AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गौतम गंभीरने सूत्र घेताच पहिल्याच दौऱ्यात धक्का, 18 वर्षांनंतर टीम इंडियाचे असे हाल

gautam gambhir head coach: गौतम गंभीरच्या आगमनानंतर टीम इंडियाची कामगिरी खालावली आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा हे एक दशकाहून अधिक काळ भारतीय संघाचे आधारस्तंभ राहिले आहे. परंतु श्रीलंका दौऱ्यात त्यांच्या उपस्थितीत भारतीय संघ विजय होऊ शकला नाही.

गौतम गंभीरने सूत्र घेताच पहिल्याच दौऱ्यात धक्का, 18 वर्षांनंतर टीम इंडियाचे असे हाल
gautam gambhir head coach
| Updated on: Aug 05, 2024 | 8:12 AM
Share

भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदाची सूत्र घेताच भारतीय संघाला धक्का बसला आहे. भारत आणि श्रीलंके दरम्यान झालेल्या दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेने भारताचा लाजीरवाणा पराभव केला. श्रीलंका संघाने दिलेले 241 धावांचे आव्हान टीम इंडिया करु शकली नाही. भारताचा 32 धावांनी लंकेने पराभव केला. या विजयाबरोबर श्रीलंकेने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या दौऱ्यातील पहिला सामना टाय झाला होता. आता तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवशीय सामन्यात भारतीय संघाने दमदार कमगिरी केली तरी ही मालिका 1-1 अशी बरोबरीत सुटणार आहे. दुसरीकडे श्रीलंकेकडे मालिका जिंकण्याची संधी आहे. गौतम गंभीर प्रशिक्षक होताच प्रथमच भारतीय संघाची परिस्थिती केविलवाणी झाली आहे. भारतीय संघ 18 वर्षांनंतर मालिका जिंकू शकणार नाही.

18 वर्षात पहिल्यांदाच…

गौतम गंभीर भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक झाल्यानंतर हा केवळ सहावा सामना आहे. टीम इंडियाचे या दिवसांमध्ये दोन सामने बरोबरीत सुटले आहे. आता 18 वर्षात पहिल्यांदाच वाईट दिवस भारतीय संघाला आले आहे. गेल्या 18 वर्षांपासून भारतीय संघ श्रीलंकेविरुद्धची वनडे मालिका जिंकत आला आहे. 2006 नंतर आता प्रथमच श्रीलंकेविरुद्ध मालिका टीम इंडियाला जिंकता येणार नाही. यापूर्वी, राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली भारत आणि श्रीलंका यांच्यातील वनडे मालिका 0-0 अशी बरोबरीत संपली होती. त्यावेळी देखील टीम इंडिया 3 सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी गेली होती, ज्यामध्ये पावसामुळे तिन्ही सामने रद्द करावे लागले होते. मात्र, यावेळी गंभीरच्या कारकिर्दीत भारत पराभवाच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे.

दोन दिग्गज संघात असताना पराभव

गौतम गंभीरच्या आगमनानंतर टीम इंडियाची कामगिरी खालावली आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा हे एक दशकाहून अधिक काळ भारतीय संघाचे आधारस्तंभ राहिले आहे. परंतु श्रीलंका दौऱ्यात त्यांच्या उपस्थितीत भारतीय संघ विजय होऊ शकला नाही. दोन्ही दिग्गज संघात असताना गेल्या 12 वर्षात पहिल्यांदाच भारतीय संघाला पराभव स्वीकारावा लागला आहे.

श्रीलंका (प्लेइंग इलेव्हन): पाथुम निसांका, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदीरा समरविक्रमा, चारिथ असालंका (कर्णधार), कामिंदू मेंडिस, जेनिथ लियानागे, दुनिथ वेललागे, अकिला दानंजया, असिथा फर्नांडो, जेफ्री वेंडरसे.

भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग

स्लॅब कोसळून 1 ठार, 2 जखमी; CM फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश
स्लॅब कोसळून 1 ठार, 2 जखमी; CM फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश.
हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी, CM फडणवीस संतापले...
हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी, CM फडणवीस संतापले....
जमीन मोजणीदरम्यान वाद; राऊतांनी ट्विट केला नार्वेकरांचा व्हिडिओ
जमीन मोजणीदरम्यान वाद; राऊतांनी ट्विट केला नार्वेकरांचा व्हिडिओ.
सोयाबीन-कापूस आयात होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका
सोयाबीन-कापूस आयात होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका.
दादांची इच्छा पूर्ण करायची होती, पण...
दादांची इच्छा पूर्ण करायची होती, पण....
दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?
दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?.
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?.
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी...
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी....
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल.
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ.