AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोहम्मद सिराजसाठी पाकिस्तानमध्ये राडा, Live कार्यक्रमात माजी क्रिकेटपटू भिडले; पाहा व्हिडीओ

भारत इंग्लंड कसोटी मालिका संपून दोन दिवस उलटले आहेत. पण अजूनही या मालिकेची चर्चा रंगली आहे. पाचव्या कसोटी सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने जबरदस्त कामगिरी केली. त्याच्या कामगिरीवरून पाकिस्तानात राडा झाला. काय ते जाणून घ्या..

मोहम्मद सिराजसाठी पाकिस्तानमध्ये राडा, Live कार्यक्रमात माजी क्रिकेटपटू भिडले; पाहा व्हिडीओ
मोहम्मद सिराजसाठी पाकिस्तानमध्ये राडा, Live सामन्यात माजी क्रिकेटपटू भिडले; पाहा व्हिडीओImage Credit source: PTI
| Updated on: Aug 06, 2025 | 3:28 PM
Share

अँडरसन तेंडुलकर कसोटी मालिकेत भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याने चमकदार कामगिरी केली. त्याने या मालिकेत सर्वाधिक विकेट घेण्याचा मान मिळवला. त्याने एकूण 23 विकेट घेतल्या. त्याच्या कामगिरीचं आता सर्वत्र कौतुक होत आहे. पण पाकिस्तानमध्ये एका लाईव्ह कार्यक्रमात त्याच्यावरून राडा झाल्याचं पाहायला मिळालं. दोन माजी पाकिस्तानी क्रिकेटपटूंनी त्याच्यावरून वादाला पेटले. पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज तन्वीर अहमद पाकिस्तानसाठी 8 आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे. पण त्याच्या दृष्टीने मोहम्मद सिराज हा कसोटीचा गोलंदाज नाही. यावरूनच लाईव्ह सामन्यात माजी क्रिकेटपटू आसिफ खानसोबत त्याचा वाद झाला. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

नेमकं काय झालं ते जाणून घ्या

पाकिस्तानच्या पीटीव्ही स्पोर्ट्सवर ओव्हल कसोटी सामन्याचं विश्लेषण सुरु होतं. या कार्यक्रमात पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू तन्वीर अहमदने सांगितलं की, ओव्हल कसोटी सामन्यात भारतीय गोलंदाज एकाच ठिकाणी गोलंदाजी करत होते. सिराजने चांगली गोलंदाजी केली. या कार्यक्रमाचं अँकरिंग डोमेस्टिक क्रिकेट खेळणारा आसिफ खान करत होता. त्याने तन्वीरला विचारलं की, तू तर सिराजला कसोटी बॉलर मानत नाही. त्यावर तन्वीरने सांगितलं की, सिराज त्या लेव्हलचा गोलंदाज नाही. यावर आसिफने विचारलं की, तुझी काय लेव्हल आहे?

असं विचारताच तन्वीर अहमद भडकला आणि सांगितलं की माझं स्टँडर्ड पाकिस्तान आहे. मी पाकिस्तानसाठी क्रिकेट खेळलो आहे. यानंतर माजी क्रिकेटपूट तन्वीर आसिफला विचारलं की, तुझी काय लेव्हल आहे? तेव्हा आसिफने सांगितलं की ते सोडून दे. मला 20-22 वर्षे पत्रकारिता करून झाले. यावर तन्वीरने सांगितलं की, माझं क्रिकेटसोबत इतक्याच वर्षाचं नात आहे. यानंतर खूपच वादावादी झाली. या वादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तन्वीर अहमदने यापूर्वी देखील भारताविरुद्ध गरळ ओकली आहे.

टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर तन्वीर अहमदने असंच वादग्रस्त विधान केलं होतं. त्याने युट्यूब चॅनेलवर सांगितलं होतं की, भारताने ही ट्रॉफी कचऱ्याच्या पेटीत फेकली पाहीजे. कारण त्याचा काही फायदा नाही. त्याने आयसीसीचे चेअरमन जय शाह यांच्यावर खेळपट्टी भारताच्या बाजूने केल्याचा आरोप केला होता. इतकंच काय आयपीएल 2025 स्पर्धा फिक्स असल्याचा आरोप केला होता.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.