AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताची अंडर 19 आशिया कपमध्ये विजयाची हॅटट्रिक, मलेशियाला 315 धावांनी केलं पराभूत

अंडर 19 आशिया कप 2025 स्पर्धेत भारताची विजयी घोडदौड सुरुच आहे. भारताने साखळी फेरीतील तिन्ही सामने जिंकले असून उपांत्य फेरीत जागा पक्की केली आहे. साखळी फेरीच्या शेवटच्या सामन्यात मलेशियाला पराभूत केलं.

भारताची अंडर 19 आशिया कपमध्ये विजयाची हॅटट्रिक, मलेशियाला 315 धावांनी केलं पराभूत
भारताची अंडर 19 आशिया कपमध्ये विजयाची हॅटट्रिक, मलेशियाला 315 धावांनी केलं पराभूतImage Credit source: BCCI Twitter
| Updated on: Dec 16, 2025 | 6:42 PM
Share

अंडर 19 आशिया कप स्पर्धेत भारत आणि मलेशिया हे दोन संघ आमनेसामने आले होते. मलेशियाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय चुकीचा ठरलं असंच म्हणावं लागेल. कारण भारताने प्रथम फलंदाजी करताना 7 गडी गमवून 50 षटकात 408 धावा केल्या. तसेच विजयासाठी 409 धावांचं आव्हान दिलं. या धावांचा पाठलाग करताना मलेशियाचा डाव गडगडला आणि 93 धावांवरच ऑलआऊट झाला. हा सामना भारताने 315 धावांच्या फरकांनी जिंकली. भारताने स्पर्धेत विजयांची हॅटट्रिकच केली. इतकंच काय तर अंडर 19 क्रिकेटच्या इतिहासात एक मोठा विक्रमही प्रस्थापित केला. अंडर 19 आशिया कपच्या इतिहासात धावांच्या बाबतीत हा दुसरा सर्वात मोठा विजय आहे. या विजयाचा शिल्पकार ठरला तो अभिज्ञान कुंडू..

भारताचा डाव

भारताकडून आयुष म्हात्रे आणि वैभव सूर्यवंशी ही जोडी पहिल्यांदा मैदानात उतरली. आयुष म्हात्रे 14 धावांवर असताना बाद झाला. तर वैभव सूर्यवंशीने 26 चेंडूत 5 चौकार आणि 3 षटकार मारत 50 धावांची खेळी केली. तर वेदांत त्रिवेदीने 106 चेंडूत 90 धावा केल्या. या सामन्यात अभिज्ञान कुंडूचं वादळ घोंगावलं. त्याने 125 चेंडूत 17 चौकार आणि 9 षटकार मारत 167.20 च्या स्ट्राईक रेटने नाबाद 209 धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीमुळे भारताला 408 धावांपर्यंत मजल मारता आली. मलेशियाकडून मुहम्मद अक्रमने महागडी गोलंदाजी केली पण 5 विकेट घेतल्या. तर सथनकुमारन आणि जाश्विन कृष्णमूर्ती यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

मलेशियाचा डाव

भारताने विजयासाठी दिलेल्या धावांचा पाठलाग करताना मलेशियाचा डाव पत्त्यासारखा कोसळला. एकही फलंदाजी मोठी खेळी करू शकला नाही. हमजा पंग्गीने सर्वाधिक 35 धावा केल्या. तर तीन खेळाडूंना खातंही खोलता आलं नाही. भारताकडून दीपेश देवेंद्रनने 9 षटकात 21 धावा देत 5 विकेट काढल्या. तर उद्धव मोहनने 2, किशन कुमार सिंगने 1, खिलन पटेलने 1 आणि कनिष्क चौहानने 1 विकेट घेतली. भारताने उपांत्य फेरीत जागा पक्की केली आहे. तर मलेशियाचं आव्हान संपुष्टात आलं आहे. भारताचा उपांत्य फेरीचा सामना बांग्लादेश किंवा श्रीलंकेशी होईल.

Follow Us
सर्वात मोठी बातमी! या पक्षाच्या पाठिंब्यामुळे थलपती विजयचा सत्तास्थापन
सर्वात मोठी बातमी! या पक्षाच्या पाठिंब्यामुळे थलपती विजयचा सत्तास्थापन.
पंतप्रधान नरेंद्र मोदी जनते समोर नतमस्तक... शपथविधी सोहळ्यातील व्हिडीओ
पंतप्रधान नरेंद्र मोदी जनते समोर नतमस्तक... शपथविधी सोहळ्यातील व्हिडीओ.
मोठी बातमी! ठाकरेंवरील टीका भोवली; सदावर्तेंच्या गाडीवर मनसेकडून.....
मोठी बातमी! ठाकरेंवरील टीका भोवली; सदावर्तेंच्या गाडीवर मनसेकडून......
निदा खानला फरार असताना कोणी कोणी मदत केली? SIT कडून चौकशीला सुरुवात
निदा खानला फरार असताना कोणी कोणी मदत केली? SIT कडून चौकशीला सुरुवात.
निदा खान प्रकरणावर ओवैसींचे मोठे विधान, म्हणाले, तिच्यावरील आरोप...
निदा खान प्रकरणावर ओवैसींचे मोठे विधान, म्हणाले, तिच्यावरील आरोप....
राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संतापले, लवांडेंचा समर्थकांकाडून दुग्धाभिषेक
राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संतापले, लवांडेंचा समर्थकांकाडून दुग्धाभिषेक.
FIR दाखल होण्याआधीच निदाचं ट्रान्सफर अन्... एमआयएम नेते ओवेसी नेमकं
FIR दाखल होण्याआधीच निदाचं ट्रान्सफर अन्... एमआयएम नेते ओवेसी नेमकं.
संग्राम भंडारेंच्या गुंडांनी रिव्हॉल्व्हर दाखवत... विकास लवांडेंनी काळ
संग्राम भंडारेंच्या गुंडांनी रिव्हॉल्व्हर दाखवत... विकास लवांडेंनी काळ.
राज्यासमोर नवं संकट उभं? बँकेत पैशांचा पुरवठा कमी... 'कॅश' टंचाईमुळे
राज्यासमोर नवं संकट उभं? बँकेत पैशांचा पुरवठा कमी... 'कॅश' टंचाईमुळे.
काळ आला होता पण वेळ आली नव्हती;रेल्वे समोर आली अन् महिला ट्रॅकवर झोपली
काळ आला होता पण वेळ आली नव्हती;रेल्वे समोर आली अन् महिला ट्रॅकवर झोपली.