AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Karun Nair : करुण नायरला घर वापसीची परवानगी, टीमकडून रिलीज

Karun Nair Released from Team : इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या करुण नायरबाबत मोठी बातमी समोर आहे. त्याला संघाने रिलीज केलं असून त्याची घर वापसी होणार आहे. करुण नायरबाबत ही बातमी वाचून कुठे आनंद, तर कुठे दु:ख झालं आहे.

Karun Nair : करुण नायरला घर वापसीची परवानगी, टीमकडून रिलीज
करुण नायरला घर वापसीची परवानगी, टीमकडून रिलीजImage Credit source: PTI
| Updated on: Jul 22, 2025 | 4:33 PM
Share

देशांतर्गत क्रिकेटमध्ये खोऱ्याने धावा केल्यानंतर करूण नायरला टीम इंडियाचे दरवाजे उघडले. करुण नायर टीम इंडियात पुनरागमनासाठी गेल्या काही वर्षापासून प्रयत्न करत होता. पण आठ वर्षानंतर त्याला भारतीय संघात स्थान मिळालं आहे. मात्र तीन सामन्यांच्या सहा डावात त्याची बॅट काही चालली नाही. दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीत त्याला तिसऱ्या स्थानावर फलंदाजीला पाठवलं. पण तिथेही काही खास करू शकला नाही. असं असताना त्याला चौथ्या कसोटीसाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळेल की नाही याबाबत सांगणं कठीण आहे. असं असताना एक मोठी बातमी समोर आली आहे. करुण नायरला घर वापसीची परवानगी मिळाली आहे. विदर्भ क्रिकेट असोसिएशनने करुण नायरला ना हरकत प्रमाणपत्र दिलं आहे. म्हणजेच करुण नायर आता विदर्भाचा संघ सोडून कर्नाटककडून खेळण्यास सज्ज झाला आहे. करुण नायर मागच्या तीन वर्षांपासून विदर्भ संघासाठी खेळत होता. त्यात त्याने जबरदस्त कामगिरी केली.

करुण नायरसाठी विदर्भाचा संघ लकी ठरला असंच म्हणावं लागेल. कारण त्याने रणजी स्पर्धेतील 16 डावात 53.93 च्या सरासरीने 863 धावा केल्या. यात त्याने एकूण 4 शतकं ठोकली. इतकंच काय तर केरळ विरूद्धच्या अंतिम सामन्यातही शतक ठोकलं. त्याच्या या खेळीच्या जोरावर विदर्भने रणजी ट्रॉफी किताब जिंकला. करुणने रणजीसोबत विजय हजारे ट्रॉफीतही चांगली कामगिरी केली. त्याने या स्पर्धेत सलग पाच शतकं ठोकली. त्याचा स्ट्राईक रेट 120हून अधिक होता. त्याने 8 डावात एकूण 779 धावा केल्या. इतकंच काय तर 542 धावा बिन बाद केल्या आहेत. हा लिस्ट ए मधील मोठा विक्रम आहे.

करुण नायरला इंग्लंड दौऱ्यात स्वत:ला सिद्ध करता आलं नाही. एकीकडे इतर फलंदाज शतकी खेळी करत होते. तेव्हा करूण नायरची बॅट शांत होती. टीम इंडियात पुनरागमन झाल्यानंतर त्याला एकही अर्धशतक ठोकता आलं नाही. पहिल्या सामन्याच्या पहिल्या डावातच तो शून्यावर बाद झाला. मागच्या सहा डावात त्याने 0, 20, 31, 26, 40 आणि 14 धावांची खेळी केली. आता चौथ्या कसोटीत त्याला संधी मिळाली आणि त्याने चांगली कामगिरी केली नाही तर त्याच्यासाठी ही शेवटची कसोटी मालिका ठरू शकते.

Follow Us
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर.
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले.
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले.
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची..
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची...
LPG गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्री भुजबळ यांची मोठी घोषणा
LPG गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्री भुजबळ यांची मोठी घोषणा.
अवैध गॅस वापरावर धडक कारवाई; सिलेंडर जप्त, हॉटेल चालकावर गुन्हा दाखल
अवैध गॅस वापरावर धडक कारवाई; सिलेंडर जप्त, हॉटेल चालकावर गुन्हा दाखल.
चाळीतून थेट 2 BKHच्या फ्लॅटमध्ये, बीडीडी चाळीतील रहिवाशांना....
चाळीतून थेट 2 BKHच्या फ्लॅटमध्ये, बीडीडी चाळीतील रहिवाशांना.....
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या...
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या....
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना.
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ.