AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘Virat खराब फॉर्म मध्ये होता, ते चांगलं झालं’, रवी शास्त्री असं का म्हणाले?

सध्या ब्रेक वर असलेला विराट कोहली (Virat kohli) आशिया कप (Asia Cup) स्पर्धेद्वारे पुनरागमन करणार आहे. पुनरागमनाबरोबर विराटच्या फॉर्मवरुनही चर्चा सुरु झाली आहे.

'Virat खराब फॉर्म मध्ये होता, ते चांगलं झालं', रवी शास्त्री असं का म्हणाले?
Ravi ShastriImage Credit source: twitter
| Updated on: Aug 23, 2022 | 3:55 PM
Share

मुंबई: सध्या ब्रेक वर असलेला विराट कोहली (Virat kohli) आशिया कप (Asia Cup) स्पर्धेद्वारे पुनरागमन करणार आहे. पुनरागमनाबरोबर विराटच्या फॉर्मवरुनही चर्चा सुरु झाली आहे. टीम इंडियाचे माजी हेड कोच रवी शास्त्री (Ravi shastri) यांच्या मते, विराट कोहलीला फॉर्म मध्ये परतण्यासाठी फक्त एका इनिंगची आवश्यकता आहे. जर, तो आशिया कपच्या पहिल्या सामन्यात म्हणजे पाकिस्तान विरुद्ध अर्धशतक झळकावलं, तर त्याच्या फॉर्म वरुन सुरु असलेली चर्चाही संपुष्टात येईल. 28 ऑगस्टला पाकिस्तान विरुद्ध 5 आठवड्याच्या ब्रेकनंतर कोहली मैदानावर पुनरागमन करणार आहे.

कोहली योग्यवेळी फॉर्म मध्ये येतो

माजी भारतीय कर्णधार विराट कोहली इंग्लंड दौऱ्यापासूनच ब्रेकवर आहे. वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे विरुद्धच्या मालिकेसाठी त्याला विश्रांती देण्यात आली होती. “कोहली बरोबर अलीकडे माझी चर्चा झालेली नाही. पण तो योग्य वेळी फॉर्म मध्ये येतो. आशिया कप आधी खराब फॉर्म विराट कोहलीसाठी चांगला होता. त्यामुळे त्याला विचार करण्याची चांगली संधी मिळाली. कोहलीने पाकिस्तान विरुद्ध अर्धशतक झळकावलं, तर लोकांची तोंड आपोआपच बंद होतील. एका इनिंग मुळे मोठा फरक पडू शकतो” स्टार स्पोर्ट्स वरील एका कार्यक्रमात रवी शास्त्री यांनी हे आपले विचार मांडले. “विराटला पुनरागमनासाठी फक्त एका इनिंगची गरज आहे. कारण त्याची भूक अजून कमी झालेली नाही. आधी काय झालं, हा इतिहास आहे” असं शास्त्री म्हणाले.

विराट कोहली मशीन

विराट कोहली मशीन आहे. जर त्याने त्याचं डोकं व्यवस्थित ठेवलं, तर पुनरागमनासाठी एक इनिंग पुरेशी आहे. कोहलीने आता कसून सराव केलाय. त्याआधी त्याने कुटुंबासोबत वेळ घालवला. या कॅलेंडर वर्षात कोहलीने सीरीज दरम्यान ब्रेक घेतले आहेत. शास्त्री म्हणाले की, “भारतीय संघात विराट कोहली सर्वात फिट प्लेयर आहे. त्याच्या वर्क एथेटिक्सशी कोणी सामना करु शकत नाही. तो आपल्या बेस्ट फॉर्म मध्ये परत येईल, या बद्दल माझ्या मनात कुठलीही शंका नाही. कोहलीची धावांची भूक आणि संयम अविश्वसनीय आहे”

Follow Us
राजकीय हालचालींना वेग! ठकारेंचे चार खासदार उद्या दिल्लीत, कारण... मोठं
राजकीय हालचालींना वेग! ठकारे सेनेतील चार खासदार उद्या दिल्लीत, कारण... मोठं घडणार?
धक्कादायक! फ्लॅट घेण्यच्या बहाण्याने लव्ह जिहाद? नंतर नशेत तिला...
धक्कादायक! फ्लॅट घेण्यच्या बहाण्याने लव्ह जिहाद? नंतर नशेत तिला... नागपूरमध्ये डोकं चक्रावणारा प्रकार
काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर... गटनेतेपदाचा वाद पुन्हा एकद
Chandrapur | काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर...  गटनेतेपदाचा वाद पुन्हा एकदा चिघळणार
महिलांसाठी सरकारची मोठी घोषणा! बचत गटांना एक लाख रुपये आणि जमीन देणार
Chandrashekhar Bawankule | महिलांसाठी सरकारची मोठी घोषणा! बचत गटांना एक लाख रुपये आणि जमीन देणार
तिच्यासोबत काम करणारेच... संचिताच्या वडिलांना रडूच कोसळं; संशयाचा काटा
Sanchita Ugle Case | तिच्यासोबत काम करणारेच... संचिताच्या वडिलांना रडूच कोसळलं; संशयाचा काटा नेमका कुणावार
एकही मत फुटता कामा नये; महायुतीसाठी एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा व्हीप
एकही मत फुटता कामा नये; विधान परिषद निवडणुकीत महायुतीसाठी एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा व्हीप
उपचाराच्या बहाण्याने डॉक्टरची घृणास्पद कृती; अन् पुढे जे घडलं....
मोठी बातमी! पांढऱ्या कोटामागचा काळा चेहरा? उपचाराच्या बहाण्याने डॉक्टरची घृणास्पद कृती; अन् पुढे जे घडलं....
ऑपरेशन टायगर खरंच सुरू आहे? प्रश्न विचारताच एकनाथ शिंदेंनी हात वर केल
ऑपरेशन टायगर खरंच सुरू आहे? प्रश्न विचारताच एकनाथ शिंदेंनी हात वर केला अन्...त्या कृतीची सगळीकडे चर्चा!
मंदा म्हात्रे यांचे मंत्री गणेश नाईक यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप..
Manda Mhatre | मंदा म्हात्रे यांचे मंत्री गणेश नाईक यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप, भाजपाचे दोन्ही नेत्यांमध्ये मोठा वाद!
मोठी बातमी! पुण्यात भीषण आग; एकापाठोपाठ एक दुकाने...आगीचं कारण काय?
मोठी बातमी! पुण्यात भीषण आग; एकापाठोपाठ एक दुकाने...आगीचं कारण काय?