AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राजस्थान रॉयल्सच्या दहाव्या पराभवानंतर राहुल द्रविड संतापला, प्रत्येक वेळी तसाच पॅटर्न सांगत…

आयपीएल 2025 स्पर्धेतून राजस्थान रॉयल्स संघाचं आव्हान संपुष्टात आलं आहे. या स्पर्धेतील शेवटचा सामना 20 मे रोजी चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध खेळणार आहे. राजस्थानने या स्पर्धेत एकूण 10 सामने गमावले आहेत. त्यापैकी काही सामने जिंकता जिंकता गमावले आहेत.

राजस्थान रॉयल्सच्या दहाव्या पराभवानंतर राहुल द्रविड संतापला, प्रत्येक वेळी तसाच पॅटर्न सांगत...
राजस्थान रॉयल्सImage Credit source: Twitter
| Updated on: May 19, 2025 | 9:23 PM
Share

आयपीएल 2025 स्पर्धेत राजस्थान रॉयल्स निराशाजनक कामगिरी राहिली आहे. आतापर्यंत खेळलेल्या 13 पैकी 10 सामन्यात पराभवाचं तोंड पाहीलं आहे. काही सामन्यात तर विरोधकांना विजयाचा घास तोंडातून खेचून नेला आहे. पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यातही तसंच काहीसं झालं. धावांचा पाठलाग करताना राजस्थानला दहा धावा तोकड्या पडल्या. जिंकलेला सामना हातून गमवल्याने प्रशिक्षक राहुल द्रविड चांगलाच संतापलेला दिसला. या सामन्यातील पराभवानंतर राहुल द्रविडने संघातील उणीवा कबूल केल्या. ‘फक्त फलंदाजांना दोष देऊन चालणार नाही. मला वाटतं आम्ही गोलंदाजीतही चांगलं करू शकलो नाहीत. प्रामाणिकपणे सांगायचं तर ही विकेट 220 धावांची नव्हती. 195 ते 200 धावा ठीक होत्या. पण आम्ही अतिरिक्त 20 धावा दिल्या. आकडेवारी पाहीली तर आम्ही गोलंदाजीत काही खास करू शकलो नाहीत. विकेट घेण्यात आणि धावा नियंत्रित करण्यात आम्ही अपयशी ठरलो. आम्ही प्रत्येक सामन्यात 200-220 धावांचा पाठलाग करत आहोत.’

राहुल द्रविडने पुढे सांगितलं की, ‘हे खूप कठीण काम होतं. आम्ही धावांचा जवळ पोहोचलो होतो. पण आम्ही ते पूर्ण करू शकलो नाहीत. गोलंदाजीत 15 ते 20 धावा अतिरिक्त द्यायच्या आणि नंतर सामना जिंकताना चांगल्या स्थितीत असता. पण आम्ही धावांचा पाठलाग करू शकलो नाहीत. मधल्या आणि खालच्या क्रमात आम्ही आवश्यक असताना मोठे फटके मारू शकलो नाहीत.’ राजस्थान रॉयल्सचा 20 मे रोजी चेन्नई सुपर किंग्ससोबत शेवटचा सामना आहे. या सामन्यानंतर राजस्थान रॉयल्स संघ थेट 2026 आयपीएल स्पर्धेत दिसणार आहे. त्यामुळे आता या वर्षभरात संघ बांधणी खूपच काम करावं लागणार आहे.

राहुल द्रविडने एका वर्षानंतर तरुण खेळाडू कसे खेळू शकतात याबाबत भाकीत वर्तवलं. ‘वैभव सूर्यवंशी भारताच्या 19 वर्षाखालील संघात भरपूर क्रिकेट खेळेल. रियान पराग देखील भरपूर क्रिकेट खेळणार आहे. सर्वच खेळाडू भारतासाठी खूप सारं क्रिकेट खेळणार आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवरचं कठीण क्रिकेट असणार आहे. त्यामुळे आशा आहे की पुढे जेव्हा आम्ही परत येऊ तेव्हा अनुभव गाठीशी बांधलेला असेल. तेव्हा हे खेळाडून प्रतिभावंत असणार आहेत.’, असं राहुल द्रविड पुढे म्हणाला.

Follow Us
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?.
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह..
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह...
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी.
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला.
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?.
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?.
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप.
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?.
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले.
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा.