AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Indians : सलग 5 वेळेस पराभूत होऊनही चॅम्पियन बनू शकतो इंडियन्स, फक्त हा फॉर्म्यूला वापरावा लागेल?

आयपीएलच्या 15व्या सीजनमध्ये सलग पाचवेळा मुंबई इंडियन्स पराभूत झाला आहे. मात्र, एक फॉर्म्यूला असा आही की त्याने मुंबई इंडियन्सला सहज यश मिळू शकतं. तो फॉर्म्यूला आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Mumbai Indians : सलग 5 वेळेस पराभूत होऊनही चॅम्पियन बनू शकतो इंडियन्स, फक्त हा फॉर्म्यूला वापरावा लागेल?
मुंबई इंडियन्स कॅप्टन रोहित शर्मा Image Credit source: PTI
Shubham Kulkarni
Shubham Kulkarni | Updated on: Apr 14, 2022 | 12:05 PM
Share

मुंबई : आयपीएलच्या (IPL) पंधराव्या सीजनमध्ये मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) पाच सामने खेळून देखील एकाही सामन्यात विजयी होऊ शकलेला नाही. या मुंबई इंडियन्सच्या (MI) आयपीएलमधील खालच्या दिशेला चाललेल्या प्रवासाकडे अनेक क्रीडा क्षेत्रातील तज्ज्ञ चिंता व्यक्त करतायेत. यावरुन संघातील काही खेळाडूंच्या सुमार कामगिरीवरही बोललं जातंय. या संघाने आतापर्यंत तब्बल पाचवेळा आयपीएलचं जेतेपद पटकावलंय. मात्र, अशातच 2015 चा फॉर्म्यूला जर रोहित शर्माने वापरला तर पुन्हा मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये पोहचू शकतो. तो फॉर्म्यूला नेमका काय आहे?, 2015 मध्ये भारताने म्हणजेच रोहित शर्माने असा कोणता फॉर्म्यूला वापरला होता की त्यात इंडियन्सला मोठं यश मिळालं? हाच फॉर्म्यूला आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. हा फॉर्म्यूला वापरून मुंबई इंडियन्स सहज जेतेपद मिळवू शकतो.

MI संघ सर्वात तळाला

दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथ याने काय म्हटलं त्यापूर्वी कालच्या म्हणजेच बुधवारी पंजाब किंग्ससोबत झालेल्या सामन्यात मुंबईने काय केलंय, त्यावर एक नजर टाकूया. पंजाबने बुधवारी मुंबई इंडियन्सला 12 धावांनी नमवलं. मुंबईला विजयासाठी 199 धावांचं टार्गेट मिळालं होतं. पण मुंबई इंडियन्सला निर्धारीत 20 षटकात नऊ बाद 186 धावाच करता आल्या. मेगा ऑक्शननंतर मुंबई इंडियन्सने नव्याने संघ बांधणी केली आहे. पण अजूनही या संघाची घडी बसलेली नाही. मुंबई इंडियन्सची टीम अजूनही चाचपडतेय. पहिल्या विजयासाठी मुंबई इंडियन्सला सहाव्या सामन्याची प्रतिक्षा करावी लागणार आहे. गुणतालिकेत मुंबईचा संघ सर्वात तळाला आहे. मुंबई इंडियन्सच्या या स्थितीवर कोणाला विश्वास बसणार नाही, पण हे आजचं वास्तव आहे.

2015च्या फॉर्म्यूल्याची गरज

2022 मधील आयपीएलच्या पंधराव्या सीजनमध्ये एक मोठा बदल झाला आहे. या सीजनमध्ये आयपीएलचे एकूण दहा संघ झाले आहेत. 2015 मध्ये आपयपीएलचे फक्त आठ संघ होते. आता दहा संघ असून देखील एका संघाला चौदा चौदा सामने खेळावे लागणार आहे. अशातच सलग पाच सामने हरलेल्या मुंबई संघाला आयपीएलच्या पंधराव्या सीजनमध्ये सेमी फायनलपर्यंत पोहचायचं आहे तर इंडियन्सला 2015चा फॉर्म्यूला वापरावा लागेल. त्यावेळी देखील इंडियन्स पहिल्या सहा सामन्यात सुरुवातीला फक्त एकच सामना जिंकला होता. त्यानंतर रोहित शर्माच्याच नेतृत्वात संघाने चांगला विजय मिळवला. प्लेऑफ पोहचून त्यावेळी इंडियन्सने दुसऱ्यांदा जेतेपद पटकावलं होतं. तो फॉर्म्यूला यंदा वापरल्यास इंडियन्स पुढील सामने सहज जिंकू शकतो. मुंबई इंडियन्स उरलेले नऊ सामन्यातील एक किंवा दोन सामने पराजीत होत असेल तर इंडियन्सला नेट रनरेट आणि इतर संघांच्या विजय-पराजयावर अवलंबून रहावं लागेल.

इतर बातम्या

Pune crime : मावशीसह करत होता घरफोड्या, गुन्हे शाखेच्या पथकानं ठोकल्या बेड्या; लोणी काळभोरमधला प्रकार

Photo Gallery | मायेचा सोहळाः नाशिकमध्ये बिबट्या आई आणि पिल्लाची वनविभागाने घडवली भेट

उन्हाळ्यातील पुरळांची समस्या दूर करण्यासाठी हे घरगुती उपाय फायदेशीर, वाचा अधिक!

Follow Us
पंडित नेहरुंचा कार्यकाळ बारा नाहीतर सोळा वर्षांचा... संजय राऊतांनी
पंडित नेहरुंचा कार्यकाळ 12 नाहीतर 16 वर्षांचा... संजय राऊतांनी मांडलं गणित, काय म्हणाले?
जगातील सर्वात मोठ्या FIFA World Cup ला सुरुवात; भारत World Cup बाहेर?
FIFA World Cup 2026 | जगातील सर्वात मोठ्या FIFA World Cup ला सुरुवात; 104 सामन्यांचा रंगणार थरार, पण भारत पुन्हा World Cup बाहेर?
ब्रेक फेल नव्हता! दादर बेस्ट बस अपघातात RTO चा मोठा खुलासा
ब्रेक फेल नव्हता! दादर बेस्ट बस अपघातात RTO चा मोठा खुलासा; नेमकं कारण आलं समोर
मान्सूनचा मुंबईला दगा! 11 जून उलटला, तरी पावसाचा थेंबही नाही
Mumbai Weather | मान्सूनचा मुंबईला दगा! 11 जून उलटला, तरी पावसाचा थेंबही नाही; उकाड्याने मुंबईकर हैराण
खरातच्या टेबलवर महिला देवाच्या नावाखाली... रुपाली ठोंबरेंना राग अनावर,
खरातच्या टेबलवर महिला देवाच्या नावाखाली... रुपाली ठोंबरेंना राग अनावर, चाकणकरांच्या नोटीसला थेट चॅलेन्ज
पंतप्रधान मोदी म्हणजे...एकनाथ शिंदेंचा शायराना अंदाज; केल तोंडभरून कौत
Video | पंतप्रधान मोदी म्हणजे...एकनाथ शिंदेंचा शायराना अंदाज; केल तोंडभरून कौतुक, काय म्हणाले?
एकच खळबळ! काँग्रेसच्या अत्यंत विश्वासू नेत्याचा अर्ज बाद झाल्याने...
एकच खळबळ! काँग्रेसच्या अत्यंत विश्वासू नेत्याचा अर्ज बाद झाल्याने समर्थक आक्रमक
ज्याची भीती तेच घडलं! पश्चिम बंगालमध्ये मोठा उलटफेर, शत्रुघ्न सिन्हा
ज्याची भीती तेच घडलं! पश्चिम बंगालमध्ये मोठा उलटफेर, शत्रुघ्न सिन्हासह दिग्गज चेहऱ्यांनी सोडली TMCची साथ?
परप्रांतीयाकडून वृद्धाला बेदरम मारहाण होताच सरकार अॅक्शन मोडमध्ये,
परप्रांतीयाकडून वृद्धाला बेदरम मारहाण होताच सरकार अॅक्शन मोडमध्ये, एकनाथ शिंदे यांचा मोठा आदेश, आता...
पोहायला गेले अन् मृत्यूने गाठलं! जगबुडीच्या डोहात तिघांचा दुर्दैवी अंत
पोहायला गेले अन् मृत्यूने गाठलं! जगबुडीच्या डोहात तिघांचा दुर्दैवी अंत