AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND W vs BAN W : सामना बरोबरीत सुटल्यानंतरही सुपर ओव्हर का नाही? जाणून घ्या या मागचं कारण

IND W vs BAN W : भारत आणि बांगलादेश यांच्यातील तिसरा आणि निर्णायक एकदिवसीय सामना बरोबरीत सुटला. त्यामुळे मालिकेत 1-1 ने बरोबरी झाली. पण सुपर ओव्हर का केली नाही असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

IND W vs BAN W : सामना बरोबरीत सुटल्यानंतरही सुपर ओव्हर का नाही? जाणून घ्या या मागचं कारण
IND W vs BAN W : सामना टाय झाल्यानंतर क्रीडाप्रेमींना वाटलं की सुपर ओव्हर होईल, पण झालीच नाही कारण...
| Updated on: Jul 22, 2023 | 8:27 PM
Share

मुंबई : भारत आणि बांगलादेश वुमन्स संघात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका पार पडली. ही मालिक 1-1 ने बरोबरीत सुटल्याने जेतेपद वाटून देण्यात आलं आहे. पण शेवटचा आणि निर्णायक सामना बरोबरीत सुटूनही सुपर ओव्हर का केली नाही असा प्रश्न आता क्रीडाप्रेमी विचारत आहेत. बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना 4 गडी गमवून 225 धावा केल्या आणि विजयासाठी 226 धावांचं आव्हान दिलं. या धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाने सर्वगडी बाद 225 धावा केल्या त्यामुळे सामना बरोबरीत सुटला. त्यामुळे सामन्याचा निकाल सुपर ओव्हरने दिला जाईल असं वाटत होतं. मात्र तसं झालं नाही. त्या मागचं कारणही विचित्र आहे.

भारताला शेवटच्या षटकात विजयासाठी 3 धावांची आवश्यकता होती. तर बांगलादेशला विजयासाठी एका विकेटची गरज होती. शेवटच्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरच भारताला दोन धावा मिळाल्या. त्यामुळे सामना बरोबरीत आला आणि विजयासाठी फक्त एका धावेची आवश्यकता होती. पण तिसऱ्या चेंडूवर मेघना सिंह आऊट झाली आणि सामना बरोबरीत सुटला. क्रीडाप्रेमींना वाटलं आता सामन्याचा निकाल सुपर ओव्हरमधून केला जाईल, पण तसं केलं नाही.

सुपर ओव्हर न करण्यामागचं कारण काय?

सुपर ओव्हन न करण्यामागे विचित्र कारण पुढे आलं आहे. समालोचकाच्या मते सामन्याचं शेड्युल टाईम पूर्ण झालं होतं. त्यामुळे सुपर ओव्हर खेळली गेली नाही. कारण हा सामना उशिरापर्यंत चालला असं सांगण्यात येत आहे. दुसऱ्या डावात सामना पावसामुळे काही काळ थांबवण्यात आला होता. त्यामुळे वेळ वाया गेला. तसेच बांगलादेश 50 षटकं, तर भारताने 49.3 षटकं खेळली. पण वातावरण ढगाळ नसताना किंवा पाऊस नसताना असं का केलं असा प्रश्नही विचारला जात आहे.

बांगलादेशला झालं असतं नुकसान

सुपर ओव्हर खेळला गेला असता. या मैदानात आंतरराष्ट्रीय सामने खेळले जातात. त्यामुळे सर्वकाही व्यवस्थिती होतं. पण यामागे वेगळंच कारण असल्याचं बोललं जात आहे. हा सामना आयसीसी वुमन्स चॅम्पियनशिपचा भाग होता. यातून 2025 साली वुमन्स वर्ल्डकपसाठी क्वॉलिफाय होणार आहे. सुपर ओव्हर न झाल्याने दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळाला.

या सामन्याचा निकाल आला असता तर एका संघाचे दोन गुण झाले असते. पण हा सामना बांगलादेश हरला असता तर मात्र अडचण झाली असती. वुमन्स वर्ल्डकप भारतात असल्याने भारत क्वॉलिफाय आहे. पण बांगलादेशचं एक गुणामुळे नुकसान झालं आहेत.

Follow Us
आम्ही चिमटे नाही काढत थेट हल्ला करतो... भर मंचावर संजय राऊतांची सत्ताध
आम्ही चिमटे नाही काढत थेट हल्ला करतो... भर मंचावर संजय राऊतांची सत्ताधाऱ्यांवर बोरची टीका
ये डर अच्छा है! ऑपरेशन टायगरच्या चर्चेत वाघमारेंचा ठाकरे गटाला इशारा
ये डर अच्छा है! ऑपरेशन टायगरच्या चर्चेत ज्योती वाघमारेंचा ठाकरे गटाला थेट इशारा, संजय राऊतांवरही निशाणा
पाणी डोक्यावरून गेलंय... ठाकरे गटाची तातडीने बैठक अन् अंबादास दानवेंचं
पाणी डोक्यावरून गेलंय... ठाकरे गटाची तातडीने बैठक अन् अंबादास दानवेंचं विधान; राजकारणात मोठा भूकंप येणार?
प्रणित मोरे प्रकरण थेट संसदेत? शिंदेंच्या महिला खासदाराचा प्रचंड संताप
आता प्रणित मोरे प्रकरण थेट संसदेत? शिंदेंच्या महिला खासदाराचा प्रचंड संताप; लवकरच...
कर्जमाफीवरून सरकारने अखेर बैठक बोलवली, नेमकं काय घडतंय?
Dattatray Bharne | कर्जमाफीवरून सरकारने अखेर बैठक बोलवली, रोहित पवारांच्या उपोषणामुळे हालचाली वाढल्या, नेमकं काय घडतंय?
24 तासांतच चांदीचा मुकुट पुन्हा चोरला; तुळजाभवानी मंदिरातील धक्कादायक
24 तासांतच चांदीचा मुकुट पुन्हा चोरला; तुळजाभवानी मंदिरातील धक्कादायक CCTV फुटेज समोर!
अर्वाच्च भाषेतील ऑडीओ क्लिप व्हायरल; बड्या अधिकाऱ्यावर मोठी कारवाई,
अर्वाच्च भाषेतील ऑडीओ क्लिप व्हायरल; बड्या अधिकाऱ्यावर मोठी कारवाई,  ठाकरेंच्या नगरसेवकाला... नेमकं प्रकरण काय?
भाजप आमदाराच्या पत्नीच्या गाडीचा भीषण अपघात; डोक्याला अन्....
मोठी बातमी! भाजप आमदाराच्या पत्नीच्या गाडीचा भीषण अपघात; डोक्याला आणि पायाला दुखापत
40 वर्षांच्या अनुभवासह धीरज सेठ यांच्याकडे देशाच्या सुरक्षेची धुरा
Dhiraj Seth | भारतीय लष्कराला नवे सेनाप्रमुख! 40 वर्षांच्या अनुभवासह धीरज सेठ यांच्याकडे देशाच्या सुरक्षेची धुरा
अजितदादांप्रमाणेच एकनाथ शिंदेंचाही घातपात होणार? बड्या नेत्याच्या
अजितदादांप्रमाणेच एकनाथ शिंदेंचाही घातपात होणार? बड्या नेत्याच्या दाव्याने एकच खळबळ; नेमकं काय सांगितलं?