AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राजस्थान रॉयल्सच्या दहाव्या पराभवानंतर राहुल द्रविड संतापला, प्रत्येक वेळी तसाच पॅटर्न सांगत…

आयपीएल 2025 स्पर्धेतून राजस्थान रॉयल्स संघाचं आव्हान संपुष्टात आलं आहे. या स्पर्धेतील शेवटचा सामना 20 मे रोजी चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध खेळणार आहे. राजस्थानने या स्पर्धेत एकूण 10 सामने गमावले आहेत. त्यापैकी काही सामने जिंकता जिंकता गमावले आहेत.

राजस्थान रॉयल्सच्या दहाव्या पराभवानंतर राहुल द्रविड संतापला, प्रत्येक वेळी तसाच पॅटर्न सांगत...
राजस्थान रॉयल्सImage Credit source: Twitter
| Updated on: May 19, 2025 | 9:23 PM
Share

आयपीएल 2025 स्पर्धेत राजस्थान रॉयल्स निराशाजनक कामगिरी राहिली आहे. आतापर्यंत खेळलेल्या 13 पैकी 10 सामन्यात पराभवाचं तोंड पाहीलं आहे. काही सामन्यात तर विरोधकांना विजयाचा घास तोंडातून खेचून नेला आहे. पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यातही तसंच काहीसं झालं. धावांचा पाठलाग करताना राजस्थानला दहा धावा तोकड्या पडल्या. जिंकलेला सामना हातून गमवल्याने प्रशिक्षक राहुल द्रविड चांगलाच संतापलेला दिसला. या सामन्यातील पराभवानंतर राहुल द्रविडने संघातील उणीवा कबूल केल्या. ‘फक्त फलंदाजांना दोष देऊन चालणार नाही. मला वाटतं आम्ही गोलंदाजीतही चांगलं करू शकलो नाहीत. प्रामाणिकपणे सांगायचं तर ही विकेट 220 धावांची नव्हती. 195 ते 200 धावा ठीक होत्या. पण आम्ही अतिरिक्त 20 धावा दिल्या. आकडेवारी पाहीली तर आम्ही गोलंदाजीत काही खास करू शकलो नाहीत. विकेट घेण्यात आणि धावा नियंत्रित करण्यात आम्ही अपयशी ठरलो. आम्ही प्रत्येक सामन्यात 200-220 धावांचा पाठलाग करत आहोत.’

राहुल द्रविडने पुढे सांगितलं की, ‘हे खूप कठीण काम होतं. आम्ही धावांचा जवळ पोहोचलो होतो. पण आम्ही ते पूर्ण करू शकलो नाहीत. गोलंदाजीत 15 ते 20 धावा अतिरिक्त द्यायच्या आणि नंतर सामना जिंकताना चांगल्या स्थितीत असता. पण आम्ही धावांचा पाठलाग करू शकलो नाहीत. मधल्या आणि खालच्या क्रमात आम्ही आवश्यक असताना मोठे फटके मारू शकलो नाहीत.’ राजस्थान रॉयल्सचा 20 मे रोजी चेन्नई सुपर किंग्ससोबत शेवटचा सामना आहे. या सामन्यानंतर राजस्थान रॉयल्स संघ थेट 2026 आयपीएल स्पर्धेत दिसणार आहे. त्यामुळे आता या वर्षभरात संघ बांधणी खूपच काम करावं लागणार आहे.

राहुल द्रविडने एका वर्षानंतर तरुण खेळाडू कसे खेळू शकतात याबाबत भाकीत वर्तवलं. ‘वैभव सूर्यवंशी भारताच्या 19 वर्षाखालील संघात भरपूर क्रिकेट खेळेल. रियान पराग देखील भरपूर क्रिकेट खेळणार आहे. सर्वच खेळाडू भारतासाठी खूप सारं क्रिकेट खेळणार आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवरचं कठीण क्रिकेट असणार आहे. त्यामुळे आशा आहे की पुढे जेव्हा आम्ही परत येऊ तेव्हा अनुभव गाठीशी बांधलेला असेल. तेव्हा हे खेळाडून प्रतिभावंत असणार आहेत.’, असं राहुल द्रविड पुढे म्हणाला.

Follow Us
180 फूट उंचीवर रीलबाजी! मिसिंग लिंक प्रकल्पात सुरक्षेचा बोजवारा?
180 फूट उंचीवर रीलबाजी! मिसिंग लिंक प्रकल्पात सुरक्षेचा बोजवारा?.
बंगाल थरारलं! भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांच्या PA ची गोळ्या झाडून हत्
बंगाल थरारलं! भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांच्या PA ची गोळ्या झाडून हत्.
नाशिक पुन्हा हादरलं! जादूटोण्याची धमकी, मानसिक छळ; सासरच्या जाचाला...
नाशिक पुन्हा हादरलं! जादूटोण्याची धमकी, मानसिक छळ; सासरच्या जाचाला....
तामिळनाडूत सत्तास्थापनेचा सस्पेन्स; थलपतीच्या सरकार स्थापनेला ब्रेक
तामिळनाडूत सत्तास्थापनेचा सस्पेन्स; थलपतीच्या सरकार स्थापनेला ब्रेक.
नसरापूर प्रकरणातील आरोपीची धक्कादायक कबुली, जीव गेला की नाही पाहण्या..
नसरापूर प्रकरणातील आरोपीची धक्कादायक कबुली, जीव गेला की नाही पाहण्या...
सुनेत्रा पवारांच्या जागी छगन भुजबळ राज्यसभेवर खासदार म्हणून जाणार?
सुनेत्रा पवारांच्या जागी छगन भुजबळ राज्यसभेवर खासदार म्हणून जाणार?.
| जळगाव सराफ बाजारात सोनं-चांदी महागलं; 24 तासांत विक्रमी दरवाढ
| जळगाव सराफ बाजारात सोनं-चांदी महागलं; 24 तासांत विक्रमी दरवाढ.
मोठी अपडेट! उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार खासदारकीचा राजीनामा देणार...
मोठी अपडेट! उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार खासदारकीचा राजीनामा देणार....
ठाकरे गटाचे खासदार संजय दिना पाटील यांचा एकनाथ शिंदेंसोबत प्रवास....
ठाकरे गटाचे खासदार संजय दिना पाटील यांचा एकनाथ शिंदेंसोबत प्रवास.....
ममता बॅनर्जींनी राजीनामा नाही दिला तर... कायदेतज्ञ काय सांगतात?
ममता बॅनर्जींनी राजीनामा नाही दिला तर... कायदेतज्ञ काय सांगतात?.