AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ENG vs IND : टीम इंडिया 35 वर्षांची प्रतिक्षा संपवणार? मँचेस्टरमध्ये मोठं आव्हान

England vs India 4th Test : भारतीय क्रिकेट संघ इंग्लंड विरूद्धच्या 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-2 ने पिछाडीवर आहे. त्यामुळे भारतासमोर चौथ्या सामन्यात विजय मिळवून मालिकेत 2-2 ने बरोबरी साधण्याचं आव्हान असणार आहे.

ENG vs IND : टीम इंडिया 35 वर्षांची प्रतिक्षा संपवणार? मँचेस्टरमध्ये मोठं आव्हान
Yashasvi Jadeja and Shubman Team IndiaImage Credit source: PTI
| Updated on: Jul 18, 2025 | 5:12 PM
Share

मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड हे इंग्लंडमधील अनेक जुन्या स्टेडियमपैकी एक आहे. या स्टेडियममध्ये 23 जुलैपासून इंग्लंड विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. या स्टेडियमध्ये इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात गेली अनेक वर्ष सामना झालेला नाही. भारतासाठी या स्टेडियममध्ये चांगल्या आठवणी नाहीत. भारताला या मदैानात आतापर्यंत एकही सामना जिंकता आलेला नाही. इतकंच काय तर भारतीय फलंदाजांना गेल्या 3 दशकांपासून शतकही करता आलेलं नाही.

टीम इंडियाने या मैदानात 2019 साली सर्वात मोठा सामना हा आयसीसी वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत खेळला होता. भारताला तेव्हा उपांत्य फेरीत न्यूझीलंडकडून पराभूत व्हावं लागलं होतं. मात्र भारताने या स्पर्धेत पाकिस्तानावर याच मैदानात अविस्मरणीय असा विजय मिळवला होता. रोहित शर्माने पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात शतक केलं होतं. तर त्यानतंर ऋषभ पंत याने 2022 साली एकदिवसीय सामन्यात शतक केलं होतं.

1990 पासून प्रतिक्षा कायम

भारतीय फलंदाजांनी या मैदानात एकदिवसीय सामन्यांमध्ये शतक केलं आहे. मात्र कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय फलंदाज काही खास करु शकले नाहीत. भारताला या मैदानात कसोटी सामना जिंकता आलेला नाही. तसेच एकाही फलंदाजाला गेल्या अनेक वर्षांपासून शतकही करता आलेलं नाही. या मैदानात भारताकडून 1990 साली कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन याने शतक केलं होतं. अझरुद्दीने सामन्यातील पहिल्या डावात शतक केलं होतं. तर दुसऱ्या डावात 17 वर्षीय युवा सचिन तेंडुलकर याने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील पहिलंवहिलं शतक ठोकलं होतं.

35 वर्षांची प्रतिक्षा संपणार?

अझरुद्दीन आणि तेंडुलकर यांच्यानंतर एकाही भारतीय फलंदाजाला या मैदानात कसोटीत शतक करता आलेलं नाही. त्यामुळे भारताची 35 वर्षांपासूनची प्रतिक्षा कायम आहे. त्यानंतर इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात 2014 साली याच मैदानात सामना खेळवण्यात आला. इंग्लंडने या सामन्यात भारतावर डाव आणि 54 धावांनी विजय मिळवला. तेव्हा भारताकडून कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने सर्वाधिक 71 धावा केल्या होत्या. त्यानंतर इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात एकही सामना झाला नाही.

इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात 2021 साली मँचेस्टरमध्ये कसोटी सामन्याचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र कोरोनामुळे हा सामना रद्द करण्यात आला होता. हा सामना 2022 मध्ये एजबेस्टनमध्ये खेळवण्यात आला होता. त्यामुळे आता कोणता भारतीय फलंदाज मँचेस्टरमध्ये शतक करुन 35 वर्षांची प्रतिक्षा संपवणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

अजितदादांचा घात की अपघात; संजय राऊतांच्या विधानाचीही चर्चा!
अजितदादांचा घात की अपघात; संजय राऊतांच्या विधानाचीही चर्चा!.
अंडर 19 वर्ल्ड कप जिंकल्यावर कॅप्टन आयुष्यच्या कुटुंबात मोठा जल्लोष
अंडर 19 वर्ल्ड कप जिंकल्यावर कॅप्टन आयुष्यच्या कुटुंबात मोठा जल्लोष.
मालेगावच्या महापौर, उपमहापौरपदाची निवडणूक संपल्यानंतर मोठी दुर्घटना
मालेगावच्या महापौर, उपमहापौरपदाची निवडणूक संपल्यानंतर मोठी दुर्घटना.
मुंबई पालिकेत 16 फेब्रुवारीला विरोधी पक्षनेता नेमणार
मुंबई पालिकेत 16 फेब्रुवारीला विरोधी पक्षनेता नेमणार.
92 वर्षाचे आजोबा आणि 90 वर्षाच्या आजीचे मतदान
92 वर्षाचे आजोबा आणि 90 वर्षाच्या आजीचे मतदान.
आम्ही अपशकुन करणार नाही! महापौरपदाबाबत किशोरी पेडणेकरांचं मोठं विधान
आम्ही अपशकुन करणार नाही! महापौरपदाबाबत किशोरी पेडणेकरांचं मोठं विधान.
सांगली बलगडवेमध्ये ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार
सांगली बलगडवेमध्ये ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार.
रितू तावडेंनी व्यक्त केला मुंबईच्या विकासाला गती देण्याचा संकल्प
रितू तावडेंनी व्यक्त केला मुंबईच्या विकासाला गती देण्याचा संकल्प.
ठाकरे गटाकडून महापौर, उपमहापौरपदाचा उमेदवार कोण? फैसला थोड्याच वेळात
ठाकरे गटाकडून महापौर, उपमहापौरपदाचा उमेदवार कोण? फैसला थोड्याच वेळात.
मालेगावच्या महापौरपदी नसरीन बानो शेख यांची निवड
मालेगावच्या महापौरपदी नसरीन बानो शेख यांची निवड.