AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG : चौथ्या कसोटीसाठी भारतीय संघात तीन बदल, कर्णधार शुबमन गिलने सांगितलं की..

भारत आणि इंग्लंड कसोटी मालिकेतील चौथ्या सामन्याला सुरुवात झाली आहे. नाणेफेकीचा कौल पुन्हा एकदा इंग्लंडच्या बाजूने लागला. त्यामुळे भारताच्या वाटेला प्रथम फलंदाजी आली आहे. असं असताना भारतीय संघात तीन बदल करण्यात आले आहेत.

IND vs ENG : चौथ्या कसोटीसाठी भारतीय संघात तीन बदल, कर्णधार शुबमन गिलने सांगितलं की..
IND vs ENG : चौथ्या कसोटीसाठी भारतीय संघात तीन बदल, कर्णधार शुबमन गिलने सांगितलं की..Image Credit source: BCCI
| Updated on: Jul 23, 2025 | 3:27 PM
Share

भारत आणि इंग्लंड कसोटी मालिकेतील चौथा सामना मँचेस्टरमध्ये होत आहे. या मैदानात भारताला कधीच यश मिळालेलं नाही. अशा स्थितीत भारताला नाणेफेकीनेही पाठ दाखवली आहे. त्यामुळे भारताला प्रथम फलंदाज करावी लागणार आहे. तिसऱ्या कसोटीतील पराभवानंतर भारतीय संघात तीन महत्त्वाचे बदल करण्यात आले आहे. तीन कसोटी सामन्यातील सहा डावात फेल गेलेल्या करुण नायरला बसवण्यात आलं आहे. तर पहिल्या कसोटीनंतर आराम दिलेल्या शार्दुल ठाकुरचा संघाच समावेश झाला आहे. तर आकाश दीप आणि नितीश कुमार रेड्डी हे दुखापतग्रस्त असल्याने त्यांच्या जागी संघात अंशुल कंबोजला स्थान देण्यात आलं आहे. हरियाणाचा 24 वर्षीय वेगवान गोलंदाज कंबोज या मालिकेपूर्वी इंडिया अ संघाचा भाग म्हणून इंग्लंड लायन्सविरुद्ध दोन अनऑफिशियल कसोटी सामने खेळला होता. मँचेस्टरमध्ये 25 वर्षानंतर एखाद्या भारतीय खेळाडूने पदार्पण केलं आहे.1990 मध्ये अनिल कुंबळे हा मँचेस्टरमध्ये कसोटी पदार्पण करणारा शेवटचा भारतीय होता. योगायोगाने अनिल कुंबळे आणि अंशुल कंबोज दोघांनीही प्रथम दर्जा क्रिकेटमध्ये 10 बळी घेतले आहेत.

शुबमन गिलने सलग चौथ्यांदा नाणेफेकीचा कौल गमावला. यानंतर त्याने सांगितलं की, ‘मी खरंच गोंधळलो होतो. नाणेफेक हरणे चांगले ठरले.’ गेल्या तीन कसोटी सामन्यांमध्ये आपण ज्या पद्धतीने खेळलो ते उत्कृष्ट होते. काही कठीण क्षण आम्ही गमावले आहेत. परंतु आम्ही त्यापेक्षा जास्त सत्रे जिंकली आहेत. थोडा ब्रेक हवा होता. तिन्ही कसोटी सामन्यांमध्ये तीव्रता होती. चांगली कामगिरी दिसते. चार-पाच दिवसांत काही शक्यता वर्तवण्यात आल्या आहेत, असंही त्याने पुढे सांगितलं. तसेच संघात तीन बदल केल्याचं त्याने स्पष्ट केलं. करुणच्या जागी साई सुदर्शन, आकाश दीप आणि रेड्डी जखमी असल्याने त्यांच्या जागी कंबोज आणि शार्दुलचाही समावेश केला आहे.

करुण नायर मागच्या तिन्ही कसोटी सामन्यात अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकला नाही. त्यामुळे त्याला संघाबाहेर करणार याची चर्चा क्रीडाप्रेमींमध्ये रंगली होती. त्यामुळे त्याच्या क्रिकेट करिअरला ब्रेक लागला अशी चर्चा आता रंगू लागली आहे. मात्र चौथ्या कसोटीत एखाद्या खेळाडूने निराशाजनक कामगिरी केली किंवा जखमी झाला तर पाचव्या कसोटीत संधी मिळू शकते. मात्र हा शेवटी नशिबाचा भाग असणार आहे. दुसरीकडे, कुलदीप यादवला चौथ्या कसोटीतही संधी मिळाली नाही.

Follow Us
महागाईचा फटका! एलपीजी गॅसची किंमत वाढली, किंमत 3000 च्या पुढे...
महागाईचा फटका! एलपीजी गॅसची किंमत वाढली, किंमत 3000 च्या पुढे....
डोकाडिया कुटुंबाच्या मृत्यूमागचे सत्य समोर, नेमकं काय घडलं?
डोकाडिया कुटुंबाच्या मृत्यूमागचे सत्य समोर, नेमकं काय घडलं?.
8 वर्षांची प्रतीक्षा संपली, आजपासून मिसिंग लिंक सर्वसामान्यांसाठी खुला
8 वर्षांची प्रतीक्षा संपली, आजपासून मिसिंग लिंक सर्वसामान्यांसाठी खुला.
मुस्लिम लग्नपत्रिकेत छत्रपती शिवाजी महाराज-टिपू सुलतानचा उल्लेख?
मुस्लिम लग्नपत्रिकेत छत्रपती शिवाजी महाराज-टिपू सुलतानचा उल्लेख?.
मुख्यमंत्री फडणवीस- शिंदेंच्या हस्ते मिसिंग लिंकचं लोकार्पण
मुख्यमंत्री फडणवीस- शिंदेंच्या हस्ते मिसिंग लिंकचं लोकार्पण.
कोंढव्याला पाकिस्तान संबोधल्याप्रकरणी भाजप पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल
कोंढव्याला पाकिस्तान संबोधल्याप्रकरणी भाजप पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल.
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश; 1745 कोटींचा साठा....
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश; 1745 कोटींचा साठा.....
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा, सुळे अडकल्या....
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा, सुळे अडकल्या.....
मराठीचं नाव घेतल्यावर मिरच्या का झोंबतायत?, राऊतांचा फडणवीसांवर हल्ला
मराठीचं नाव घेतल्यावर मिरच्या का झोंबतायत?, राऊतांचा फडणवीसांवर हल्ला.
आता मुंबई-पुणे प्रवास सुसाट! अर्ध्या तासाची बचत, आज होणार मिसिंग लिंक
आता मुंबई-पुणे प्रवास सुसाट! अर्ध्या तासाची बचत, आज होणार मिसिंग लिंक.