AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताची अंडर 19 आशिया कपमध्ये विजयाची हॅटट्रिक, मलेशियाला 315 धावांनी केलं पराभूत

अंडर 19 आशिया कप 2025 स्पर्धेत भारताची विजयी घोडदौड सुरुच आहे. भारताने साखळी फेरीतील तिन्ही सामने जिंकले असून उपांत्य फेरीत जागा पक्की केली आहे. साखळी फेरीच्या शेवटच्या सामन्यात मलेशियाला पराभूत केलं.

भारताची अंडर 19 आशिया कपमध्ये विजयाची हॅटट्रिक, मलेशियाला 315 धावांनी केलं पराभूत
भारताची अंडर 19 आशिया कपमध्ये विजयाची हॅटट्रिक, मलेशियाला 315 धावांनी केलं पराभूतImage Credit source: BCCI Twitter
| Updated on: Dec 16, 2025 | 6:42 PM
Share

अंडर 19 आशिया कप स्पर्धेत भारत आणि मलेशिया हे दोन संघ आमनेसामने आले होते. मलेशियाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय चुकीचा ठरलं असंच म्हणावं लागेल. कारण भारताने प्रथम फलंदाजी करताना 7 गडी गमवून 50 षटकात 408 धावा केल्या. तसेच विजयासाठी 409 धावांचं आव्हान दिलं. या धावांचा पाठलाग करताना मलेशियाचा डाव गडगडला आणि 93 धावांवरच ऑलआऊट झाला. हा सामना भारताने 315 धावांच्या फरकांनी जिंकली. भारताने स्पर्धेत विजयांची हॅटट्रिकच केली. इतकंच काय तर अंडर 19 क्रिकेटच्या इतिहासात एक मोठा विक्रमही प्रस्थापित केला. अंडर 19 आशिया कपच्या इतिहासात धावांच्या बाबतीत हा दुसरा सर्वात मोठा विजय आहे. या विजयाचा शिल्पकार ठरला तो अभिज्ञान कुंडू..

भारताचा डाव

भारताकडून आयुष म्हात्रे आणि वैभव सूर्यवंशी ही जोडी पहिल्यांदा मैदानात उतरली. आयुष म्हात्रे 14 धावांवर असताना बाद झाला. तर वैभव सूर्यवंशीने 26 चेंडूत 5 चौकार आणि 3 षटकार मारत 50 धावांची खेळी केली. तर वेदांत त्रिवेदीने 106 चेंडूत 90 धावा केल्या. या सामन्यात अभिज्ञान कुंडूचं वादळ घोंगावलं. त्याने 125 चेंडूत 17 चौकार आणि 9 षटकार मारत 167.20 च्या स्ट्राईक रेटने नाबाद 209 धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीमुळे भारताला 408 धावांपर्यंत मजल मारता आली. मलेशियाकडून मुहम्मद अक्रमने महागडी गोलंदाजी केली पण 5 विकेट घेतल्या. तर सथनकुमारन आणि जाश्विन कृष्णमूर्ती यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

मलेशियाचा डाव

भारताने विजयासाठी दिलेल्या धावांचा पाठलाग करताना मलेशियाचा डाव पत्त्यासारखा कोसळला. एकही फलंदाजी मोठी खेळी करू शकला नाही. हमजा पंग्गीने सर्वाधिक 35 धावा केल्या. तर तीन खेळाडूंना खातंही खोलता आलं नाही. भारताकडून दीपेश देवेंद्रनने 9 षटकात 21 धावा देत 5 विकेट काढल्या. तर उद्धव मोहनने 2, किशन कुमार सिंगने 1, खिलन पटेलने 1 आणि कनिष्क चौहानने 1 विकेट घेतली. भारताने उपांत्य फेरीत जागा पक्की केली आहे. तर मलेशियाचं आव्हान संपुष्टात आलं आहे. भारताचा उपांत्य फेरीचा सामना बांग्लादेश किंवा श्रीलंकेशी होईल.

आई देव पाण्यात ठेवून... हेलिकॉप्टर बिघाडावर पंकजा मुंडेंची प्रतिक्रीया
आई देव पाण्यात ठेवून... हेलिकॉप्टर बिघाडावर पंकजा मुंडेंची प्रतिक्रीया.
सुनेत्रा पवार यांनी शपथविधीसाठी घाई केली का?
सुनेत्रा पवार यांनी शपथविधीसाठी घाई केली का?.
सुनेत्रा पवारच बीड आणि पुण्याच्या पालकमंत्री? मोठी माहिती आली समोर
सुनेत्रा पवारच बीड आणि पुण्याच्या पालकमंत्री? मोठी माहिती आली समोर.
राऊतांनी केलेल्या मागणीचे मी समर्थन करतो! अनिल देशमुखांचं मोठं विधान
राऊतांनी केलेल्या मागणीचे मी समर्थन करतो! अनिल देशमुखांचं मोठं विधान.
ठाणे शिवसेनेचाच बालेकिल्ला आजच्या निकालाने...
ठाणे शिवसेनेचाच बालेकिल्ला आजच्या निकालाने....
कल्याण डोंबिवलीच्या महापौरपदी हर्षाली थविल; राहुल दामले उपमहापौरपदी
कल्याण डोंबिवलीच्या महापौरपदी हर्षाली थविल; राहुल दामले उपमहापौरपदी.
कल्याण डोंबिवलीतील गायब नगरसेविका पुन्हा ठाकरेंच्या शिवसेनेत!
कल्याण डोंबिवलीतील गायब नगरसेविका पुन्हा ठाकरेंच्या शिवसेनेत!.
सुप्रीम कोर्टाने रोहित पवार यांना सुनावलं! काय आहे कारण?
सुप्रीम कोर्टाने रोहित पवार यांना सुनावलं! काय आहे कारण?.
पुणे महापालिकेच्या उपमहापौर पदावरुन थेट फडणवीसांचा फोन
पुणे महापालिकेच्या उपमहापौर पदावरुन थेट फडणवीसांचा फोन.
विलीनीकरणासाठी गुजरातच्या उद्योगपतींकडून मध्यस्थी
विलीनीकरणासाठी गुजरातच्या उद्योगपतींकडून मध्यस्थी.