AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘हरण्याची भीती वाटते, म्हणून टीम इंडिया पाकिस्तानात येत नाही’, दिग्गज खेळाडूच विधान

Asia cup 2023 : पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि बीसीसीआय आशिया कप संदर्भात मध्यममार्ग शोधण्याचा प्रयत्न करतायत. या टुर्नामेंटमध्ये भारताचे काही सामने दुसऱ्या देशात खेळवण्याचा विचार सुरु आहे.

'हरण्याची भीती वाटते, म्हणून टीम इंडिया पाकिस्तानात येत नाही', दिग्गज खेळाडूच विधान
Team india
| Updated on: Mar 24, 2023 | 9:51 AM
Share

Asia cup 2023 : आयसीसीने पाकिस्तानला आशिया कप 2023 च यजमानपद दिलय, तेव्हापासून भारतीय टीम पाकिस्तानात जाणार का? हा प्रश्न सातत्याने उपस्थित केला जातोय. बीसीसीआयने आतापर्यंत अनेकदा या बद्दलची आपली भूमिका स्पष्ट केलीय. बीसीसीआयने अनेकदा आपले इरादे जाहीर केले आहेत. कुठल्याही परिस्थितीत आपली टीम पाकिस्तानात पाठवणार नाही, हे बीसीसीआयने सांगितलय.

पाकिस्तानचे माजी खेळाडू इम्रान नाजिर यांच्या मते, भारताला पाकिस्तानात हरण्याची भीती वाटते, म्हणून टीम इंडिया पाकिस्तानात येण्यास तयार नाहीय.

बीसीसीआयला मुख्य चिंता काय?

पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि बीसीसीआय आशिया कप संदर्भात मध्यममार्ग शोधण्याचा प्रयत्न करतायत. या टुर्नामेंटमध्ये भारताचे काही सामने दुसऱ्या देशात खेळवण्याचा विचार सुरु आहे. बीसीसीआयला खेळाडूंच्या सुरक्षेची चिंता आहे. त्यामुळे बीसीसीआयला पाकिस्तानात आपली टीम पाठवायची नाहीय.

राजकारण करता, तेव्हा मार्ग नसतो

“भारतीय टीम पाकिस्तानात न येण्यासाठी फक्त कारण देतेय. सुरक्षा हा मुद्दा नाहीय. बरेच संघ पाकिस्तानात येऊन गेलेत. ऑस्ट्रेलियन टीम सुद्धा पाकिस्तानात येऊन गेली. ही सर्व फक्त कारणं आहेत. टीम इंडियाला पाकिस्तानात पराभवाची भीती वाटते, हेच त्यांच्या न येण्यामागे मुख्य कारण आहे. कारण द्यायची सोडून, भारताने इथे येऊन खेळलं पाहिजे. जेव्हा तुम्ही राजकारण सुरु करता, तेव्हा त्यावर कुठला मार्ग नसतो” असं इमरान नाजिर नादिर अलीच्या पॉडकास्टमध्ये म्हणाले. फक्त ICC टुर्नामेंटमध्ये आमने-सामने

भारत आणि पाकिस्तानची टीम परस्परांबरोबर द्विपक्षीय मालिका खेळत नाहीय. त्याशिवाय भारताने पाकिस्तानचा दौरा केलेला नाही. दोन्ही टीम्स आतापर्यंत फक्त आयसीसी टुर्नामेंटमध्ये आमने-सामने आले आहेत. यात टी 20 वर्ल्ड कप, वनडे वर्ल्ड कप, आशिया कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी सारख्या स्पर्धा आहेत. भारतीय टीमने 2006 मध्ये शेवटचा पाकिस्तान दौरा केला होता. त्यावेळी टेस्ट सीरीजमध्ये पराभव झालेला पण वनडे सीरीज जिंकली होती. 2008 साली पाकिस्तानात गेलेल्या श्रीलंकन टीमवर दहशतवादी हल्ला झाला होता.

... तर नार्वेकरांना राजीनामा द्यावा लागेल! राऊतांनी स्पष्टच सांगितलं
... तर नार्वेकरांना राजीनामा द्यावा लागेल! राऊतांनी स्पष्टच सांगितलं.
देशाला गुलामीतून मुक्त करण्यासाठी टिपूने बलिदान दिलं! ओवैसींचं विधान
देशाला गुलामीतून मुक्त करण्यासाठी टिपूने बलिदान दिलं! ओवैसींचं विधान.
माझ्या नादी लागू नका; श्रीकांत शिंदेंचा गणेश नाईकांना इशारा
माझ्या नादी लागू नका; श्रीकांत शिंदेंचा गणेश नाईकांना इशारा.
पुण्यात भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राडा, कार्यकर्ता जखमी
पुण्यात भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राडा, कार्यकर्ता जखमी.
काँग्रेसची अधोगती मतांच्या राजकारणामुळे; श्रीकांत शिंदेंची टीका
काँग्रेसची अधोगती मतांच्या राजकारणामुळे; श्रीकांत शिंदेंची टीका.
तेजस ठाकरेंवर रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरू!
तेजस ठाकरेंवर रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरू!.
सपकाळांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख; भाजप आक्रमक
सपकाळांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख; भाजप आक्रमक.
सपकाळांना महाराष्ट्राचा इतिहास माहित नाही! अतुल सावेंची टीका
सपकाळांना महाराष्ट्राचा इतिहास माहित नाही! अतुल सावेंची टीका.
भाजपकडून हिंदू-मुस्लिम रंग देण्याचं काम! हर्षवर्धन सपकाळांकडून टीका
भाजपकडून हिंदू-मुस्लिम रंग देण्याचं काम! हर्षवर्धन सपकाळांकडून टीका.
हर्षवर्धन सपकाळांच्या विरोधात पुण्यात भाजप- काँग्रेसचे आंदोलक आक्रमक
हर्षवर्धन सपकाळांच्या विरोधात पुण्यात भाजप- काँग्रेसचे आंदोलक आक्रमक.