AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Team India : टीम इंडियाचं ऑगस्ट महिन्यातील सामन्यांचं वेळापत्रक, आशिया कपआधी कुणाविरुद्ध भिडणार?

Team India August Month Schedule : सप्टेंबर महिन्यात एकूण 8 संघात आशिया कप स्पर्धेचा थरार रंगणार आहे. त्यामुळे आशिया कप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर आशियातील क्रिकेट संघांसाठी ऑगस्टन महिना महत्त्वाचा असणार आहे.

Team India : टीम इंडियाचं ऑगस्ट महिन्यातील सामन्यांचं वेळापत्रक, आशिया कपआधी कुणाविरुद्ध भिडणार?
Team India Huddle TalkImage Credit source: KL Rahul X Account
| Updated on: Jul 28, 2025 | 11:08 PM
Share

टीम इंडिया सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. उभयसंघात 4 कसोटी सामने खेळवण्यात आले आहेत. तर पाचवा आणि अखेरचा सामना हा 31 जुलैपासून खेळवण्यात येणार आहे. टीम इंडियासाठी ऑगस्ट महिना महत्त्वाचा असणार आहे. कारण 9 सप्टेंबरपासून आशिया कप 2025 स्पर्धेला सुरुवात होत आहे. टीम इंडिया आशिया कप स्पर्धेतील आपला पहिला सामना 10 सप्टेंबरला खेळणार आहे. तर टीम इंडिया आशिया कप मोहिमेतील आपल्या दुसऱ्या सामन्यात 14 सप्टेंबरला पाकिस्तान विरुद्ध भिडणार आहे.

इंग्लंड विरुद्धचा पाचवा सामना

भारतीय संघाची ऑगस्ट महिन्यातील सुरुवात इंग्लंड विरूद्धच्या पाचव्या कसोटी सामन्याने होणार आहे. 1 ऑगस्ट हा या पाचव्या कसोटी सामन्यातील दुसरा दिवस असणार आहे. टीम इंडिया या मालिकेत 1-2 ने पिछाडीवर आहे. त्यामुळे भारताला मालिका बरोबरीत सोडवण्यासाठी हा सामना कोणत्याही स्थितीत जिंकावा लागणार आहे. अंतिम सामना बरोबरीत राहिला तरीही इंग्लंड ही मालिका 2-1 ने जिंकेल. त्यामुळे भारतासाठी पाचवा सामना ‘करो या मरो’ असा आहे.

ऑगस्ट महिन्यात टीम इंडियासमोर कुणाचं आव्हान?

टीम इंडिया ऑगस्ट महिन्यात बांगलादेश दौऱ्यात 3 वनडे आणि 3 टी 20i सामन्यांची मालिका खेळणार होती. मात्र बीसीसीआयने या दौऱ्याला स्थिगिती दिली. त्यामुळे आता टीम इंडिया 2026 मध्ये बांगलादेश दौऱ्यावर जाणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे आता श्रीलंका क्रिकेट बोर्डाने बीसीसीआयला टी 20i आणि वनडे सीरिजचा प्रस्ताव दिल्याचं म्हटलं जात आहे. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. मात्र आशिया कप स्पर्धेच्या 1 महिन्याआधी एकही सामना न खेळणं भारताला महागात पडू शकतं. त्यामुळे आता बीसीसीआय श्रीलंकेविरूद्धच्या 2 मालिकांसाठी ग्रीन सिग्नल देणार का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

पाचवा कसोटी सामना कुठे पाहता येणार?

इंग्लंड विरुद्ध इंडिया यांच्यातील पाचवा कसोटी सामना हा टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तर ही मॅच मोबाईलवर जिओहॉटस्टार एपवर पाहायला मिळेल.

महिला ब्रिगेडचे किती सामने?

तसेच भारतीय महिला क्रिकेट संघांचा ऑगस्ट महिन्यात एकही सामना नाही. भारतीय महिला संघ पुढील सामना सप्टेंबर महिन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळणार आहे.

विंडीज विरुद्ध पाकिस्तान टी 20i मालिका

वेस्टइंडिज विरुद्ध पाकिस्तान यांच्यात 1 ऑगस्टपासून 3 सामन्यांची टी 20i मालिका खेळवण्यात येणार आहे. पाकिस्तानसाठी आगामी आशिया कप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर ही मालिका फायदेशीर ठरु शकते. या मालिकेतील तिन्ही सामन्यांना भारतीय वेळेनुसार पहाटे साडे पाच वाजता सुरुवात होईल. त्यानंतर उभयसंघात 8 ते 12 ऑगस्टदरम्यान 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेचा थरार रंगणार आहे.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका

ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात 10 ते 16 ऑगस्ट दरम्यान 3 सामन्यांची टी 20i मालिका खेळवण्यात येणार आहे. त्यानंतर 19 ते 24 ऑगस्टदरम्यान दोन्ही संघात 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका पार पडणार आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.