AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

KKR vs GT: 4 आठवडे 34 सामन्यानंतर IPL 2022 मध्ये बदलला ट्रेंड, हार्दिकच्या एका निर्णयाने सर्वांनाच सोडलं चक्रावून

KKR vs GT: 26 मार्चला वानखेडे स्टेडियमवर सुरु झालेला हा ट्रेंड 22 एप्रिलपर्यंत कायम राहिला. म्हणजे कालच्या दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्सच्या सामन्यापर्यंत हा ट्रेंड कायम होता.

KKR vs GT: 4 आठवडे 34 सामन्यानंतर IPL 2022 मध्ये बदलला ट्रेंड, हार्दिकच्या एका निर्णयाने सर्वांनाच सोडलं चक्रावून
GT captain Hardik pandya Image Credit source: BCCI
| Updated on: Apr 23, 2022 | 4:48 PM
Share

मुंबई: हार्दिक पंड्याच्या (Hardik Pandya) गुजरात टायटन्सने (Gujarat Titans) डेब्यूमध्येच जबरदस्त प्रदर्शन करुन सर्वांना प्रभावित केलं आहे. आतापर्यंत खेळल्या गेलेल्या सात पैकी फक्त एकाच सामन्यात गुजरात टायटन्सचा पराभव झाला आहे. डेब्युमध्ये हार्दिक पंड्याच्या कॅप्टनशिपची सर्वत्र चर्चा आहे. आज गुजरात टायटन्सचा कॅप्टन हार्दिक पंड्याने एक असा निर्णय घेतला, ज्याने सर्वांनाच चक्रावून सोडलं आहे. आयपीएलची (IPL) 26 मार्चला सुरुवात झाली. लवकरच या स्पर्धेला एक महिना पूर्ण होईल. हार्दिक पंड्याने आज एक वेगळा निर्णय घेतला. असा निर्णय घेणारा हार्दिक पहिला कॅप्टन आहे. हार्दिकने आज टॉस जिंकून पहिली फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आयपीएल 2022 चा कोलकाता नाइट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्समध्ये पहिला सामना झाला होता. त्या सामन्यात केकेआरचा कॅप्टन श्रेयस अय्यरने टॉस जिंकून पहिली गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

त्यानंतर प्रत्येक कॅप्टनने श्रेयस सारखाचा निर्णय घेतला

दुसऱ्या डावात दवामुळे गोलंदाजी करणं मुश्किल असतं, म्हणून हा निर्णय घेतला, असं श्रेयस अय्यरने सांगितलं होत. प्रथम गोलंदाजी करण्याच्या निर्णयाचा केकेआरला फायदा झाला होता. त्यांनी सामना जिंकला होता. त्यानंतर प्रत्येक संघाच्या कॅप्टनने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

चार आठवडे ट्रेंड कायम

26 मार्चला वानखेडे स्टेडियमवर सुरु झालेला हा ट्रेंड 22 एप्रिलपर्यंत कायम राहिला. म्हणजे कालच्या दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्सच्या सामन्यापर्यंत हा ट्रेंड कायम होता. म्हणजे चार आठवडे आणि 34 सामने होईपर्यंत कुठल्याही कॅप्टनने टॉस जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला नाही. पण पहिल्यांदाच आयपीएलमध्ये कॅप्टनशिप करणाऱ्या हार्दिक पंड्याने हा ट्रेंड तोडला. शनिवारी म्हणजे आज 23 एप्रिलला डी.वाय.पाटील स्टेडियमवर कोलकाता विरुद्धच्या सामन्यात हार्दिकने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

केकेआरने टीममध्ये केले तीन बदल

हार्दिक पंड्या दुखापतीमुळे मागचा सामना खेळला नव्हता. आज विजय शंकरच्या जागी तो संघात आला. गुजरातची सुरुवात चांगली झाली नाही. शुभमन गिल दुसऱ्याच षटकात अवघ्या सात रन्सवर आऊट झाला. कोलकाताने या सामन्यात तीन बदल केले आहेत. एरॉन फिंच, शेल्डन जॅक्सन आणि पॅट कमिन्स यांना बाहेर बसवलय. त्यांच्याजागी टिम साउदी, सॅम बिलिंग्स आणि रिंकू सिंहला संधी दिली आहे.

Follow Us
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या राजकीय हालचाली!
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... -प्रियांका गांधी
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... नीट पेपरफुटीवर बोलताना प्रियंका गांधी हे काय बोलून गेल्या?
मंत्री-सचिव सगळेच घामाघुम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण..
मंत्री-सचिव सगळ्यांनाच फुटला घाम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण खातं...
विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल
Priyanka Gandhi | विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल; लाठीचार्जवरून मोदी-शहांकडे मागितलं उत्तर
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह...
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली मोठी अपडेट
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत बैठक
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत उच्चस्तरीय बैठक, ईराण-अमेरिका तणावादरम्यान...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे; मुख्यमंत्री फडणवीसांचे पोलिसांना तातडीचे आदेश
पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर
मोठा खुलासा! पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर एकच खळबळ
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास...
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास... गुलाबराव पाटलांचं विधान तुफान चर्चेत
उत्तम शिंदेंविरोधात गुन्हा दाखल; सहकारी संघाच्या इमारतीवर बेकायदेशीर..
मोठी कारवाई! शिंदेंविरोधात गुन्हा दाखल; सहकारी संघाच्या इमारतीवर बेकायदेशीर ताब्याचा आरोप