AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MI vs KKR IPL 2022 Match Head to Head: मुंबई विरुद्ध कोलकाता सामन्यात कोणाचं पारडं जड, पाहा आतापर्यंतची आकडेवारी

आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघांपैकी एक मानल्या जाणाऱ्या मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) सध्याचा हंगाम आतापर्यंत चांगला गेला नाही. आयपीएल 2022 (IPL 2022) मध्ये या संघाने आतापर्यंत दोन सामने खेळले आहेत आणि दोन्ही सामन्यांमध्ये त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं आहे.

MI vs KKR IPL 2022 Match Head to Head: मुंबई विरुद्ध कोलकाता सामन्यात कोणाचं पारडं जड, पाहा आतापर्यंतची आकडेवारी
Mumbai Indians vs Kolkata Knight Riders Image Credit source: IPL
| Updated on: Apr 06, 2022 | 12:43 PM
Share

मुंबई : आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघांपैकी एक मानल्या जाणाऱ्या मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) सध्याचा हंगाम आतापर्यंत चांगला गेला नाही. आयपीएल 2022 (IPL 2022) मध्ये या संघाने आतापर्यंत दोन सामने खेळले आहेत आणि दोन्ही सामन्यांमध्ये त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. मुंबईबद्दल असं म्हटलं जातं की हा संघ धिमी सुरुवात करतो आणि नंतर वेग पकडतो. मुंबईचा असा खेळ यापूर्वी आपण अनेकदा पाहिला आहे. असे अनेक मोसम आले ज्यात मुंबईच्या संघाची सुरुवात खूपच खराब झाली आणि त्यानंतर या संघाने पुनरागमन करत प्लेऑफमध्ये स्थान मिळवले. या हंगामातही संघाच्या चाहत्यांना अशाच कामगिरीची अपेक्षा असेल. मोसमातील तिसऱ्या सामन्यात या संघाचा सामना कोलकाता नाईट रायडर्सशी (Kolkata Knight Riders) होत आहे.

आयपीएलचा यंदाचा हंगाम मुंबईसाठी वाईट गेला असला तरी कोलकात्याने यंदाच्या मोसमाची दिमाखात सुरुवात केली आहे. कोलकात्याने आत्तापर्यंत तीन सामने खेळले असून या तीन सामन्यांपैकी दोन जिंकले आहेत आणि एका सामन्यात त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. गुणतालिकेत हा संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. मुंबईविरुद्ध कोलकाता आपला फॉर्म कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल आणि विजय मिळवत पहिल्या क्रमांकावर पोहोचेल. मात्र उभय संघांमधील आकडेवारी पाहिली तर कोणीही म्हणेल की मुंबईला हरवणं कोलकात्यासाठी खूप अवघड आहे.

हेड डू हेड मध्ये मुंबईचं पारडं जड

या दोन संघांमध्ये आतापर्यंत झालेल्या सामन्यांबद्दल बोलायचे झाले तर मुंबईचे पारडे जड आहे. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण 29 सामने खेळवण्यात आले आहेत. त्यापैकी 22 सामने मुंबईने जिंकले आहेत, तर केवळ सात सामने कोलकात्याच्या खात्यात गेले आहेत. हे आकडे मुंबईला आत्मविश्वास देण्यासाठी आणि कोलकात्याला घाबरवण्यासाठी पुरेसे आहेत. मात्र, सध्याचा फॉर्म पाहता कोलकात्याचा संघ मजबूत दिसत आहे.

मागील 5 सामन्यांमधील उभय संघांची कामगिरी

या दोन्ही संघांमधील गेल्या पाच सामन्यांचे निकाल पाहिले तरी मुंबईचाच वरचष्मा पाहायला मिळाला आहे. कोलकात्याने गेल्या पाचपैकी केवळ एकच विजय मिळवला आहे. या दोन संघांमध्ये झालेल्या अखेरच्या सामन्यात कोलकात्याच्या संघाने विजय मिळवला होता. अबुधाबीमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात कोलकात्याने सात विकेट्सने विजय मिळवला. तर त्याआधीच्या चार सामन्यांत मुंबईने बाजी मारली होती.

इतर बातम्या

Virat Kohli Runout IPL 2022: सॅमसनचा सुपरमॅन थ्रो, चहलची चालाकी आणि विराट RUNOUT पहा VIDEO

IPL 2022 points table : राजस्थान पराभवानंतरही पहिल्या स्थानी, IPLमध्ये कुठला संघ कुठल्या स्थानावर जाणून घ्या…

IPL 2022, Orange Cap : इशानची सत्ता गेली, ऑरेंज कॅपवर आता ‘बटलर’राज, पर्पल कॅपच्या यादीतही बदल

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.