AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

GT vs PBKS: पंजाब किंग्सने गुजरात टायटन्सविरुद्धचा सामना नेमका कुठे फिरवला? जाणून घ्या टर्निंग पॉइंट

आयपीएल 2025 स्पर्धेतील पाचवा सामना गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्स यांच्यात पार पडला. हा सामना पंजाब किंग्सने 11 धावांनी जिंकला. पण अतितटीच्या सामना पंजाब किंग्सने गुजरात टायटन्सच्या हातातून कुठे खेचून आणला? चला जाणून घेऊयात सविस्तर

GT vs PBKS: पंजाब किंग्सने गुजरात टायटन्सविरुद्धचा सामना नेमका कुठे फिरवला? जाणून घ्या टर्निंग पॉइंट
श्रेयस अय्यर आणि शुबमन गिलImage Credit source: Punjab Kings Twitter
| Updated on: Mar 26, 2025 | 3:56 PM
Share

आयपीएल 2025 स्पर्धेत पंजाब किंग्सने विजयाने सुरुवात केली आहे. मागच्या काही पर्वात पंजाब किंग्सचं जेतेपदाचं स्वप्न काही पूर्ण झालेलं नाही. फक्त एकदा अंतिम फेरी गाठली आहे. तर एकदा प्लेऑफमध्ये स्थान मिळवलं होतं. या व्यतिरिक्त कायम साखळी फेरीतच आव्हान संपुष्टात आलं आहे. त्यामुळे श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील संघाकडून फार अपेक्षा आहेत. पंजाब किंग्सने पहिल्या सामन्यात गुजरात टायटन्सचा 11 धावांनी पराभव केला. खरं तर विजयासाठी दिलेल्या 243 धावा रोखणं मोठं आव्हान होतं. कारण दुसऱ्या डावात दव पडल्याने गोलंदाजी करणं कठीण होतं आणि सामन्यावरची पकड सैल होते. पण गुजरात टायटन्सने हा सामना कुठे गमावला? माहिती आहे का? नसेल तर त्याबाबत जाणून घ्या. जोस बटलर फलंदाजी करेपर्यंत सामना गुजरातच्या पारड्यात होता. 14 व्या षटकापर्यंत सर्वकाही ठीक होतं. पण नंतर सामना फिरला.

श्रेयस अय्यरने विजय कुमार वैशाखच्या हाती 15वं षटक सोपवलं. वैशाखने या षटकात फक्त पाच धावा दिल्या. या षटकापासून गुजरात टायटन्सवर दबाव वाढत गेला. श्रेयसने पुन्हा एकदा 17वं षटक वैशाखच्या हाती सोपवलं आणि त्यातही फक्त 5 धावा आल्या. त्यामुळे जोस बटलर आणि रूदरफोर्ड पूर्णपणे दडपणाखाली आले. ही टेन्शन कमी करण्याच्या नादात जोस बटलरची 18 व्या षटकात विकेट गेली. ही विकेट मार्को यानसेनला मिळाली पण याचं श्रेय वैशाखला जातं. कारण त्याआधी त्याने केलेल्या दोन षटकांमुळे गुजरातचा संघ बॅकफूटवर गेला होता.

स्थिती नाजूक असताना 19वं षटक वैशाखने दडपण असूनही व्यवस्थित टाकलं. आरपारच्या लढाईत असलेल्या खेळाडूंपासून चेंडू वाइड यॉर्कर ठेवला. त्यामुळे फटकेबाजी करणं कठीण होत होतं. पण 18 आल्या. दुसरीकडे, शेवटच्या षटकासाठी 27 धावा ठेवल्या. शशांक सिंहने सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत श्रेयसच्या या निर्णयाचं कौतुक केलं. ‘श्रेयस वैशाखला आणलं आणि मला वाटते हीच योग्य वेळ होती. त्याने ज्या पद्धतीने गोलंदाजी केली. तशी आम्ही व्यूहरचना आखली होती. खरंच एक चांगला निर्णय होता. त्याने दडपण असताना गोलंदाजी केली. दवही पडलं होतं. मला क्षेत्ररक्षण करताना हे जाणवलं.’ , असं शशांक सिंह म्हणाला.

... तर नार्वेकरांना राजीनामा द्यावा लागेल! राऊतांनी स्पष्टच सांगितलं
... तर नार्वेकरांना राजीनामा द्यावा लागेल! राऊतांनी स्पष्टच सांगितलं.
देशाला गुलामीतून मुक्त करण्यासाठी टिपूने बलिदान दिलं! ओवैसींचं विधान
देशाला गुलामीतून मुक्त करण्यासाठी टिपूने बलिदान दिलं! ओवैसींचं विधान.
माझ्या नादी लागू नका; श्रीकांत शिंदेंचा गणेश नाईकांना इशारा
माझ्या नादी लागू नका; श्रीकांत शिंदेंचा गणेश नाईकांना इशारा.
पुण्यात भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राडा, कार्यकर्ता जखमी
पुण्यात भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राडा, कार्यकर्ता जखमी.
काँग्रेसची अधोगती मतांच्या राजकारणामुळे; श्रीकांत शिंदेंची टीका
काँग्रेसची अधोगती मतांच्या राजकारणामुळे; श्रीकांत शिंदेंची टीका.
तेजस ठाकरेंवर रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरू!
तेजस ठाकरेंवर रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरू!.
सपकाळांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख; भाजप आक्रमक
सपकाळांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख; भाजप आक्रमक.
सपकाळांना महाराष्ट्राचा इतिहास माहित नाही! अतुल सावेंची टीका
सपकाळांना महाराष्ट्राचा इतिहास माहित नाही! अतुल सावेंची टीका.
भाजपकडून हिंदू-मुस्लिम रंग देण्याचं काम! हर्षवर्धन सपकाळांकडून टीका
भाजपकडून हिंदू-मुस्लिम रंग देण्याचं काम! हर्षवर्धन सपकाळांकडून टीका.
हर्षवर्धन सपकाळांच्या विरोधात पुण्यात भाजप- काँग्रेसचे आंदोलक आक्रमक
हर्षवर्धन सपकाळांच्या विरोधात पुण्यात भाजप- काँग्रेसचे आंदोलक आक्रमक.