AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : पंचांनी दिलं आऊट तरी जडेजा होता निश्चिंत, ती चूक टाळण्यासाठी धावला आणि..

भारत आणि बांग्लादेश यांच्यात पहिला कसोटी सामना चेन्नईच्या चेपॉक मैदानावर सुरु आहे. पहिल्याच सामन्यात बांगलादेशने आपलं आक्रमक रुप दाखवलं. आघाडीचे दिग्गज फलंदाज झटपट बाद झाले. त्यामुळे शेपटाच्या फलंदाजांवर डाव सावरण्याची वेळ आली. पण त्यातही रवींद्र जडेजा बाद होता होता वाचला.

Video : पंचांनी दिलं आऊट तरी जडेजा होता निश्चिंत, ती चूक टाळण्यासाठी धावला आणि..
| Updated on: Sep 19, 2024 | 3:26 PM
Share

बांगलादेशने पहिल्या कसोटीत आपलं आक्रमद अंदाज दाखवला. आघाडीच्या फलंदाजांना बांगलादेशच्या गोलंदाजीसमोर तग धरणं कठीण झालं. एका पाठोपाठ एक असे दिग्गज फलंदाज झटपट बाद झाले. त्यामुळे पाकिस्तानसारखी स्थिती होते की काय असं धाकधूक क्रीडारसिकांना लागून आहे. असं यशस्वी जयस्वाल वगळता एकही आघाडीचा फलंदाज चांगली कामगिरी करू शकला नाही. यशस्वी जयस्वालने 56 धावा करत आपण फॉर्मात असल्याचं दाखवून दिलं. दुसरीकडे, रोहित शर्मा, शुबमन गिल आणि विराट कोहलीसारखे दिग्गज फलंदाज फेल गेले. शुबमनला तर भोपळाही फोडता आला नाही. त्यामुळे तळाच्या फलंदाजांवर ताण आला. रवींद्र जडेजा आणि आर अश्विन या जोडीकडून सर्वाधिक आशा लागून आहे. असं असताना एक क्षण रवींद्र जडेजाची विकेट पडली असंच वाटलं. पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. हसन महमूदच्या गोलंदाजीवर पंचांनी रवींद्र जडेजाला पायचीत घोषित केलं. बांगलादेशच्या जोरदार अपीलनंतरही रवींद्र जडेजा ठाम होता. पण एक चूक नडली असती आणि ती चूक होऊ नये म्हणून जडेजाने माघारी धाव घेतली.

पंचांकडे एलबीडब्ल्यूच्या अपीलसाठी महमूद अपील करत होता. दुसरीकडे, रवींद्र जडेजा एक धाव घेण्यासाठी धाव घेत होता. पण थर्ड स्लिपच्या हाताजवळ चेंडू असल्याचं पाहून परत माघारी फिरला. पण जोरात अपील करत असलेला महमूद पाठमोरा तिथपर्यंत पोहोचला. त्याला रवींद्र जडेजाने रनआऊट होऊ नये यासाठी उडी मारली हे माहिती नव्हतं. तेव्हा त्याच्या पायात पाय अडकला आणि महमूद त्याच्या अंगावर पडला. त्याच्या धडपडीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 50 व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर हा प्रकार घडला. दुसरीकडे, रवींद्र जडेजाने घेतलेला रिव्ह्यू योग्य ठरला आणि पंचांनी नाबाद असल्याचं घोषित केलं.

दरम्यान, आर अश्विन आणि रवींद्र जडेजा या जोडीने टीम इंडियाची लाज राखली. सातव्या विकेटसाठी दोघांनी 80 हून अधिक धावांची भागीदारी केली. त्यांच्या भागीदारीमुळे टीम इंडियाला 220 हून अधिक धावा करता आल्या. या दोघांची भागीदारी झाली नसती तर टीम इंडियाची स्थिती नाजूक असती. खरं तर पहिल्याच दिवशी पाकिस्तान संघासारखी स्थिती होऊन बसली असती.

Follow Us
मुंबईला गँगवॉरकडे जाऊ देणार नाही - CM फडणवीस
मुंबईला गँगवॉरकडे जाऊ देणार नाही - CM फडणवीस.
दिल्ली मेट्रो स्टेशनजवळील सदनगर परिसरात भीषण आग; 7 जणांचा मृत्यू
दिल्ली मेट्रो स्टेशनजवळील सदनगर परिसरात भीषण आग; 7 जणांचा मृत्यू.
बलिदान मास पूर्ण करत, शंभू भक्तांकडून छत्रपती संभाजी महाराजांना अभिवाद
बलिदान मास पूर्ण करत, शंभू भक्तांकडून छत्रपती संभाजी महाराजांना अभिवाद.
अजित पवारांच्या अपघातावरून रोहित पवार यांचा थेट सरकारवर आरोप
अजित पवारांच्या अपघातावरून रोहित पवार यांचा थेट सरकारवर आरोप.
दिल्ली दौऱ्यात शिंदेचं मोदींसोबत खलबतं; केंद्रीय मंत्रिमंडळ....
दिल्ली दौऱ्यात शिंदेचं मोदींसोबत खलबतं; केंद्रीय मंत्रिमंडळ.....
हे सर्व भाजपचे अंगवस्त्र, संजय राऊत यांची कुणावर टीका; काय दिला इशारा?
हे सर्व भाजपचे अंगवस्त्र, संजय राऊत यांची कुणावर टीका; काय दिला इशारा?.
आता म्हणतील अ‍ॅसिड हल्ला झालाच नाही, संजय राऊत यांची जळजळीत टीका
आता म्हणतील अ‍ॅसिड हल्ला झालाच नाही, संजय राऊत यांची जळजळीत टीका.
सिलेंडरनंतर आता पेट्रोल-डिझेलचा तुटवडा?; शेगावात डिझेल संपलं,....
सिलेंडरनंतर आता पेट्रोल-डिझेलचा तुटवडा?; शेगावात डिझेल संपलं,.....
तू मारल्यासारखं कर मी रडल्यासारखं करतो असं भाजपचे नेते करत आहेत
तू मारल्यासारखं कर मी रडल्यासारखं करतो असं भाजपचे नेते करत आहेत.
LPG चे दर वाढले पण इंधन दराबाबत सरकारचा मोठा निर्णय
LPG चे दर वाढले पण इंधन दराबाबत सरकारचा मोठा निर्णय.