AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

RR vs RCB : 14 कोटींच्या रियान परागमुळे राजस्थानचं 25 धावांचं नुकसान, काय केलं ते वाचा

आयपीएल 2025 स्पर्धेतली 42वा सामना राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात सुरु आहे. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 20 षटकात 5 गडी गमवून 205 धावा केल्या आणि 206 धावांचं आव्हान दिलं आहे. यात रियानच्या चुकीमुळे 25 धावांचा फटका बसला आहे.

RR vs RCB : 14 कोटींच्या रियान परागमुळे राजस्थानचं 25 धावांचं नुकसान, काय केलं ते वाचा
रियान परागImage Credit source: IPL/BCCI
| Updated on: Apr 24, 2025 | 10:00 PM
Share

आयपीएल 2025 स्पर्धेत राजस्थान रॉयल्सची स्थिती नाजूक आहे. प्लेऑफमध्ये स्थान मिळवायचं असेल तर प्रत्येक सामन्यात विजय मिळवणं गरजेचं आहे. अशा स्थितीत राजस्थान रॉयल्सचा मैदानावरील वावर हा संघाला या संकटातून बाहेर काढेल असा नाही. कारण आतापर्यंत खेळलेल्या 8 पैकी 2 सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे गुणतालिकेत आठव्या स्थानावर आहे. त्यात कर्णधार संजू सॅमसनला दुखापत झाल्याने बाहेर बसला आहे. त्यामुळे कर्णधारपदाची धुरा रियान परागच्या खांद्यावर आली आहे. पण खेळाडूंची कामगिरी पाहता संघाचा मनोधैर्य खचलं असल्याचं दिसत आहे. या रियान परागने झेल सोडण्याची जणू मालिकाच सुरु केली आहे. यामुळे संघाचं नुकसान होत असल्याचं दिसत आहे.

आयपीएल 2025 स्पर्धेच्या 42 व्या सामन्यात अर्थात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरूद्धच्या सामन्यात रियान परागन अशीच चूक केली. आरसीबी फलंदाजी करत असातना राजस्थान रॉयल्सने वेगवान गोलंदाज फजलहक फारुखीच्या हाती चेंडू सोपवला. संघाचं दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक टाकण्यासाठी आला होता. आरसीबीचा सलामीचा फलंदाज फिल सॉल्ट स्ट्राईकला होता. फिल सॉलन्टने या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर मिड ऑफकडे मारला. तेव्हा हा झेल रियान परागच्या जवळ गेला. त्याने झेल घेण्याचा प्रयत्न केला पण हातात काही बसला नाही.

झेल सोडला तेव्हा फिल सॉल्ट फक्त 1 धाव करून खेळत होता. पण त्यानंतर त्याने 23 चेंडूत 4 चौकार मारत 26 धावा केल्या. तसेच विराट कोहलीसोबत 40 चेंडूत 61 धावांची भागीदारी केली. यामुळे संघाचं 25 धावांचं नुकसान झालं. दरम्यान, रियान परागने या स्पर्धेत आतापर्यंत एकूण 5 झेल घेतले आहेत. तर चार झेल सोडले आहेत. त्यामुळे त्याची झेल पकडण्याची क्षमता ही 55 टक्के आहे. कर्णधार असताना अशी चूक करणं म्हणजे गुन्हाच आहे. दुसरीकडे, फलंदाजीतही रियान पराग काही खास करू शकलेला नाही. आतापर्यंत खेळलेल्या सामन्यात अर्धशतकही ठोकलेलं नाही.

रियान परागचं गचाळ क्षेत्ररक्षण पाहून समालोचन करणाऱ्या सुनील गावस्कर यांनी चिंता व्यक्त केली. त्याच्या कर्णधारपदाचा दबाव असल्याचं सांगितलं. ‘रियान परागसाठी हे पर्व काही चांगलं नाही. त्याच्या कर्णधारपदाचा दबाव त्याच्या क्षेत्ररक्षणावर आहे का? आम्ही कर्णधारपदाच्या दबावात बॅटिंग आणि बॉलिंगवर परिणाम होताना पाहिलं आहे. आता फिल्डिंगही दिसत आहे.’, असं सुनील गावस्कर म्हणाले.

Follow Us
शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीत मोठा ट्वीस्ट, निवडणुक आयोगाने...
शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीत मोठा ट्वीस्ट, आमदारांच्या अपात्रतेची वाट पाहयला... कोर्टात नेमका युक्तीवाद काय?
मी आमदारांच्या अपात्रतेबाबत... शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीत...
मी आमदारांच्या अपात्रतेबाबत... शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीच्या सुरुवातीलाच कपिल सिब्बल यांनी मांडला महत्त्वाचा मुद्दा
फडणवीसांना दिल्लीत... CM देवेंद्र फडणवीसांच्या केंद्रात जाण्याबाबत...
फडणवीसांना दिल्लीत... CM देवेंद्र फडणवीसांच्या केंद्रात जाण्याबाबत अमृता फडणवीसांच सर्वात मोठं विधान
हिंजवडीच्या वाहतूक समस्येवर आदित्य ठाकरेंचे लक्ष
आदित्य ठाकरे यांनी केली हिंजवडीतील वाहतूक कोंडी आणि मेट्रो कामाची पाहणी
संजू परब यांचे शिंदे सेना-भाजप संबंधांवर स्पष्टीकरण: वैभव नाईकांना जोर
शिंदे सेना-भाजप संघर्ष आणि निलेश राणे यांच्या कामांवरून वैभव नाईकांना प्रत्युत्तर
पुण्यातील खड्डे, औद्योगिक समस्यांचा पवारांकडून आढावा
पुण्यातील खड्डे, वाहतूक कोंडी आणि औद्योगिक समस्यांवर सुनेत्रा पवारांचे बारिक लक्ष, आढावा घेणार
नाना पटोले यांचा सरकारवर गंभीर आरोप
कुंपणच शेत खातंय.जनतेच्या पैशांची लूट, नाना पटोलेंचा घणाघात
अभिजीत दिपके यांच्या ठीक करो स्कूल अभियानाला गती
अभिजीत दीपकेंच्या स्कूल अभियानाला गती, मागण्या पूर्ण
बर्णे यांची सरकार, निवडणूक आयोगावर बौद्धिक नक्षलवादावरून टीका
बौद्धिक नक्षलवाद आणि निवडणूक प्रक्रियेतील त्रुटींवर श्यामकुमार बर्णे यांची टीका
चंद्रकांत हंडोरे यांच्या नेतृत्वात जालन्यात मुंडन आंदोलन
जालन्यात भीमशक्ती संघटनेचे मुंडन आंदोलन