Mumbai Indians : अखेर जिंकले, मुंबई इंडियन्सची 14 वर्षांनतर विजयी सलामी, कॅप्टन हार्दिकने प्रतिक्षा संपवली

Mumbai Indians : मुंबई इंडियन्सने आयपीएल स्पर्धेत अखेरीस 2012 साली हंगामातील पहिला सामना जिंकला होता. त्यानंतर मु्ंबईला गेल्या 14 हंगामात आपला पहिला सामना जिंकता आला नव्हता. मात्र अखेर भारताने ही प्रतिक्षा संपवली आहे.

Mumbai Indians : अखेर जिंकले, मुंबई इंडियन्सची 14 वर्षांनतर विजयी सलामी, कॅप्टन हार्दिकने प्रतिक्षा संपवली
Hardik Padnya Mumbai Indians
Image Credit source: IPL X Account
| Updated on: Mar 29, 2026 | 11:54 PM

 

आयपीएलच्या 19 व्या मोसमातील पहिला सामना 28 मार्चला खेळवण्यात आला. सलामीच्या सामन्यात एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये शनिवारी 28 मार्चला गतविजेत्या आरसीबीने हैदराबादला पराभूत करुन विजयी सुरुवात केली. विराट सर्वाधिक धावा करुन आरसीबीच्या विजयाचा शिल्पकार ठरला. त्यानंतर आता या हंगामातील दुसऱ्या सामन्यात स्पर्धेतील सर्वात यशस्वी पहिली टीम मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स आमनेसामने आहेत. मुंबईने एकूण 5 तर केकेआरने 3 वेळा आयपीएल ट्रॉफीवर आपली मोहोर उमटवली आहे. त्यामुळे या सामन्यात चाहत्यांना चुरस पाहायला मिळणार आहे.

उभयसंघातील सामन्याचं आयोजन हे मुंबई इंडियन्सचं होम ग्राउंड असलेल्या वानखेडे स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. मात्र मुंबईसमोर आपल्याच घरच्या मैदानात आणि पहिल्याच सामन्यात सर्वात मोठं आव्हान आहे. मुंबईने ही संधी गमावली तर पुन्हा 1 वर्ष वाट पाहावी लागणार आहे. मुंबईसमोर असलेलं हे आव्हान नक्की काय आहे? हे आपण जाणून घेऊयात.

Follow Us