
नामिबियाकडून जॅन फ्रायलिंक आणि लॉरेन स्टींकॅम्प ही जोडी मैदानात आली आहे. तर हार्दिक पांड्या पहिलं षटक टाकण्यासाठी आलं आहे. पॉवर प्लेमध्ये नामिबिया किती धावा करते याकडे लक्ष लागून आहे.
भारताने शेवटच्या दोन षटकात फक्त 10 धावांवर पाच गडी गमावल्या. भारताची स्थिती 199 धावांवर 4 विकेट अशी होती. पण 20 षटकांचा खेळ संपला तेव्हा भारताने 9 गडी गमवून 209 धावा केल्या. भारताने नामिबियासमोर विजयासाठी 210 धावांचं आव्हान ठेवलं आहे. आता भारतीय गोलंदाज किती धावांवर रोखतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
रिंकु सिंहने फुसक्या फलंदाजीचं दर्शन घडवलं. डेथ ओव्हरमध्ये एका पाठोपाठ एक चार विकेट गमावल्या. रिंकु सिंहही काही खास करू शकला नाही. रिंकु सिंह 6 चेंडूत फक्त 1 धाव करून बाद झाला.
टीम इंडियाने एका षटकात तीन विकेट गमावले आहेत. हार्दिक पांड्या आणि शिवम दुबे बाद झाले. तर अक्षर पटेल पहिल्याच चेंडूवर बोल्ड झाला. त्यामुळे टीम इंडियाच्या धावगतीला धक्का बसला आहे.
टीम इंडियाला शिवम दुबेच्या रूपाने सहावा धक्का बसला आहे. हार्दिक पांड्या बाद झाल्यानंतर शिवम दुबे धावचीत झाला. त्यामुळे डेथ ओव्हरमध्ये भारताच्या धावगतीला धक्का बसला.
हार्दिक पांड्याने 27 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. त्याच्या अर्धशतकी खेळीमुळे टीम इंडियाने 200 पार धावा केल्या आहेत. आता 8 चेंडूचा खेळ शिल्लक असून किती धावा होतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
टीम इंडियाचा ऑलराउंडर हार्दिक पंड्या शिवम दुबे याच्यासह टॉप गिअपरमध्ये बॅटिंग करत आहेत. टीम इंडियाने 16 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 184 धावा केल्या आहेत. हार्दिकने नाबाद 41 धावा केल्या आहेत. तर शिवम 14 धावांवर खेळत आहे.
नामिबियाने टीम इंडियाला झटपट 2 झटके दिले. कॅप्टन सूर्यकुमार यादव आणि त्यानंतर तिलक वर्मा हे सेट फलंदाज बाद झाले. तिलक आऊट झाल्याने भारताने चौथी विकेट गमावली आहे. त्यामुळए आता हार्दिक पंड्या आणि शिवम दुबे या जोडीवर मोठी जबाबदारी आहे.
नामिबियाने सूर्यकुमार यादव याच्यानंतर टीम इंडियाला आणखी एक झटका दिला आहे. नामिबियाने सेट तिलक वर्मा याला आऊट केलं आहे. तिलकने 21 बॉलमध्ये 25 रन्स केल्या.
नामिबियाने टीम इंडियाला तिसरा झटका दिला आहे. विकेटकीपर झेन ग्रीन याने बर्नार्ड स्कोल्झ याने टाकलेल्या बॉलवर कॅप्टन सूर्यकुमार यादव याला स्टपिंग आऊट केलं. सूर्याने 13 बॉलमध्ये 12 रन्स केल्या.
नामिबियाने भारताला दुसरा झटका दिला आहे. नामिबियाने झंझावाती खेळी करणाऱ्या इशान किशन याला आऊट करत धावांना ब्रेक लावला आहे. इशानने 24 बॉलमध्ये 5 सिक्स आणि 6 फोरसह एकूण 61 रन्स केल्या.
इशान किशन याने पावर प्लेच्या सहाव्या आणि शेवटच्या ओव्हरमध्ये धमाका केला. इशानने सलग 4 सिक्स लगावले. त्यानंतर इशानने सहाव्या आणि शेवटच्या चेंडूवर चौकार लगावला. इशानने यासह सहाव्या ओव्हरमध्ये 28 धावा केल्या. इशानने यासह 20 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं.
टीम इंडियाने संजू सॅमसन याच्या रुपात दुसऱ्या ओव्हरमधील शेवटच्या बॉलवर पहिली विकेट गमावली. त्यानंतर इशान किशन आणि तिलक वर्मा या दोघांनी भारताला वेगवान सुरुवात दिली आहे. भारताने 5 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून 58 रन्स केल्या आहेत. इशान 22 आणि तिलक 13 रन्सवर नॉट आऊट खेळत आहेत.
नामिबियाने टीम इंडियाला पहिला झटका दिला आहे. संजू सॅमसन याच्या रुपात भारताने पहिली विकेट गमावली. संजूला चांगली सुुरवात मिळाली होती. मात्र संजू मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात कॅच आऊट झाला. संजूने 8 चेंडूत 22 धावा केल्या.
टीम इंडिया विरुद्ध नामिबिया सामन्याला सुरुवात झाली आहे. नामिबियाने टीम इंडियाला टॉस जिंकून बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. भारताकडून इशान किशन आणि आणि संजू सॅमसन ही सलामी जोडी मैदानात आली आहे.
अभिषेक शर्माची तब्येत खराब असल्याने संजू सॅमसनला प्लेइंग 11 मध्ये संधी मिळाली आहे. आता अभिषेक शर्मा पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात खेळणार की नाही याबाबत साशंकता आहे.
नामिबिया (प्लेइंग इलेव्हन): लॉरेन स्टीनकॅम्प, जॅन फ्रायलिंक, जॅन निकोल लॉफ्टी-ईटन, गेरहार्ड इरास्मस (कर्णधार), जेजे स्मित, झेन ग्रीन (विकेटकीपर), रुबेन ट्रम्पेलमन, मालन क्रुगर, बर्नार्ड स्कोल्ट्ज, बेन शिकोंगो, मॅक्स हेंगो
भारत (प्लेइंग इलेव्हन): संजू सॅमसन, इशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, रिंकू सिंग, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह
सूर्यकुमार यादव म्हणाला की, आम्ही प्रथम फलंदाजी करण्याचा विचार करत होतो. त्याबद्दल खूप आनंदी. जोपर्यंत आम्ही नाणेफेक हरतो आणि सामना जिंकतो तोपर्यंत आम्हाला ते मान्य आहे. दव हा एक मोठा घटक असणार आहे, परंतु जेव्हा तुम्ही बाहेर जाऊन एकूण धावसंख्येचा बचाव करता तेव्हा ते तुम्हाला आत्मविश्वास देते. अभिषेक अजूनही ठीक नाही, तो एक-दोन सामने गमावेल. संजू सॅमसन येईल आणि तसाच फलंदाज आहे. सिराजऐवजी बुमराह येतो.
गेरहार्ड इरास्मस म्हणाला की, आम्ही प्रथम गोलंदाजी करणार आहोत. हा एक अतिशय चांगला सपाट क्रिकेटिंग पृष्ठभाग आहे, पृष्ठभाग आणि दव यांच्या दृष्टिकोनातून गोलंदाजीकरणे योग्य आहे. हे आमचे कौशल्य वाढवण्याबद्दल आहे. चांगली विकेट दिसते, दुसऱ्या हाफमध्ये त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न करा. म्हणूनच आम्ही मनोरंजनासाठी क्रिकेट खेळतो. आमच्याकडे दोन बदल आहेत.
नाणेफेकीचा कौल नामिबियाच्या बाजूने लागला आहे. दव फॅक्टर लक्षात घेऊन नामिबियाच्या कर्णधाराने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताच्या वाटेला प्रथम फलंदाजी आली आहे.
टीम इंडिया विरुद्ध नामिबिया सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे. या सामन्याचा थरार नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये रंगणार आहे. भारताने या स्टेडियममध्ये आतापर्यंत 4 पैकी 2 टी 20i सामने जिंकले आहेत.
टीम इंडिया आणि नामिबिया या दोन्ही संघांची टी 20i वर्ल्ड कप निमित्ताने आमनेसामने येण्याची ही दुसरी वेळ आहे. याआधी टीम इंडियाने नामिबियाचा 2021 च्या टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत पराभव केला होता. भारताने तेव्हा विराट कोहली याच्या नेतृत्वात हा एकतर्फी विजय मिळवला होता.
गेरहार्ड इरास्मस (कर्णधार), झेन ग्रीन (विकेटकीपर) लॉरेन स्टीनकॅम्प, जॅन फ्रायलिंक, जॅन निकोल लोफ्टी-ईटन, जेजे स्मिथ, रुबेन ट्रम्पेलमन, डिलन लीचर, विलेम मायबर्ग, बर्नार्ड शॉल्झ, मॅक्स हिन्गो,
मालन क्रुगर, बेन शिकोंगो, जॅक ब्रासेल, जॅन बाल्ट आणि सपोर्ट स्टाफ.
इशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव (कर्णधार) अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, शिवम दुबे, रिंकू सिंग, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, संजू सॅमसन आणि वॉशिंग्टन सुंदर.
भारत आणि नामिबिया दोन्ही संघ वर्ल्ड कप मोहिमेतील आपला दुसरा सामना एकमेकांविरुद्ध खेळण्यासाठी सज्ज झाले आहेत. नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये या सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. तर 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे.
आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील 18 व्या सामन्यात ए ग्रुपमधील टीम इंडिया विरुद्ध नामिबिया आमनेसामने आहेत. दोन्ही संघांचा हा या पर्वातील दुसरा सामना आहे. उभयसंघातील सामन्याचं आयोजन हे नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. टीम इंडियाने या मोहिमेत यूएसएला पराभूत करत विजयी सलामी दिलीय. त्यामुळे टीम इंडियाचा नामिबियाला पराभूत करुन सुपर 8 फेरीत प्रवेश निश्चित करण्याचा प्रयत्न असणार आहे. तर नामिबियाचे खेळाडू टीम इंडिया विरुद्ध कसे खेळतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.