून त्याच्या डाव्या गुडघ्याची दुखापत आणखी वाढू नये. संपूर्ण एकदिवसीय मालिकेसाठी जडेजाला विश्रांती दिल्यास तो 29 जुलैपासून वेस्ट इंडिजविरुद्धच्या पाच टी-20 मालिकेसाठी तंदुरुस्त होऊ शकतो.

दरम्यान, बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी खुलासा केला आहे की राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये पुनर्वसन पूर्ण करत असलेल्या केएल राहुलची चाचणी सकारात्मक आली आहे आणि तो वेस्ट इंडिजविरुद्धच्या पाच T20 मालिकेत भाग घेण्याची शक्यता नाही. केएल राहुलवर नुकतीच जर्मनीत हर्नियाची शस्त्रक्रिया झाली. फिटनेस मिळविण्यासाठी तो सध्या एनसीएमध्ये प्रशिक्षण घेत आहे.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.