AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Test Cricket: दुसऱ्या कसोटी सामन्याचं ठिकाण बदललं, नक्की कारण काय?

Test Cricket: क्रिकेट बोर्डाने कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्याचं ठिकाण अखेरच्या क्षणी बदलण्यात आलं आहे. जाणून घ्या यामागचं नक्की कारण काय?

Test Cricket: दुसऱ्या कसोटी सामन्याचं ठिकाण बदललं, नक्की कारण काय?
प्रातिनिधिक फोटोImage Credit source: ICC
| Updated on: Aug 18, 2024 | 10:43 PM
Share

पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश यांच्यातील 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेला बुधवार 21 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. बांगलादेश या कसोटी मालिकेसाठी पाकिस्तान दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांसाठी ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2025 साखळीच्या हिशोबाने फार महत्त्वाची आहे. त्यात बांगलादेला अद्याप कधीच पाकिस्तान विरुद्ध विजय मिळवता आलेला नाही. त्यामुळे बांगलादेशने या मालिकेआधी जोरदार सरावाला सुरुवात केली आहे. नजमुल हुसैन शांतो बांगलादेशचं तर शान मसूद पाकिस्तानचं नेतृ्त्व करणार आहे. त्याआधी एक मोठी बातमी समोर आली आहे.

उभयसंघातील दुसर्‍या सामन्याचं ठिकाण तडकाफडकी बदलण्यात आलं आहे. हा सामना आधी कराची येथे खेळवण्यात येणार होता. मात्र आता तो सामना रावळपिंडी येथे होणार आहे. मालिकेतील सलामीचा सामना हा इथेच रावळपिंडी येथे आयोजित करण्यात आला आहे. कराची नॅशनल स्टेडियमचं दुरूस्तीचं काम सुरु असल्याने कारणाने सामन्याचं ठिकाण बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पाकिस्तानात 2025 साली आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. तसेच दुरुस्तीच्या कारणामुळेच दुसरा कसोटी सामना हा बंद दाराआड अर्थात क्रिकेट चाहत्यांविना होणार असल्याचं याआधीच स्पष्ट करण्यात आलं होतं.

क्रिकेट चाहत्यांच्या उपस्थितीत कराची स्टेडियममध्ये सामना खेळवल्यास दुरुस्तीच्या कामात व्यत्यय येईल, असं कामगारांनी सांगितलं होतं. तसेच दुरुस्तीच्या कामादरम्यान खेळाडूंसह, ब्रॉडकास्टर्स आणि उपस्थितीत क्रिकेट चाहत्यांना धुळीचा त्रास होऊ नये, याची खबरदारी घेत हा निर्णय घेतला गेला आहे.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा मोठा निर्णय

कसोटी मालिकेचं वेळापत्रक

पहिला सामना, 21 ते 25 ऑगस्ट, रावळपिंडी

दुसरा सामना, 30 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर, रावळपिंडी

कसोटी मालिकेसाठी पाकिस्तान टीम : शान मसूद (कॅप्टन), सऊद शकील (उपकर्णधार), आमिर जमाल, अब्दुल्ला शफीक, अबरार अहमद, बाबर आजम, कामरान गुलाम, खुर्रम शहजाद, मीर हमजा, मोहम्मद अली, मोहम्मद हुरैरा, मोहम्मद रिजवान (विकेटकीपर), नसीम शाह, सॅम अयूब, सलमान अली आगा, सरफराज अहमद (विकेटकीपर) आणि शाहीन शाह अफरीदी.

कसोटी मालिकेसाठी बांगलादेश टीम : नजमुल हुसैन शांतो (कर्णधार), महमूदुल हसन जॉय, जाकिर हसन, शादमान इस्लाम, मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शाकिब अल हसन, लिटन कुमार दास, मेहदी हसन मिराज, तैजुल इस्लाम, नईम हसन, तस्कीन अहमद, सयद खालिद अहमद, नाहिद राणा, शोरफुल इस्लाम आणि हसन महमूद.

Follow Us
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया.
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान.
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका.
बजेटमध्ये कर्जमाफीचे केवळ सोंग! विजय वडेट्टीवार यांची टीका
बजेटमध्ये कर्जमाफीचे केवळ सोंग! विजय वडेट्टीवार यांची टीका.
मुंबईला उष्णतेच्या लाटेचा इशारा! तापमान ४२ अंशांवर पोहोचण्याची शक्यता
मुंबईला उष्णतेच्या लाटेचा इशारा! तापमान ४२ अंशांवर पोहोचण्याची शक्यता.
नाथषष्ठी सोहळा: पैठणमध्ये संत एकनाथ महाराजांच्या उत्सवाला सुरुवात
नाथषष्ठी सोहळा: पैठणमध्ये संत एकनाथ महाराजांच्या उत्सवाला सुरुवात.
बच्चू कडूंचा सरकारला दुपारी ४ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम; काय घडलं?
बच्चू कडूंचा सरकारला दुपारी ४ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम; काय घडलं?.
प्री-ओपनिंगमध्ये शेअर बाजारात मोठी घसरण!
प्री-ओपनिंगमध्ये शेअर बाजारात मोठी घसरण!.
भारत तिसऱ्यांदा टी-20 विश्वचषक विजेता! पंतप्रधानांनी केलं अभिनंदन
भारत तिसऱ्यांदा टी-20 विश्वचषक विजेता! पंतप्रधानांनी केलं अभिनंदन.