AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

World Cup : बाबर आझने याने कॅप्टनसी सोडावी का? कपिल देव यांच्या वक्तव्याची पाकिस्तानमध्ये चर्चा

Kapil Dev On Babar Azam : वर्ल्ड कपमधून बाहेर झालेला पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझमच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. यावर भारताला पहिला वर्ल्ड कप जिंकून देणारे कपिल देव यांनी पाकिस्तानच्या कर्णधाराबाबत केलेलं वक्तव्य चर्चेचा विषय ठरत आहे.

World Cup : बाबर आझने याने कॅप्टनसी सोडावी का? कपिल देव यांच्या वक्तव्याची पाकिस्तानमध्ये चर्चा
| Updated on: Nov 14, 2023 | 11:33 AM
Share

मुंबई : वर्ल्ड कप 2023मध्ये भारतासह, दक्षिण आफ्रिक, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया हे चार संघ सेमी फायनलमध्ये गेले आहेत. चारही संघ आता वर्ल्ड कप ट्रॉफीसाठी एकमेकांना भिडतील. यंदाच्या स्पर्धेमधून वर्ल्ड कप विनर इंग्लंड, पाकिस्तान या दोन तगड्या संघाना सेमी फायनलमध्ये जागा मिळवता आली नाही. पाकिस्तान संघाचा शेवटच्या सामन्यातही ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाला होता. यानंतर पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझम याच्यावर टीका होत आहे. अशातच बाबरच्या समर्थनार्थ कपिल देव यांनी जाहीरपणे आपली भूमिका मांडली आहे.

काय म्हणाले कपिल यादव?

बाबर आझम याने मागील सहा महिन्यांमागे संघाला नंबर वन बनवलं होतं. पण जेव्हा एखादा खेळाडू झिरो होतो त्यावेळी लोकांची त्याच्याविषयीची मत जाणून घेतलीत तर ९९ टक्के लोकं त्याला संघातून ड्रॉप करतील. पण तेच जर एखादा सामान्य खेळाडू शानदार खेळी करून जाईल त्यावेळी सगळे त्यासा सुपरस्टार बोलतात. पण कधीच चालू कामगिरीवरून कोणत्याही खेळाडूचं मूल्यमापन केलं जावू शकत नाही. कारण त्याने आधी कशा प्रकाराची कामगिरी केलीय ती जाणून घेतली पाहिजे, असं कपिल देव यांनी म्हटलं आहे.

तो खेळाडू कसा खेळतो, त्याच्यात किती जोश आणि टॅलेंट आहे हे पाहिलं पाहिजे. पहिल्या चेंडूवरही तुम्ही आऊट होऊ शकता. जगात असा कोणताही खेळाडू नाही जो पहिल्या चेंडूवर आऊट होऊ शकत नाही, असं कपिल देवने म्हटलं आहे. कपिल देवने बाबर आझमबाबत केलेलं वक्तव्य सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

दरम्यान, कपिल देव यांच्या नेतृत्त्वाखाली भारताने १९८३ साली पहिला वन डे वर्ल्ड कप जिंकला होता. कपिल देवने भारतासाठी 131 कसोटी सामने आणि 225 एकदिवसीय सामने खेळले असून यामधील कसोटीमध्ये 5248 धावा आणि वन डे मध्ये 3783 धावा केल्यात. त्यासोबतच कसोटीमध्ये 434 विकेट आणि वन डे मध्ये 253 विकेट घेतल्या आहेत.

Follow Us
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी.