AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs AUS : टीम इंडियाचा 102 धावांनी धमाकेदार विजय, कांगारुंचा हिशोब क्लिअर

India Women vs Australia Women 2nd ODI Match Result : टीम इंडियाने हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियावर दुसऱ्या सामन्यात विजय मिळवत पहिल्या सामन्यातील पराभवाची अचूक परतफेड केली आहे.

IND vs AUS : टीम इंडियाचा 102 धावांनी धमाकेदार विजय, कांगारुंचा हिशोब क्लिअर
Harmanpreet Kaur Women Team India.jpgImage Credit source: @BCCIWomen X Account
| Updated on: Sep 17, 2025 | 10:26 PM
Share

वूमन्स टीम इंडियाने दुसऱ्या आणि करो या मरो अशी स्थिती असलेल्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध धमाकेदार विजय मिळवला आहे. टीम इंडियाने कांगारुंचा 102 धावांनी धुव्वा उडवला आहे. उपकर्णधार स्मृती मंधाना हीने केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर टीम इंडियाने ऑस्ट्रेलियासमोर 293 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र भारतीय गोलंदाजांसमोर कांगारुंना पूर्ण 50 ओव्हरही टिकता आलं नाही. टीम इंडियाने कांगारुंना 40.5 ओव्हरमध्ये 190 रन्सवर गुंडाळलं. कांगारुंना रोखण्यात क्रांती गौड हीने निर्णायक भूमिका बजावली. क्रांतीने सर्वाधिक सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर इतरांनीही चांगली साथ दिली. टीम इंडियाने या विजयासह पहिल्या पराभवाची परतफेड केली आणि 3 सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरी केली. त्यामुळे उभयसंघात होणारा तिसरा आणि अंतिम सामना चांगलाच रंगतदार होण्याची शक्यता आहे.

ऑस्ट्रेलियाकडून जवळपास 300 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना एकीलाही अर्धशतक करता आलं नाही. ऑस्ट्रेलियासाठी फक्त दोघींनाच 20 पार मजल मारता आली. तर टीम इंडियाने इतरांना 17 धावांच्या आतच रोखलं.

ऑस्ट्रेलियासाठी अनाबेल सदरलँड हीने सर्वाधिक 45 धावा केल्या. तर एलिसा पेरी हीने 44 धावांचं योगदान दिलं. तर इतरांनी भारतीय गोलंदाजांसमोर गुडघे टेकले. टीम इंडियासाठी क्रांती व्यतिरिक्त दीप्ती शर्मा हीने 2 विकेट्स मिळवल्या. तर रेणुका ठाकुर सिंह, स्नेह राणा, अरुंधती रेड्डी आणि राधा यादव या चौघींनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.

टीम इंडियाची बॅटिंग

त्याआधी ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून टीम इंडियाला बॅटिंगसाठी भाग पाडलं. टीम इंडियाने या संधीचा फायदा घेत 290 पार मजल मारली. मात्र टीम इंडिया संपूर्ण 50 ओव्हर खेळू शकली नाही. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला 49.5 ओव्हरमध्ये 292 रन्सवर ऑलआऊट केलं.

ऑस्ट्रेलियाचा 102 धावांनी धुव्वा, टीम इंडिया विजयी

टीम इंडियासाठी स्मृतीने सर्वाधिक धावांचं योगदान दिलं. स्मृती मंधाना हीने शतकी खेळी केली. स्मृतीने 128.57 च्या स्ट्राईक रेटने 91 बॉलमध्ये 117 रन्स केल्या. स्मृतीने या दरम्यान 4 षटकार आणि 14 चौकार लगावले. स्मृती व्यतिरिक्त दीप्ती शर्मा हीने 40 धावांचं योगदान दिलं. रिचा घोष हीने 29, प्रतिका रावल 25 आणि स्नेह राणा हीने 24 धावांचं योगदान दिलं. कॅप्टन हरमनप्रीतला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. हरमनप्रीतने 17 धावा केल्या. तर हर्लीन देओलने 10 धावा जोडल्या. तर इतरांनी दिलेल्या योगदानामुळे भारताने 292 धावांपर्यंत मजला मारली.

दरम्यान भारताने या विजयासह मालिकेत 1-1 ने बरोबरीत साधली आहे. त्यामुळे तिसऱ्या सामन्यासह कोणता संघ मालिका जिंकणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे. अंतिम सामना शनिवारी 20 सप्टेंबरला होणार आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.