AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG 3rd ODI: युवराजने ऋषभला काय मंत्र दिला, तिसऱ्या वनडे आधी दोघांमध्ये 45 मिनिटं चर्चा

IND vs ENG 3rd ODI: भारताला काल तिसऱ्या वनडे सामन्यात इंग्लंडवर (IND vs ENG) शानदार विजय मिळवला. ऋषभ पंत (Rishabh Pant) आणि हार्दिक पंड्या (Hardik pandya) भारताच्या विजयाचे नायक ठरले.

IND vs ENG 3rd ODI: युवराजने ऋषभला काय मंत्र दिला, तिसऱ्या वनडे आधी दोघांमध्ये 45 मिनिटं चर्चा
ऋषभ पंतImage Credit source: social
| Updated on: Jul 18, 2022 | 11:12 AM
Share

मुंबई: भारताला काल तिसऱ्या वनडे सामन्यात इंग्लंडवर (IND vs ENG) शानदार विजय मिळवला. ऋषभ पंत (Rishabh Pant) आणि हार्दिक पंड्या (Hardik pandya) भारताच्या विजयाचे नायक ठरले. ऋषभने काल इंग्लिश गोलंदाजांना आपल्या बॅटचा तडाखा दाखवला. आधी संयमी सुरुवात केली. पण जम बसल्यानंतर इंग्लिश गोलंदाजांची पिस काढली. 113 चेंडूत नाबाद 125 धावा फटकावताना त्याने 16 चौकार आणि 2 षटकार लगावले. ऋषभ पंतच्या या जबरदस्त इनिंग नंतर युवराज सिंगच एक टि्वट सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. ऋषभने काल वनडे करीयरमधलं पहिलं शतक झळकावलं. त्याच्या फलंदाजीच्या बळावर भारताने इंग्लंडने विजयासाठी दिलेलं 260 धावांच लक्ष्य आरामात पार केलं. भारताने इंग्लंड मध्ये त्यांच्याच विरुद्ध तिसरी द्विपक्षीय मालिका जिंकली. तिसऱ्या वनडेआधी युवराजने ऋषभ पंत बरोबर फोनवरुन 45 मिनिटं चर्चा केली होती. त्याचीच ही फलनिष्पत्ति असल्याचे संकेत युवराजच्या टि्वटमधून मिळतायत.

युवराजने काय म्हटलय टि्वट मध्ये

“त्या 45 मिनिटाच्या संवादाचा फायदा झाला, असं दिसतय. वेल प्लेड ऋषभ पंत. अशीच तू तुझ्या इनिंगला गती देतोस. हार्दिक पंड्याचा खेळ पाहताना सुद्धा आनंद झाला” असं युवराजने आपल्या टि्वटमध्ये म्हटलं आहे.

नॅटवेस्ट ट्रॉफीची आठवण झाली ताजी

भारताने इंग्लंड मध्ये सन 2002 मध्ये नॅटवेस्ट ट्रॉफी जिंकली होती. या विजयाला यावर्षी 20 वर्ष पूर्ण झाली. त्यानंतर चारच दिवसात भारताने इंग्लंड विरुद्ध पुन्हा एकदा सीरीज जिंकली. इंग्लंडने नॅटवेस्ट करंडक स्पर्धेत विजयासाठी 326 धावांचे लक्ष्य दिले होते. मोहम्मद कैफ आणि युवराज सिंहच्या फलंदाजीच्या बळावर भारताने एक कठीण विजय मिळवला होता. कालच्या सीरीजमधील शेवटच्या सामन्याने त्याच फायनलची आठवण ताजी झाली. भारताच्या 72/4 विकेट गेल्या होत्या. त्यावेळी ऋषभ पंत आणि हार्दिक पंड्या जोडीने कमालीच खेळ दाखवला. दोघांनी पाचव्या विकेटसाठी महत्त्वपूर्ण ठरणारी 133 धावांची भागीदारी केली. या पार्ट्नरशिपने विजयाचा पाया रचला. हार्दिकने 55 चेंडूत 71 तर पंतने 113 चेंडूत नाबाद 125 धावा फटकावल्या. हार्दिक पंड्याने 36 व्या षटकात बाद झाला. ऋषभने शेवटपर्यंत खेळपट्टि्वर टिकून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. , ,

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.