AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MI vs SRH : हार्दिकच्या त्या निर्णयामुळे आमचा पराभव;पॅट कमिन्सने असं का म्हटलं?

Pat Cummins MI vs SRH IP 2025 : पॅट कमिन्स याने पराभवानंतर मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांचं कौतुक केलं. पॅट मुंबईच्या गोलंदाजांबाबत काय म्हणाला? जाणून घ्या.

MI vs SRH : हार्दिकच्या त्या निर्णयामुळे आमचा पराभव;पॅट कमिन्सने असं का म्हटलं?
Pat Cummins Post Match Presentation Ipl 2025Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: Apr 18, 2025 | 1:02 AM
Share

मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या 18 व्या मोसमातील 33 व्या सामन्यात सनराजयर्स हैदराबादला पराभूत केलं. मुंबईने यासह एकूण तिसरा विजय मिळवला. मुंबई विरुद्ध हैदराबाद यांच्यातील सामन्याचं आयोजन हे वानखेडे स्टेडियममध्ये करण्यात आलं होतं. मुंबईने घरच्या मैदानातील सामना 4 विकेट्सने जिंकला. हैदराबादने 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 162 धावा केल्या. मुंबईने प्रत्युत्तरात 18.1 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 166 धावा केल्या. विल जॅक्स हा मुंबईच्या विजयाचा नायक ठरला. विलने बॉलिंग आणि बॅटिंगने योगदान दिलं. विलने 36 धावांची खेळी केली. तर त्याआधी 2 विकेट्सही घेतल्या. मुंबईने हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वात ही कामगिरी केली.

हार्दिकच्या त्या निर्णयाने कमिन्स थक्क

तर दुसऱ्या बाजूला पॅट कमिन्स याच्या नेतृत्वात सनरायजर्स हैदराबादचा हा एकूण पाचवा पराभव ठरला. हैदराबादच्या पराभवानंतर पॅटने प्रतिक्रिया दिली. “ही खेळपट्टी सोपी नव्हती. आम्ही आणखी काही धावा करण्यात अपयशी ठरलो. आम्हाला आणखी काही धावा करायच्या होत्या.फार अवघड विकेट होती. जेव्हा तुम्ही इथे येता तेव्हा सोपी वेगवान खेळपट्टी मिळेल, अशी आशा असते. मात्र तसं होऊ शकलं नाही. त्यांनी (मुंबईने) खरंच चांगली बॉलिंग केली आम्हाला बांधून ठेवलं”, असं म्हणत पॅटने मुंबईच्या गोलंदाजांचं कौतुक केलं. कर्णधार म्हणून पंड्याने हुशारीने गोलंदाजांचा वापर केला आणि हैदराबादला रोखण्यात यश मिळवलं.

“मला वाटलं की आम्ही बेस कव्हर केला आहे. 160 धावा कमी असल्यासारखं वाटतं. आम्ही बॉलिंगने दमदार कामगिरी केली. आम्हाला विकेट पाहिजे, असं वाटलं. आमच्याकडे डेथ बॉलिंगसाठी खूप काही होतं. इमपॅक्ट प्लेअर 1-2 ओव्हर बॉलिंग करु शकेल, हे आम्हाला माहित होतं. त्यामुळे आम्ही राहुलला निवडलं”, असं पॅटने सांगितलं.

पॅटला घरच्या सामन्यांबाबत विश्वास

अंतिम फेरीसाठी घराबाहेरील प्रत्येक सामन्यात चांगलं खेळावं लागेल. दुर्देवाने आतापर्यंत आम्हाला सूर गवसला नाहीय. आमच्याकडे आता काही दिवसांचा अवधी आहे. आम्ही प्रत्येक सामन्याबाबत चचा करतो. मुलांनी पावरप्लेमध्ये चांगला खेळ केला. तसेच बेछूटपणे फटकेबाजी केली नाही. आमचा पुढील सामना घरच्या मैदानात आहे. आम्हाला घरच्या मैदानातील चांगली माहिती आहे”, असं म्हणत पॅटने विश्वास व्यक्त केला.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.