IPL 2026 स्पर्धा संपली, वैभव सूर्यवंशी आता मैदानात कधी दिसणार? जाणून घ्या

आयपीएल 2026 स्पर्धेत राजस्थान रॉयल्सचा प्रवास क्वॉलिफायर 2 मध्ये संपला. गुजरात टायटन्सकडून पराभव झाल्याने अंतिम फेरी गाठण्याचं स्वप्न भंगलं. या सामन्यात वैभव सूर्यवंशीने 96 धावांची खेळी केली.

IPL 2026 स्पर्धा संपली, वैभव सूर्यवंशी आता मैदानात कधी दिसणार? जाणून घ्या
IPL 2026 स्पर्धा संपली, वैभव सूर्यवंशी आता मैदानात कधी दिसणार? जाणून घ्या
Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: May 30, 2026 | 6:30 PM

आयपीएल 2026 खऱ्या अर्थाने कोणी गाजवली असेल तर ती 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीने… त्याने आपल्या आक्रमक खेळीमुळे दिग्गज गोलंदाजांची धुलाई केली. लहान आहे असं समजणाऱ्यांना त्याने आपल्या फलंदाजीने बरोबर इंगा दाखवला.. पण दुर्दैवाने राजस्थान रॉयल्सचा प्रवास क्वॉलिफायर 2 मध्ये थांबला. या सामन्यात वैभव सूर्यवंशीने 96 धावांची खेळी केली. पण त्या खेळीवर शुबमन गिलचं शतक भारी पडलं. त्यामुळे वैभव सूर्यवंशी फलंदाजी पाहण्याचा योग कधी येणार असा प्रश्न आहे. कारण वैभव सूर्यवंशी आता थेट आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळताना दिसणार आहे. इतकंच काय तर देशांतर्गत सिझनही लांब आहे. पण वैभव सूर्यवंशीच्या चाहत्यांना फार काही वाट पाहावी लागणार नाही. अवघ्या 10 दिवसांनी वैभव सूर्यवंशीची बॅट तळपताना दिसणार आहे. भारत अ संघाकडून श्रीलंका अ संघाविरूद्धच्या सामन्यात खेळताना दिसेल.

तिलक वर्माच्या नेतृत्वात भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. वैभव सूर्यवंशीला भारत अ संघात जागा मिळाली आहे. त्यामुळे श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात श्रीलंका अ आणि अफगाणिस्तान अ संघासोबत ट्राय नेशन वनडे मालिकेत खेळणार आहे. भारताचा पहिला सामना 9 जून रोजी होणार आहे. त्यानंतर 11 जून रोजी अफगाणिस्तानशी लढत होईल . 15 जून रोजी श्रीलंका अ आणि 17 जून रोजी अफगाणिस्तान अ संघाशी पुन्हा सामना होईल. त्यानंतर 21 जून रोजी अंतिम सामना खेळला जाईल.

श्रीलंका दौऱ्यात वैभव सूर्यवंशी आणि प्रियांश आर्या ओपनिंग करतील. दोघांनी यापूर्वी आशिया कप रायझिंग स्टार स्पर्धेत भारत अ संघासाठी ओपनिंग केली होती. वैभव सूर्यवंशीनेही आपल्या आक्रमक खेळीने लक्ष वधू घेतलं आहे. त्यामुळे या स्फोटक जोडीचा खेळ पाहण्याची उत्सुकता वाढली आहे.

आयपीएल पर्वात वैभवची कामगिरी

आयपीएल 2026 स्पर्धेत वैभव सूर्यवंशीने 16 सामने खेळले. या स्पर्धेत त्याने 48.50 च्या सरासरीने आणि 776 धावा केल्या आहे. आयपीएल पर्वातील ही सर्वाधिक धावसंख्या आहे. तसेच अशी कामगिरी करमारा पहिला अनकॅप्ड खेळाडू आहे. तसेच त्याच्या डोक्यावर ऑरेंज कॅप आहे. जर अंतिम सामन्यात शुबमन गिल आणि साई सुदर्शन धावा करू शकले नाही तर ऑरेंज कॅपचा मानकरी हा वैभव सूर्यवंशी असेल.

Follow Us