AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs PAK: तिरंग्यावरुन जय शाह का होतायत ट्रोल?

आशिया कपचा (Asia cup) पहिला सामना खेळणाऱ्या भारताने काल पाकिस्तानवर शानदार विजय मिळवला. या विजयामुळे देशवासियांमध्ये उत्साहाच वातावरण आहे.

IND vs PAK: तिरंग्यावरुन जय शाह का होतायत ट्रोल?
jay shahImage Credit source: twitter
| Updated on: Aug 29, 2022 | 1:28 PM
Share

मुंबई: आशिया कपचा (Asia cup) पहिला सामना खेळणाऱ्या भारताने काल पाकिस्तानवर शानदार विजय मिळवला. या विजयामुळे देशवासियांमध्ये उत्साहाच वातावरण आहे. पाकिस्तानला क्रिकेटच्या मैदानात हरवल्याचा एक वेगळा आनंद असतो. अशा विजयानंतर खरंतर वादविवाद होऊ नयेत, पण राजकीय आरोप-प्रत्यारोपाचा सामना रंगला आहे. काल दुबई मधल्या स्टेडियम मध्ये भारत-पाकिस्तान (IND vs PAK) सामना सुरु होता. त्यावेळी हा सामना पहायला बीसीसीआय सचिव जय शाह उपस्थित होते. ते केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit shah) यांचे सुपूत्र आहेत. चढ-उतारांनी भरलेल्या या सामन्याचा जय शाह यांनी सुद्धा आनंद घेतला. भारताच्या विजयावर त्यांनी सुद्धा सेलिब्रेशन केलं. पण या दरम्यान त्यांच्या एका कृतीवरुन वाद सुरु आहे. सोशल मीडियावर त्यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जातय.

कशावरुन वाद?

भारत-पाकिस्तान सामना सुरु असताना जय शाह प्रेक्षक स्टँड मध्ये उभे होते. त्यावेळी त्यांच्यासोबत उपस्थित असलेल्या व्यक्तींपैकी एकाने त्यांच्याहाती तिरंगा झेंडा देऊ केला. पण जय शाहंनी नकार दिला. हेच व्हिडिओ फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झालय. त्यावरुन विरोधी पक्षाचे नेते, नेटीझन्स त्यांना सुनावतायत. जय शाह बीसीसीआयचे सचिव आहेतच, पण आशियाई क्रिकेट संघटनेचेही ते अध्यक्ष आहेत.

नेटीझन्सनी काय म्हटलय?

“एखाद्या बिगर भाजपा नेत्याने तिरंगा ध्वज हाती घ्यायला नकार दिला असता, तर भाजपाच्या संपूर्ण आयटी विंगने त्याला देशविरोधी ठरवलं असतं. गोदी मीडियाने दिवसभर वादविवाद कार्यक्रम केले असते. नशीबाने तो शेहनशाहचा मुलगा आहे” असं टीआरएस नेत्याने म्हटलं आहे. काहींनी जय शाह यांच्यावर आरएसएसच्या पूर्वजांचा प्रभाव असल्याचं म्हटलं आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या महाराष्ट्र टि्वटर हँडलवरुनही या विषयी टि्वट करण्यात आलं आहे. ‘भारताच्या गृहमंत्र्याच्या मुलाने राष्ट्रध्वज का हाती घेतला नाही?’ असा सवाल केला आहे.

Follow Us
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर.
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले.
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले.
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची..
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची...
LPG गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्री भुजबळ यांची मोठी घोषणा
LPG गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्री भुजबळ यांची मोठी घोषणा.
अवैध गॅस वापरावर धडक कारवाई; सिलेंडर जप्त, हॉटेल चालकावर गुन्हा दाखल
अवैध गॅस वापरावर धडक कारवाई; सिलेंडर जप्त, हॉटेल चालकावर गुन्हा दाखल.
चाळीतून थेट 2 BKHच्या फ्लॅटमध्ये, बीडीडी चाळीतील रहिवाशांना....
चाळीतून थेट 2 BKHच्या फ्लॅटमध्ये, बीडीडी चाळीतील रहिवाशांना.....
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या...
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या....
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना.
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ.