AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘हरण्याची भीती वाटते, म्हणून टीम इंडिया पाकिस्तानात येत नाही’, दिग्गज खेळाडूच विधान

Asia cup 2023 : पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि बीसीसीआय आशिया कप संदर्भात मध्यममार्ग शोधण्याचा प्रयत्न करतायत. या टुर्नामेंटमध्ये भारताचे काही सामने दुसऱ्या देशात खेळवण्याचा विचार सुरु आहे.

'हरण्याची भीती वाटते, म्हणून टीम इंडिया पाकिस्तानात येत नाही', दिग्गज खेळाडूच विधान
Team india
| Updated on: Mar 24, 2023 | 9:51 AM
Share

Asia cup 2023 : आयसीसीने पाकिस्तानला आशिया कप 2023 च यजमानपद दिलय, तेव्हापासून भारतीय टीम पाकिस्तानात जाणार का? हा प्रश्न सातत्याने उपस्थित केला जातोय. बीसीसीआयने आतापर्यंत अनेकदा या बद्दलची आपली भूमिका स्पष्ट केलीय. बीसीसीआयने अनेकदा आपले इरादे जाहीर केले आहेत. कुठल्याही परिस्थितीत आपली टीम पाकिस्तानात पाठवणार नाही, हे बीसीसीआयने सांगितलय.

पाकिस्तानचे माजी खेळाडू इम्रान नाजिर यांच्या मते, भारताला पाकिस्तानात हरण्याची भीती वाटते, म्हणून टीम इंडिया पाकिस्तानात येण्यास तयार नाहीय.

बीसीसीआयला मुख्य चिंता काय?

पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि बीसीसीआय आशिया कप संदर्भात मध्यममार्ग शोधण्याचा प्रयत्न करतायत. या टुर्नामेंटमध्ये भारताचे काही सामने दुसऱ्या देशात खेळवण्याचा विचार सुरु आहे. बीसीसीआयला खेळाडूंच्या सुरक्षेची चिंता आहे. त्यामुळे बीसीसीआयला पाकिस्तानात आपली टीम पाठवायची नाहीय.

राजकारण करता, तेव्हा मार्ग नसतो

“भारतीय टीम पाकिस्तानात न येण्यासाठी फक्त कारण देतेय. सुरक्षा हा मुद्दा नाहीय. बरेच संघ पाकिस्तानात येऊन गेलेत. ऑस्ट्रेलियन टीम सुद्धा पाकिस्तानात येऊन गेली. ही सर्व फक्त कारणं आहेत. टीम इंडियाला पाकिस्तानात पराभवाची भीती वाटते, हेच त्यांच्या न येण्यामागे मुख्य कारण आहे. कारण द्यायची सोडून, भारताने इथे येऊन खेळलं पाहिजे. जेव्हा तुम्ही राजकारण सुरु करता, तेव्हा त्यावर कुठला मार्ग नसतो” असं इमरान नाजिर नादिर अलीच्या पॉडकास्टमध्ये म्हणाले. फक्त ICC टुर्नामेंटमध्ये आमने-सामने

भारत आणि पाकिस्तानची टीम परस्परांबरोबर द्विपक्षीय मालिका खेळत नाहीय. त्याशिवाय भारताने पाकिस्तानचा दौरा केलेला नाही. दोन्ही टीम्स आतापर्यंत फक्त आयसीसी टुर्नामेंटमध्ये आमने-सामने आले आहेत. यात टी 20 वर्ल्ड कप, वनडे वर्ल्ड कप, आशिया कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी सारख्या स्पर्धा आहेत. भारतीय टीमने 2006 मध्ये शेवटचा पाकिस्तान दौरा केला होता. त्यावेळी टेस्ट सीरीजमध्ये पराभव झालेला पण वनडे सीरीज जिंकली होती. 2008 साली पाकिस्तानात गेलेल्या श्रीलंकन टीमवर दहशतवादी हल्ला झाला होता.

Follow Us
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार: एकाच दिवशी दोन मोठे धक्के
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती: सीएम फडणवीस
गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला
अभिनेता गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला; नवोदित अभिनेत्री ठरली निमित्त
अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
महाराष्ट्रातील ग्रामीण शाळांच्या अवस्थेवर अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
मनोज जरांगे पाटील यांनी बोलावली आरक्षण अभ्यासकांची महत्त्वाची बैठक
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांची उद्या आरक्षण अभ्यासकांसोबत बैठक
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हेंचा टोला
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हे यांचा मिश्किल टोला, म्हणाल्या तुमचा उजवा हात...
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे....
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे.... मोठ्या पर्यावरण संकटाला निमंत्रण
शिंदे गटातील नेत्याची थेट धमकी, माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला....
माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला थेट... पुन्हा शिंदें गटातील बड्या नेत्याची भर मंचावरून धमकी
याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटो...
Nashik Kumbh | याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटोबाबत अखेर सांगितलंच
आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, शिंदे गटातील नेत्याचं विधान
मोठी बातमी! आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, त्यामुळे... शिंदे गटातील बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ