Kavya Maran: काव्या मारनच्या फ्रेंचायझीने पाकिस्तानी खेळाडूवर लावला डाव, SRH संघ नेटकऱ्यांच्या रडारवर

The Hundred Auction: द हंड्रेड स्पर्धेच्या नव्या पर्वासाठी लिलाव प्रक्रिया पार पडली. या लिलावात काव्या मारनच्या फ्रेंचायझी सनरायझर्स लीड्सने पाकिस्तानी खेळाडूवर बोली लावली. त्यानंतर सोशल मीडियावर गदारोळ सुरू झाला आहे.

Kavya Maran: काव्या मारनच्या फ्रेंचायझीने पाकिस्तानी खेळाडूवर लावला डाव, SRH संघ नेटकऱ्यांच्या रडारवर
Kavya Maran: काव्या मारनच्या फ्रेंचायझीने पाकिस्तानी खेळाडूवर लावला डाव, SRH संघ नेटकऱ्यांच्या रडावर
Image Credit source: Twitter
| Updated on: Mar 12, 2026 | 8:47 PM

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानसोबतचे सर्व संबंध मोडले आहेत. त्याचा परिणाम आयसीसी क्रिकेट स्पर्धेतही दिसून आला. भारतीय संघाने तर हस्तांदोलन करणंही टाळलं. इतकंच काय तर आशिया कप ट्रॉफी भारतीय संघाने मोहसिन नक्वीच्या हातून घेतली नाही. त्यामुळे पाकिस्तानवर किती राग आहे दिसून येतं. असं असताना काव्या मारनची फ्रेंचायझी द हंड्रेड 2026 स्पर्धेच्या लिलावात पाकिस्तानी खेळाडू खरेदी याचा कोणीही विचार केला नव्हता. काव्या मारनची मालकी हक्क असलेल्या सनरायझर्स लीड्सने पाकिस्तानी फिरकीपटू अबरार अहमदला विकत घेतलं आहे. त्यासाठी फ्रेंचायझीने 2.34 कोटी रूपयांची रक्कम मोजली आहे. त्याच्यासाठी बोली लावताना ट्रेंट रॉकेट्स संघ स्पर्धेत होता. पण शेवटी सनरायझर्स हैदराबादने मोठी बोली लावली आणि अबरारला आपल्या संघात घेतलं. पण पाकिस्तानी खेळाडू खरेदी केल्याने आता काव्या मारनची फ्रेंचायझी रडारवर आली आहे. सनरायझर्स लीड्सचा निर्णय लज्जास्पद असल्याचं सांगितलं आहे.

सनरायझर्स लीड्सने पाकिस्तानी खेळाडूसाठी बोली लावली आणि त्याला संघात घेतल्याने सोशल मीडियावर रान पेटलं आहे. काव्या मारन आणि तिच्या द हंड्रेड फ्रेंचायझीवर लोकांनी संताप व्यक्त केला आहे. इतकंच काय तर काही जणांनी तर आयपीएल फ्रेंचायझी सनरायझर्स हैदराबादवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. अबरार अहमद 2009 नंतर भारतीय संघाच्या मालकाने खरेदी केलेला पहिला पाकिस्तानी क्रिकेटपटू आहे. त्यामुळे हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. बांगलादेशसोबतचे संबंध बिघडल्यानंतर आयपीएलमधून मुस्तफिझुर रहमानला काढलं होतं. त्यामुळे वाद होणार हे आता तितकंच खरं आहे.

अबरार अहमद टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत फेल गेला. त्याने 4 सामन्यात फक्त 6 विकेट घेतल्या. त्याचा इकोनॉमी रेटही काही खास नव्हता. भारत पाकिस्तान सामन्यात त्याने 38 धावा दिल्या आणि त्याला एकही विकेट मिळाली नाही. असं असताना त्याच्यासाठी बोली लावणं हे काय भारतीय क्रीडाप्रेमींना रूचलं नाही. त्यामुळे आता विरोधाची आणखी तीव्र होणार यात काही शंका नाही.

Follow Us