AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND VS ENG T20 Live : टेस्टचा वचपा टी-20 मध्ये काढणार? टीम इंडिया आज पुन्हा इग्लंडला भिडली

बऱ्याच दिवसांनी या सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व रोहित शर्मा करत आहे, जो कोरोना व्हायरसवर (Corona) मात करून मैदानात परतला आहे. रोहित शर्मा कोविड -19 पॉझिटिव्ह आढळल्यानंतर एजबॅस्टन कसोटी सामन्यात सहभागी होऊ शकला नव्हता.

IND VS ENG T20 Live : टेस्टचा वचपा टी-20 मध्ये काढणार? टीम इंडिया आज पुन्हा इग्लंडला भिडली
Ind Vs Eng odi Image Credit source: bcci twitter
दादासाहेब कारंडे
दादासाहेब कारंडे | Updated on: Jul 07, 2022 | 11:19 PM
Share

मुंबई : भारत आणि इंग्लंड (IND VS ENG T20) यांच्यातील पहिला T20 सामना साउथहॅम्प्टनच्या एजिस बाउल स्टेडियमवर खेळवला जात आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharama) नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दीपक हुडा आणि ईशान किशन क्रीजवर टिकलेले दिसून आले. पहिल्या सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग टीम इंडियासाठी पदार्पण करत आहे. रोहित शर्माने त्याला टी-20 कॅप दिली. या T20 मालिकेत भारतीय संघ एजबॅस्टन कसोटी सामन्यातील पराभवाचा बदला घेण्याचा पुरेपर प्रयत्न करताना दिसेल. बऱ्याच दिवसांनी या सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व रोहित शर्मा करत आहे, जो कोरोना व्हायरसवर (Corona) मात करून मैदानात परतला आहे. रोहित शर्मा कोविड -19 पॉझिटिव्ह आढळल्यानंतर एजबॅस्टन कसोटी सामन्यात सहभागी होऊ शकला नव्हता.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

  1. भारत – रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, अक्षर पटेल, सूर्य कुमार यादव, हार्दिक पांड्या, दीपक हुडा, दिनेश कार्तिक, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग.
  2. इंग्लंड – जेसन रॉय, जोस बटलर (कर्णधार), डेव्हिड मलान, मोईन अली, लियाम लिव्हिंगस्टोन, हॅरी ब्रूक, सॅम कुरन, ख्रिस जॉर्डन, टायमल मिल्स, मॅथ्यू पार्किन्सन, रीस टोपली.

बीसीसीआयचे ट्विट

भारताचं पारडं जड

रोहित शर्माच्या नेतृत्वात संघाने इंग्लंडविरुद्ध खेळलेल्या शेवटच्या 11 टी-20 सामन्यांपैकी 7 सामने जिंकले आहेत. त्याचबरोबर इंग्लंडने केवळ 4 सामने जिंकले आहेत. दोन्ही संघांदरम्यान खेळल्या गेलेल्या मागील तीन मालिकांबद्दल बोलायचे झाले तर भारतीय संघाने तिन्ही मालिका जिंकल्या आहेत.

आधीच्या मलिकांमध्येही भारतच वरचढ

2021 मध्ये भारताने इंग्लंडचा 3-2 अशा फरकाने पराभव केला. त्याच वेळी, 2018 मध्ये इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाने 3 सामन्यांची मालिका 2-1 ने जिंकली होती. यापूर्वी 2016-17 च्या भारत दौऱ्यात इंग्लंडला 2-1 असा पराभव स्वीकारावा लागला होता. दोन्ही संघांच्या हेड टू हेड रेकॉर्डबद्दल बोलायचे झाले तर येथेही भारताचाच वरचष्मा आहे. दोघांमध्ये आतापर्यंत 19 टी-20 सामने खेळले गेले आहेत. टीम इंडियाने 10 सामने जिंकले आहेत, तर इंग्लंडने 9 सामने जिंकले आहेत.

पहिल्या T20 मध्ये या भारतीय खेळाडूंना विश्रांती

पहिल्या T20 सामन्यासाठी अनेक भारतीय खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. हे खेळाडू दुसऱ्या T20 पासून भारतीय संघाचा भाग असतील. विराट कोहली, जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा, श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत यांना पहिल्या T20 साठी संघात स्थान मिळालेले नाही.

Follow Us
स्टुडंट, इडियट, अंधभक्त... राहुल गांधींच्या वक्तव्याने सभागृहात गदारोळ
Rahul Gandhi | स्टुडंट, इडियट, अंधभक्त... राहुल गांधींच्या एका वक्तव्याने सभागृहात प्रचंड गदारोळ
कर्जमाफी प्रमाणपत्राची प्रत व्हायरल, सोशल मीडियावर नेमकी कसली चर्चा?
Photo | कर्जमाफी प्रमाणपत्राची प्रत व्हायरल, सोशल मीडियावर नेमकी कसली चर्चा?
एकानेही घरी थांबायचं नाही! ज्या मराठ्यांच्या लेकरांवर अन्याय झालाय...
Manoj Jarange Patil | एकानेही घरी थांबायचं नाही! ज्या मराठ्यांच्या लेकरांवर अन्याय झालाय त्यांनी 28 ऑगस्टला अंतरवालीला या; जरांगेंनी पुन्हा फुंकलं आंदोलनाचं रणशिंग
पालिकेची लूटमार सुरू? नव्या गाड्यांच्या प्रस्तावावर पेडणेकर आक्रमक
Kishori Pednekar | पालिकेची लूटमार सुरू आहे का? नव्या गाड्यांच्या प्रस्तावावर किशोरी पेडणेकर आक्रमक
उद्धव ठाकरे ना मंत्री आहेत, ना आमदार तरी थेट... भाजप नेता काय म्हणाला?
उद्धव ठाकरे ना मंत्री आहेत, ना आमदार तरी थेट... राऊतांनी विचारलेल्या प्रश्नांवर भाजप नेत्याने घेरलं
भर मंचावरून केली घोषणा! अखेरचं अन् निर्णायक आंदोलन त्यानंतर...
भर मंचावरून केली घोषणा! अखेरचं अन् निर्णायक आंदोलन त्यानंतर... मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
अक्कलकोटमध्ये गुरुपौर्णिमेचा उत्साह; दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी
Solapur | अक्कलकोटमध्ये गुरुपौर्णिमेचा भक्तिमय उत्साह; स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी
काय ठरलं, CJP पुन्हा जंतर-मंतरवर उतरणार? आंदोलकांवरील...
काय ठरलं, CJP पुन्हा जंतर-मंतरवर उतरणार? आंदोलकांवरील FIR... पुन्हा प्रकरण पेटलं
16.96 लाख शेतकऱ्यांची यादी तयार; बँकांना सरकारचे थेट आदेश
कर्जमाफीत मोठा बदल! 16.96 लाख शेतकऱ्यांची यादी तयार; बँकांना सरकारचे थेट आदेश
84% पेरणी पूर्ण; खताचा तुटवडा नाही! कृषिमंत्र्यांची मोठी गुड न्यूज
Dattatray Bharne | 84% पेरणी पूर्ण; खताचा तुटवडा नाही! कृषिमंत्री दत्ता भरणेंची शेतकऱ्यांना मोठी गुड न्यूज, म्हणाले...