AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोलकाता नाईट रायडर्सच्या पराभवानंतर अजिंक्य रहाणे वैतागला, पंचांच्या निर्णयाबाबत म्हणाला..

आयपीएल 2025 स्पर्धेत एका चमत्कारासारखा पंजाब किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना झाला. हा सामना सहज कोलकाता जिंकेल असं वाटत होतं. कारण विजयासाठी फक्त 111 धावांचं आव्हान होतं. पण पंजाबच्या गोलंदाजांनी कमाल केली आणि कोलकात्याला 95 धावांवर रोखलं.

कोलकाता नाईट रायडर्सच्या पराभवानंतर अजिंक्य रहाणे वैतागला, पंचांच्या निर्णयाबाबत म्हणाला..
अजिंक्य रहाणेImage Credit source: IPL/BCCI
| Updated on: Apr 15, 2025 | 11:05 PM
Share

आयपीएल इतिहासात सर्वात कमी धावा करून विजय मिळवण्याचा मान आता पंजाब किंग्सला मिळाला आहे. पंजाब किंग्सने प्रथम फलंदाजी करताना फक्त 111 धावांचं आव्हान दिलं होतं. खरं तर आयपीएलमधील फलंदाजी पाहता हे आव्हान सोपं होतं. कोणाला वाटलं नव्हतं की हा सामना पंजाब किंग्स जिंकू शकते. पॉवर प्लेमध्ये केकेआरने 2 गडी गमवून 55 धावा केल्या होत्या. तर तिसरी विकेट ही 62 धावांवर पडली. मात्र त्यानंतर 33 धावांवर 7 विकेट पडल्या आणि सामना 16 धावांनी गमवण्याची वेळ आली. आयपीएल इतिहासात आतापर्यंत इतक्या कमी धावा कोणत्याही संघाला रोखता आलेल्या नाहीत. पण पंजाब किंग्सने ते करून दाखवलं आहे. यापूर्वी 2009 मध्ये चेन्नई सुपर किंग्सने पंजाब किंग्सला विजयासाठी दिलेल्या 116 धावा डिफेंड केल्या होत्या. मात्र हा विक्रम आता पंजाब किंग्सच्या नावावर झाला आहे. कारण पंजाबने 111 धावा डिफेंड केल्या आहेत.

केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणे म्हणाला की, ‘समजावून सांगायला काहीच नाही, तिथे काय घडले ते आपण सर्वांनी पाहिले. प्रयत्नांमुळे खूपच निराशा झाली. मी दोष घेईन, चुकीचा शॉट खेळला, जरी तो गहाळ होता. त्याला फारशी खात्री नव्हती.’ एलबीडब्ल्यू आऊट झाल्यानंतर अंगकृषशी काय बोलणं झालं? तेव्हा अजिंक्य म्हणाला की, ‘तो म्हणाला की हा पंचांचा निर्णय असू शकतो. मला त्यावेळी संधी घ्यायची नव्हती, मलाही खात्री नव्हती. ती चर्चा होती.’

धावांचा पाठलाग करताना डोक्यात नेट रनरेट होता का? त्यावर अजिंक्य रहाणे म्हणाला की, ‘खरंच नाही. आम्ही फलंदाजी युनिट म्हणून खूप वाईट फलंदाजी केली, आम्ही पूर्ण जबाबदारी घेतो. गोलंदाजांनी या पृष्ठभागावर खरोखर चांगली कामगिरी केली, पंजाबच्या मजबूत फलंदाजीला 111 धावापर्यंत मर्यादित केले. एक व्यक्ती म्हणून, तुम्हाला अजूनही आत्मविश्वास आणि सकारात्मक राहावे लागेल. अर्धी स्पर्धा अजून बाकी आहे. यावर उपाय करून पुढे जावे लागते.’

या विजयासह कोलकाता नाईट रायडर्सला मोठा फटका बसला आहे. तर पंजाब किंग्सला फायदा झालं. पंजाब किंग्सने गुणतालिकेत मोठी झेप घेत चौथं स्थान गाठलं आहे. यापूर्वी पंजाब किंग्सचा संघ सहाव्या स्थानावर होता. पंजाब किंग्सने 8 गुण आणि +0.172 नेट रनरेट आहे. तर कोलकाता नाईट रायडर्सचा संघ सहाव्या स्थानावर गेला आहे. पण या पराभवामुळे पुढची स्पर्धा आणखी तीव्र होणार आहे. कोलकाता नाईट रायडर्स 6 गुण आणि +0.547 नेट रनरेटसह सहाव्या स्थानावर आहे.

Follow Us
ज्या घटनेनुसार आमदार, मंत्री झाले, त्याच घटनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित
ज्या घटनेनुसार आमदार, मंत्री झाले, त्याच घटनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करता - कपिल सिब्बल
ठाकरेंची शिंदेंना सर्व पदं...कपिल सिब्बल यांचा कोर्टात 'सुप्रीम'...
ठाकरेंची शिंदेंना सर्व पदं...कपिल सिब्बल यांचा कोर्टात 'सुप्रीम' युक्तिवाद; सुनावणीत काय दाखला दिला?
ठाकरेंची शिवसेना हाच राजकीय पक्ष, सिब्बल यांचा कोर्टात सर्वात मोठा...
ठाकरेंची शिवसेना हाच राजकीय पक्ष, सिब्बल यांचा कोर्टात सर्वात मोठा युक्तिवाद!
शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीत मोठा ट्वीस्ट, निवडणुक आयोगाने...
शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीत मोठा ट्वीस्ट, आमदारांच्या अपात्रतेची वाट पाहयला... कोर्टात नेमका युक्तीवाद काय?
मी आमदारांच्या अपात्रतेबाबत... शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीत...
मी आमदारांच्या अपात्रतेबाबत... शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीच्या सुरुवातीलाच कपिल सिब्बल यांनी मांडला महत्त्वाचा मुद्दा
फडणवीसांना दिल्लीत... CM देवेंद्र फडणवीसांच्या केंद्रात जाण्याबाबत...
फडणवीसांना दिल्लीत... CM देवेंद्र फडणवीसांच्या केंद्रात जाण्याबाबत अमृता फडणवीसांच सर्वात मोठं विधान
हिंजवडीच्या वाहतूक समस्येवर आदित्य ठाकरेंचे लक्ष
आदित्य ठाकरे यांनी केली हिंजवडीतील वाहतूक कोंडी आणि मेट्रो कामाची पाहणी
संजू परब यांचे शिंदे सेना-भाजप संबंधांवर स्पष्टीकरण: वैभव नाईकांना जोर
शिंदे सेना-भाजप संघर्ष आणि निलेश राणे यांच्या कामांवरून वैभव नाईकांना प्रत्युत्तर
पुण्यातील खड्डे, औद्योगिक समस्यांचा पवारांकडून आढावा
पुण्यातील खड्डे, वाहतूक कोंडी आणि औद्योगिक समस्यांवर सुनेत्रा पवारांचे बारिक लक्ष, आढावा घेणार
नाना पटोले यांचा सरकारवर गंभीर आरोप
कुंपणच शेत खातंय.जनतेच्या पैशांची लूट, नाना पटोलेंचा घणाघात