AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ODI World Cup 2023 : आयसीसीच्या तीन नव्या नियमांमुळे स्पर्धा होणार आणखी रंगतदार, काय केलं ते वाचा

ODI World Cup 2023 : वनडे वर्ल्डकप स्पर्धेचं 13 वं पर्व आहे. या पर्वात दहा संघ एकमेकांसमोर उभे ठाकणार आहे. पहिल्यांदाच रॉबिन राउंड पद्धतीने सामने होणार आहे. दुसरीकडे, आयसीसीने तीन नवे नियम आणल्याने स्पर्धेची रंगत वाढणार आहे.

ODI World Cup 2023 : आयसीसीच्या तीन नव्या नियमांमुळे स्पर्धा होणार आणखी रंगतदार, काय केलं ते वाचा
ODI World Cup 2023 : वनडे वर्ल्डकप स्पर्धेची रंगत आणखी वाढणार, आयसीसीच्या तीन नव्या नियमांची भर
| Updated on: Oct 03, 2023 | 2:42 PM
Share

मुंबई : क्रिकेट महाकुंभाची सुरुवात 5 ऑक्टोबरपासून आहे. क्रीडाप्रेमी गेल्या अनेक दिवसांपासून या दिवसाची वाट पाहात होते. आता वनडे वर्ल्डकप स्पर्धा अवघ्या काही तासांवर येऊन ठेपली आहे. अशात आयसीसीच्या नव्या नियमांची जोरदार चर्चा रंगली आहे. यामुळे स्पर्धेची रंगत आणखी वाढणार आहे. 2019 मध्ये एका नियमामुळे जोरदार वाद झाला होता. हा नियमात देखील आयसीसीने बदल केला आहे. 2019 वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड असा सामना झाला होता. मात्र हा सामना बरोबरीत सुटल्याने सुपर ओव्हरमध्ये खेळला गेला. तिथेही बरोबरी साधली गेली. मात्र इंग्लंडला विजयी घोषित करण्यात आलं. त्यामुळे बराच वाद रंगला होता. अखेर आयसीसीने या नियमात बदल केला आहे.

कोणते तीन नियम नव्याने लागू केले ते जाणून घ्या

  • 2019 वनडे वर्ल्डकप स्पर्धेत चौकारांच्या आधारावर इंग्लंडला विजयी घोषित करण्यात आलं होता. त्यामुळे सोशल मीडियावर बराच वाद रंगला होता. सामना बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हर होते. त्यातही बरोबरी झाली तर चौकारांच्या आधारावर विजेता घोषित केला जातो. याच नियमामुळे इंग्लंडला जेतेपद मिळालं होतं. मात्र हा नियम बदलला असून आता विजयी निकाल येईपर्यंत सुपर ओव्हर खेळली जाणार आहे.
  • मैदानावरील पंचांचा सॉफ्ट सिग्नल संपुष्टात आला आहे. मैदानातील पंचाना तिसऱ्या पंचांना विचारण्यापूर्वी आधी त्यांचा निर्णय द्यावा लागत होता. त्यामुळे तिसऱ्या पंचांचा निर्णय कधी कधी जवळपास असला तरी मैदानातील पंचाच्या बाजूने जायचा. आऊट असो की नसो मैदानातील पंचांच्या पक्षात निर्णय घेतला जायचा. पण आता हा सॉफ्ट सिग्नल नियम संपुष्टात आला आहे. जर तिसरा पंच बाद की नाबाद ठरवण्यात अपयशी ठरला तरच मैदानातील पंचांचा निर्णय अंतिम मानला जाईल.
  • वनडे वर्ल्डकप स्पर्धेसाठी आयसीसीने आणखी एक नियम जोडला आहे. स्पर्धेतील एकाही स्टेडियमची बाउंड्री 70 मीटरपेक्षा कमी नसेल. काही ठिकाणी सीमारेषा जवळ असल्याने फलंदाज आरामात चौकार आणि षटकारांचा वर्षाव करतो. हे लक्षात घेऊनच हा नियम तयार केला आहे.

भारताचा सामना पहिला सामना कधी?

वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील भारताचा पहिला सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. 8 ऑक्टोबरला हा सामना होणार आहे. त्यानंतर 11 ऑक्टोबरला अफगाणिस्तान आणि 14 ऑक्टोबरला पाकिस्तानसोबत सामना होईल. भारताला उपांत्य फेरी सहजरित्या गाठण्यासाठी काहीही करून 7 सामने जिंकावे लागणार आहेत.

Follow Us
उदय सामंत: 'एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य'
उदय सामंत: एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य
मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे
'मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे', रिक्षाचालकांच्या मराठी सक्तीवरून शिंदेंची प्रतिक्रिया
मराठी न बोलल्यास परवाना रद्द करण्याच्या धमक्यांवरचा दुबेंचा इशारा
संजय दुबे यांचा प्रताप सरनाईक यांच्या मराठी भाषेच्या सक्तीला थेट विरोध
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल:
शरद पवार एनडीएमध्ये जाणार नाहीत, विरोधातच राहणार
पवारांकडून एनडीएमध्ये जाण्याच्या चर्चा फेटाळल्या; पक्ष कार्यकर्त्यांना दिले स्पष्ट निर्देश
देशमुखांचं कारागृह महानिरीक्षकांना पत्र; गैरप्रकारांच्या चौकशीची मागणी
धनंजय देशमुखांचे बीड कारागृह महानिरीक्षकांना पत्र: गैरप्रकार चौकशी आणि आरोपी स्थलांतराची मागणी
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर? ठाण्यातील कार्यक्रमात भाजप नेत्यांची अनुपस्थिती
बेस्ट कामगारांचा बेमुदत संप; प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
बेस्ट कामगारांचा मंगळवारपासून बेमुदत संप: प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
पालकमंत्री महाजनांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना मदत
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना अवयव प्रत्यारोपणासाठी मदत