AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs AUS: विराट-रोहितच्या चाहत्यांची धाकधूक वाढली, पर्थमधून एक वाईट बातमी आली समोर

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका 19 ऑक्टोबरपासून सुरु होत आहे. या मालिकेतून विराट कोहली आणि रोहित शर्मा सात महिन्यानंतर खेळणार आहेत. मात्र त्यांच्या चाहत्यांना आणखी काळ वाट पाहावी लागणार आहे. नेमकं काय झालं ते समजून घ्या

IND vs AUS: विराट-रोहितच्या चाहत्यांची धाकधूक वाढली, पर्थमधून एक वाईट बातमी आली समोर
IND vs AUS: विराट-रोहितच्या चाहत्यांची धाकधूक वाढली, पर्थमधून एक वाईट बातमी आली समोरImage Credit source: PTI
| Updated on: Oct 18, 2025 | 3:54 PM
Share

भारत आणि ऑस्ट्रेलिया वनडे मालिकेचं काउंटडाऊन सुरु झालं आहे. अवघ्या काही तासात पहिला सामना होणार आहे. पर्थच्या ऑप्टस स्टेडियममध्ये पहिला सामना होणार आहे. या सामन्याची क्रीडारसिक गेल्या काही महिन्यांपासून वाट पाहात आहेत. कारण या मालिकेत रोहित शर्मा आणि विराट कोहली सात महिन्यानंतर पुन्हा खेळताना दिसणार आहेत. शुबमन गिलच्या नेतृत्वात रोहित शर्मा आणि विराट कोहली खेळणार आहेत. मात्र या सामन्यापूर्वीच क्रीडारसिकांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. कारण या सामन्यावर पावसाचं सावट आहे. त्यामुळे या सामन्यात पावसाचं विरजण पडणार असं दिसत आहे. त्यामुळे चाहत्यांना रोहित शर्मा आणि विराट कोहलीला खेळताना पाहण्यासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागू शकते.

एक्युवेदरच्या रिपोर्टनुसार, पर्थमध्ये रविवारी पावसाची 63 टक्के शक्यता आहे. स्थानिक वेळेनुसार सामन्याला सुरुवात सकाळी 11.30 वाजता होणार आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी 9 वाजता सामना सुरू होईल. पण सामन्याच्या सुरुवातीला 50 ते 60 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा सामना पावसामुळे रद्द करण्याची वेळ येऊ शकते. जर हा सामना पावसामुळे होऊ शकला नाही तर रोहित-विराटच्या चाहत्यांना आणखी काही काळ वाट पाहावी लागेल.

पर्थच्या ऑप्टस मैदानात टीम इंडिया पहिल्यांदा वनडे सामना खेळण्यासाठी उतरणार आहे. ऑस्ट्रेलियाने या मैदानात तीन सामने खेळले आहेत आणि तिन्ही सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. त्यामुळे टीम इंडियासाठी ही आनंदाची बातमी आहे. पण टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियातील रेकॉर्ड काही खास नाही. आतापर्यंत टीम इंडिया 54 सामने खेळली असून त्यातील फक्त 14 सामन्यात विजय मिळवला आहे. तर 38 सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं.

भारतीय संघात 9 वर्षानंतर अशी वेळ

विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्याकडे नऊ वर्षांपासून वनडे संघाची धुरा होती. रोहित शर्मा 4 वर्षानंतर टीम इंडियात खेळाडू म्हणून दिसणार आहे. 2021 मध्ये त्याने विराटकडून ही धुरा हाती घेतली होती. यापूर्वी अशी स्थिती 2016 मध्ये आली होती. तेव्हा महेंद्रसिंह धोनी कर्णधार होता.

Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक