AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताचा आक्रमक पवित्रा पाहून पाकिस्तान संघ मालक कामिल खानने पुढचं सांगून टाकलं, बाद फेरीत…

वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स स्पर्धेत भारतीय संघाने पाकिस्तानची चांगलाच दणका दिला. सामन्याच्या एक दिवस आधी भारताने पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार दिला. त्यामुळे पाकिस्तानची पुन्हा एकदा दहशतवादावरून नाचक्की झाली आहे.

भारताचा आक्रमक पवित्रा पाहून पाकिस्तान संघ मालक कामिल खानने पुढचं सांगून टाकलं, बाद फेरीत...
भारताचा आक्रमक पवित्रा पाहून पाकिस्तान संघ मालक कामिल खानने पुढचं सांगून टाकलं, बाद फेरीत...Image Credit source: World Championship Of Legends Twitter
| Updated on: Jul 21, 2025 | 4:15 PM
Share

वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स 2025 ही माजी क्रिकेटपटूंसाठी एक टी20 स्पर्धा असून यंदाचं दुसरं पर्व आहे. या स्पर्धेत भारत चॅम्पियन, पाकिस्तान चॅम्पियन, इंग्लंड चॅम्पियन, ऑस्ट्रेलिया चॅम्पियन, वेस्ट इंडिज चॅम्पियन आणि दक्षिण आफ्रिका चॅम्पियन हे सहा संघ सहभागी होतात. रविवार 20 जुलै रोजी इंडिया चॅम्पियन्स आणि पाकिस्तान चॅम्पियन्स यांच्यात सामना होणार होता. पण इंडिया चॅम्पियन्सचे खेळाडू इरफान पठाण, हरभजन सिंग, युसूफ पठाण, सुरेश रैना आणि शिखर धवन यांनी पाकिस्तानविरुद्ध खेळणार नसल्याचे जाहीर केल्यानंतर सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे हा सामना रद्द करण्यात आला. या निर्णयामुळे पाकिस्तानची जगभर नाचक्की झाली आहे. दहशतवादाला खतपाणी घालणारा देश म्हणून जगभर प्रतिमा आहे. ऑपरेशन सिंदुरनंतर उड्या मारणारा पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने सामना अचानक रद्द केल्याबद्दल संताप व्यक्त केला.भारतीय खेळाडूंना पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट खेळायचे नसते , तर त्यांनी संघ येण्यापूर्वीच ते नाकारायला हवे होते , असं त्यांने सांगितलं.

पाकिस्तान चॅम्पियन्स संघाचे मालक कामिल खान म्हणाले की, ‘वर्ल्ड चॅम्पियन्सशिप लीजेंड्स स्पर्धेचे इतर सामने वेळापत्रकानुसार सुरू राहतील . भविष्यात कोणतेही बदल होणार नाहीत . जर दोन्ही संघ बाद फेरीत एकमेकांसमोर आले तर आयोजकांकडून एक नवीन योजना आखली जाईल. उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीबाबत सांगायचं तर उपांत्य फेरीत चार संघ असतील. तिथे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना टाळता येईल. पण जर दोन्ही संघ अंतिम फेरीत पोहोचले तर पुन्हा समस्या निर्माण होतील.’ कामिल खानच्या या विधानानंतर वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्सच्या आयोजकांसाठी एक नवीन चिंता सुरू झाली आहे.

पहिल्या पर्वात भारत आणि पाकिस्तान हे दोन संघ अंतिम फेरीत आमनेसामने आले होते. या सामन्यात भारताने पाकिस्तानला 5 विकेट आणि 5 चेंडू राखून मात दिली होती. तसेच जेतेपदावर नाव कोरलं होतं. त्यामुळे भारताने एकदा पाकिस्तानला अंतिम फेरीत दणका दिला आहे. पाकिस्तानने 20 षटकात 6 गडी गमवून 156 धावा केल्या होत्या. तसेच विजयासाठी 157 धावांचं आव्हान दिलं होतं. भारताने हे आव्हान 19.1 षटकात 5 गडी गमवून पूर्ण केलं. भारताकडून अंबाती रायुडूने 30 चेंडूत 50 धावांची खेळी केली होती. तसेच युसूफ पठाणने 16 चेंडूत 3 षटकार आणि एक चौकार मारत 30 धावा केल्या होत्या.

Follow Us
मिसिंग लिंकवर मृत्यूचा थरार; बसची वाहनांना जोरदार धडक आणि क्षणार्धात..
मिसिंग लिंकवर मृत्यूचा थरार; बसची वाहनांना जोरदार धडक आणि क्षणार्धात...
राष्ट्रवादीमधील बड्या नेत्याकडून पवारांकडे पार्थ पवार यांची तक्रार
राष्ट्रवादीमधील बड्या नेत्याकडून पवारांकडे पार्थ पवार यांची तक्रार.
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ...
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ....