AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पंजाब किंग्सचं पराभवाचं खापर या खेळाडूने स्वत:च्या माथ्यावर फोडलं, म्हणाला…

आयपीएल 2025 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने पंजाब किंग्सचा धुव्वा उडवला आणि जेतेपदावर नाव कोरलं. पंजाब किंग्सचा या सामन्यात फक्त 6 धावांनी पराभव झाला. या पराभवाची वेगवेगळी कारणं आहे. पण आठवडाभरानंतर पंजाब किंग्सच्या एका खेळाडूने पराभवाची जबाबदारी स्वीकारली आहे. अंतिम सामन्यात फक्त 15 धावांची खेळी केल्याचा पश्चातापही त्याने व्यक्त केला.

पंजाब किंग्सचं पराभवाचं खापर या खेळाडूने स्वत:च्या माथ्यावर फोडलं, म्हणाला...
पंजाब किंग्सImage Credit source: IPL/BCCI
| Updated on: Jun 10, 2025 | 8:18 PM
Share

आयपीएल 2025 स्पर्धेचा विजेता ठरून आता आठवडा उलटून गेला आहे. मात्र अंतिम फेरीत पोहोचून पराभवाच्या जखमा मात्र ओल्या आहेत. 17 वर्षानंतर पंजाब किंग्सला जेतेपदाची संधी चालून आली होती. मात्र रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 6 धावांनी विजय मिळवून जेतेपदावर नाव कोरलं. त्यामुळे पंजाब किंग्सचा पहिल्यांदा जेतेपद मिळवण्याचं स्वप्न भंगलं. पंजाब किंग्स हा सामना सहज जिंकेल असं वाटत होतं. मात्र मधल्या काही षटकात सामना फिरला आणि आरसीबीच्या पारड्यात झुकला. या सामन्यात शशांक सिंह सोडून इतर कोणताही फलंदाज आपली छाप सोडू शकला नाही. नेहल वढेराकडून फॅन्सना फार अपेक्षा होत्या. पण मोक्याच्या क्षणी मोठी धावसंख्या उभारण्यास अपयशी ठरला. नेहल वढेराला या सामन्यात फक्त 15 धावा करता आल्या. एक चुकीचा फटका मारून बाद झाला. या सामन्यातील पराभवासाठी नेहल वढेराने स्वत:ला जबाबदार धरलं आहे. तसेच या पराभवाची जबाबदारी स्वीकारली आहे.

नेहल वढेराने एका मुलाखतीत सांगितलं की, ‘मी स्वत:ला दोष देईन. जर मी त्यावेळेस थोडा अधिक चांगला खेळलो असतो तर जिंकलो असतो. मी खेळपट्टीला चुकीचं बोलणार नाही. कारण याच खेळपट्टीवर आरबीने 190 धावा केल्या. मी खेळ आणखी खोलात नेण्याचा प्रयत्न करत होतो. मला जितकं समजत की सामना शेवटच्या षटकापर्यंत नेला की फिनिश करता येतो. त्याच दिवशी मी खेळ फिनिश करू शकलो नाही. यापूर्वी मी स्पर्धेत वेगाने खेळलो होतो. पण अंतिम सामन्यात या गोष्टी माझ्या बाजूने गेल्या नाहीत.’

नेहल वढेराने पुढे सांगितलं की, ‘कधी कधी तुमचा दिवस नसतो. नियमित अंतराने आम्ही विकेट गमावत असल्याने मी शेवटच्या षटकापर्यंत खेळण्याचा प्रयत्न करत होतो याचे मला वाईट वाटत नाही. पण मला वाटते की मी जलद खेळू शकलो असतो जे मी शिकलो आणि समजून घेतले आहे.’ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 20 षटकात 9 गडी गमवून 190 धावा केल्या. तसेच विजयासाठी 191 धावांचं आव्हान दिलं. या सामन्यात पंजाब किंग्सने 184 धावा केल्या. पंजाब किंग्सचा या सामन्यात 6 धावांनी पराभव झाला. नेहल वढेराने 16 सामन्यात 145 पेक्षा जास्त स्ट्राईकने 369 धावा केल्या. तसेच दोन अर्धशतकं झळकावली.

Follow Us
गॅसचे दरवाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दरवाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी.
शहरातही आता चुलींना मागणी वाढली, गॅस सिलिंडर टंचाईवर शोधला उपाय
शहरातही आता चुलींना मागणी वाढली, गॅस सिलिंडर टंचाईवर शोधला उपाय.
खरातवर आणखी दोन गुन्हे दाखल, एकूण गुन्ह्यांची संख्या १०, हवाला रॅकेट..
खरातवर आणखी दोन गुन्हे दाखल, एकूण गुन्ह्यांची संख्या १०, हवाला रॅकेट...
रुपाली चाकणकर यांच्यावर अटकेची टांगती तलवार ? काय म्हणाल्या अंधारे?
रुपाली चाकणकर यांच्यावर अटकेची टांगती तलवार ? काय म्हणाल्या अंधारे?.
'ऑल पार्टी मिटींगला जे उपस्थित नाहीत ते...', राऊत यांची मोदींवर टीका
'ऑल पार्टी मिटींगला जे उपस्थित नाहीत ते...', राऊत यांची मोदींवर टीका.
रत्नागिरीत अवकाळी पावसाचा आंब्यांना फटका, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
रत्नागिरीत अवकाळी पावसाचा आंब्यांना फटका, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान.
'कर्माचे फळ...,' चाकणकरांच्या राजीनाम्यावर दमानिया यांची प्रतिक्रीया
'कर्माचे फळ...,' चाकणकरांच्या राजीनाम्यावर दमानिया यांची प्रतिक्रीया.