IND vs ZIM: झिम्बाब्वे मध्ये कशी आहे भारताची कामगिरी, जाणून घ्या….

IND vs ZIM: भारतीय संघाने अलीकडेच वेस्ट इंडिज मध्ये दमदार प्रदर्शन केलं. वनडे पाठोपाठ टी 20 सीरीज मध्येही एकतर्फी विजय मिळवला. भारताने दोन्ही सीरीज मध्ये वेस्ट इंडिजला त्यांच्याच घरात हरवलं.

IND vs ZIM: झिम्बाब्वे मध्ये कशी आहे भारताची कामगिरी, जाणून घ्या....
ind vs zimImage Credit source: icc/bcci
Follow us
| Updated on: Aug 12, 2022 | 1:07 PM

मुंबई: भारतीय संघाने अलीकडेच वेस्ट इंडिज मध्ये दमदार प्रदर्शन केलं. वनडे पाठोपाठ टी 20 सीरीज मध्येही एकतर्फी विजय मिळवला. भारताने दोन्ही सीरीज मध्ये वेस्ट इंडिजला त्यांच्याच घरात हरवलं. टी 20 मध्येही त्यांची वाईट स्थिती केली. आता टीम इंडिया झिम्बाब्वे दौऱ्यावर जाणार आहे. इथे तीन सामन्यांची वनडे सीरीज खेळणार आहे. भारताने या सीरीजसाठी अनेक युवा खेळाडूंना संधी दिली आहे. कॅप्टनशिपची जबाबदारी केएल राहुलच्या खांद्यावर आहे. झिम्बाब्वे मध्ये भारताचे आकडे काय सांगतात, हे सीरीज आधी जाणून घेणं, आवश्यक आहे.

भारताने दिग्गज खेळाडूंना आराम दिलाय

झिम्बाब्वे संघाची सध्या जागतिक क्रिकेट मधील कमकुवत संघांमध्ये गणना होते. अलीकडेच या टीमने बांगलादेशवर विजय मिळवला आहे. त्यामुळे निश्चितच त्यांचा आत्मविश्वास उंचावला असणार. आता भारताच्या युवा खेळाडूंनी भरलेल्या संघावर विजय मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. भारताने या सीरीजासाठी आपल्या अनेक दिग्गज खेळाडूंना आराम दिलाय.

आकडे काय सांगतात?

भारताने सर्वप्रथम 1992 साली झिम्बाब्वेचा दौरा केला. त्या दौऱ्यात भारतीय संघ एक मॅच खेळला व 1-0 ने सीरीज जिंकली. त्यानंतर भारतीय संघ 1996-97 साली झिम्बाब्वे दौऱ्यावर गेला. त्यावेळी सुद्धा सीरीज 1-0 ने जिंकली. 1998-99 साली भारताने पुन्हा झिम्बाब्वेचा दौरा केला. या दौऱ्यात झिम्बाब्वेचा संघ एक सामना जिंकण्यात यशस्वी ठरला. उर्वरित दोन वनडे सामने भारताने जिंकले. तीन वनडे सामन्यांची मालिका भारताने 2-1 ने जिंकली. त्यानंतर भारताने 2013 साली झिम्बाब्वेचा दौरा केला. या दौऱ्यात भारतीय संघ पाच सामन्यांची मालिका खेळला. भारताने ही मालिका 5-0 ने जिंकली. 2015-2016 मध्ये भारताने पुन्हा झिम्बाब्वेचा दौरा केला. दोन्ही वेळा तीन सामन्यांची सीरीज भारताने 3-0 अशी जिंकली. म्हणजे आपल्या घरातच झिम्बाब्वेचा संघ भारताविरुद्ध कधी जिंकू शकला नाही.

ओवरऑल हेड टू हेड आकडे

भारत आणि झिम्बाब्वे मध्ये आतापर्यंत एकूण 63 वनडे सामने झाले आहेत. यात भारताची बाजू वरचढ आहे. भारताने 51 सामने जिंकले आहेत. झिम्बाब्वेचा संघ फक्त 10 सामने जिंकू शकला आहे. दोन सामने टाय झाले.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.