IPL 2026, CSK vs LSG: चेन्नईविरुद्ध हातातला सामना गमावल्यानंतर ऋषभ पंत संतापला, सरळ म्हणाला की…
आयपीएल 2026 स्पर्धेतून लखनौ सुपर जायंट्सचं आव्हान संपुष्टात आलं आहे. चेन्नई सुपर किंग्सने 5 विकेट राखून लखनौ सुपर जायंट्सला पराभवाची धूळ चारली. खरं तर शेवटच्या टप्प्यात सामना लखनौच्या पारड्यात झुकला होता. पण काही चुका भोवल्या आणि हातातला सामना गमवावा लागला.

आयपीएल 2026 स्पर्धेच चेन्नई सुपर किंग्सने लखनौ सुपर जायंट्सला 5 विकेट राखून पराभूत केलं. या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 8 गडी गमवून 203 धावा केल्या. तसेच विजयासाठी 204 धावांचं आव्हान दिलं. या धावा चेन्नई सुपर किंग्सने शेवटच्या षटकात पहिल्या दोन चेंडूत पूर्ण केल्या. या विजयासह चेन्नई सुपर किंग्सने पावरप्लेच्या दिशेने कूच केली आहे. तर लखनौ सुपर जायंट्सचं प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्याच्या उरल्यासुरल्या सर्व आशा संपुष्टात आल्या आहेत. आता तीन सामन्यात विजय मिळवला तरी 12 गुण होतील आणि 12 गुण आधीच टॉप 4 मधील संघांनी केल्या आहेत. त्यामुळे लखनौ सुपर जायंट्ससाठी उर्वरित तीन सामने हे औपचारिक असणार आहेत. या पराभवानंतर लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार ऋषभ पंतने संताप व्यक्त केला.
लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार ऋषभ पंत म्हणाला की, ‘मला वाटतं तो एक उत्तम सामना होता. सर्व काही छान जुळून येत होतं. आम्हाला माहित होतं की आम्ही पावर प्लेमध्ये पुरेसा दबाव टाकणार आहोत, कारण जेव्हा तुम्ही तसा सराव करता, तेव्हा तुम्ही अशाच प्रकारच्या क्रिकेटची अपेक्षा करता. पण त्याच वेळी, मला वाटतं की पुरेसा वेळ होता. टी20 क्रिकेटमध्ये क्षेत्ररक्षणाचा दर्जा उच्च असायलाच हवा. खूप झेल सोडले गेले आणि जसं तुम्ही म्हणालात, पण याला फक्त एकाच गोष्टीला दोष देणं कठीण आहे. पण तिथून पुनरागमन करण्यासाठी दाखवलेला उर्विलने कणखरपणा खरोखरच चांगला होता. फक्त हीच एक गोष्ट आहे. उर्विलने आमच्यासाठी इंग्लिससारखीच एक शानदार, अविश्वसनीय खेळी केली. आम्हाला माहित होतं की पावर प्लेमध्ये कोणालातरी ती जबाबदारी घ्यावी लागेल आणि इंग्लिसने आमच्यासाठी तेच केलं. आणि सीएसकेसाठी, तो उर्विल होता. ‘
ऋषभ पंत पुढे म्हणाला की, ‘आम्हाला माहित होते की 200 च्या आसपास, 210 हे एक चांगले लक्ष्य असेल. त्यांनी पावर प्लेमध्ये धडाकेबाज सुरुवात केली. पण त्याच वेळी, आम्हाला हेही माहित होते की खेळ कठीण होत चालला होता आणि पॉवर प्लेनंतर चेंडू जुना होत होता, त्यामुळे खेळपट्टीवर फलंदाजी करणे थोडे अवघड जात होते. शेवटच्या षटकात शहबाजला खेळवण्याचा विचार माझ्या मनात आला, पण दोन डावखुरे फलंदाज फलंदाजी करत असताना, तो एक अवघड निर्णय होता. तुम्हाला अशा खेळाडूला पाठिंबा द्यावाच लागतो जो आमच्यावर मात करू शकेल आणि पुन्हा, गेल्या काही वर्षांत मार्करामने आमच्यासाठी अनेकदा असेच केले आहे.’
