AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs AUS: विराट-रोहितच्या चाहत्यांची धाकधूक वाढली, पर्थमधून एक वाईट बातमी आली समोर

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका 19 ऑक्टोबरपासून सुरु होत आहे. या मालिकेतून विराट कोहली आणि रोहित शर्मा सात महिन्यानंतर खेळणार आहेत. मात्र त्यांच्या चाहत्यांना आणखी काळ वाट पाहावी लागणार आहे. नेमकं काय झालं ते समजून घ्या

IND vs AUS: विराट-रोहितच्या चाहत्यांची धाकधूक वाढली, पर्थमधून एक वाईट बातमी आली समोर
IND vs AUS: विराट-रोहितच्या चाहत्यांची धाकधूक वाढली, पर्थमधून एक वाईट बातमी आली समोरImage Credit source: PTI
| Updated on: Oct 18, 2025 | 3:54 PM
Share

भारत आणि ऑस्ट्रेलिया वनडे मालिकेचं काउंटडाऊन सुरु झालं आहे. अवघ्या काही तासात पहिला सामना होणार आहे. पर्थच्या ऑप्टस स्टेडियममध्ये पहिला सामना होणार आहे. या सामन्याची क्रीडारसिक गेल्या काही महिन्यांपासून वाट पाहात आहेत. कारण या मालिकेत रोहित शर्मा आणि विराट कोहली सात महिन्यानंतर पुन्हा खेळताना दिसणार आहेत. शुबमन गिलच्या नेतृत्वात रोहित शर्मा आणि विराट कोहली खेळणार आहेत. मात्र या सामन्यापूर्वीच क्रीडारसिकांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. कारण या सामन्यावर पावसाचं सावट आहे. त्यामुळे या सामन्यात पावसाचं विरजण पडणार असं दिसत आहे. त्यामुळे चाहत्यांना रोहित शर्मा आणि विराट कोहलीला खेळताना पाहण्यासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागू शकते.

एक्युवेदरच्या रिपोर्टनुसार, पर्थमध्ये रविवारी पावसाची 63 टक्के शक्यता आहे. स्थानिक वेळेनुसार सामन्याला सुरुवात सकाळी 11.30 वाजता होणार आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी 9 वाजता सामना सुरू होईल. पण सामन्याच्या सुरुवातीला 50 ते 60 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा सामना पावसामुळे रद्द करण्याची वेळ येऊ शकते. जर हा सामना पावसामुळे होऊ शकला नाही तर रोहित-विराटच्या चाहत्यांना आणखी काही काळ वाट पाहावी लागेल.

पर्थच्या ऑप्टस मैदानात टीम इंडिया पहिल्यांदा वनडे सामना खेळण्यासाठी उतरणार आहे. ऑस्ट्रेलियाने या मैदानात तीन सामने खेळले आहेत आणि तिन्ही सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. त्यामुळे टीम इंडियासाठी ही आनंदाची बातमी आहे. पण टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियातील रेकॉर्ड काही खास नाही. आतापर्यंत टीम इंडिया 54 सामने खेळली असून त्यातील फक्त 14 सामन्यात विजय मिळवला आहे. तर 38 सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं.

भारतीय संघात 9 वर्षानंतर अशी वेळ

विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्याकडे नऊ वर्षांपासून वनडे संघाची धुरा होती. रोहित शर्मा 4 वर्षानंतर टीम इंडियात खेळाडू म्हणून दिसणार आहे. 2021 मध्ये त्याने विराटकडून ही धुरा हाती घेतली होती. यापूर्वी अशी स्थिती 2016 मध्ये आली होती. तेव्हा महेंद्रसिंह धोनी कर्णधार होता.

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.