AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दक्षिण अफ्रिकेने श्रीलंकेला लोळवलं, उपांत्य फेरीच्या दिशेने कूच; भारताचं टेन्शन वाढलं

वुमन्स वर्ल्डकप 2025 स्पर्धेच्या 18व्या सामन्यात दक्षिण अफ्रिका आणि श्रीलंका हे संघ आमनेसाने आले होते. या सामन्यात पावसाचा व्यत्यय आला. त्यामुळे 20 षटकांचा सामना खेळवण्यात आला. हा सामना दक्षिण अफ्रिकेने 10 विकेट राखून जिंकला.

दक्षिण अफ्रिकेने श्रीलंकेला लोळवलं, उपांत्य फेरीच्या दिशेने कूच; भारताचं टेन्शन वाढलं
दक्षिण अफ्रिकेने श्रीलंकेला लोळवलं, उपांत्य फेरीच्या दिशेने कूच; भारताचं टेन्शन वाढलंImage Credit source: Proteas Women
| Updated on: Oct 17, 2025 | 11:14 PM
Share

वुमन्स वर्ल्डकप 2025 स्पर्धेचा 18वा सामना पावसामुळे रद्द करावा लागतो की काय अशी स्थिती होती. श्रीलंका आणि दक्षिण अफ्रिका सामन्यात पावसामुळे खंड पडला. सामना सुरु झाल्यानतंर अवघ्या काही तासातच मुसळधार पाऊस पडला. मात्र बराच काळ वाट पाहिल्यानंतर पाऊस गेला आणि 20 षटकांचा सामना खेळवण्याचा निर्णय घेतला. श्रीलंकेने 20 षटकात 7 गडी गमवून 105 धावा केल्या. मात्र षटकं कमी केल्याने डकवर्थ लुईस नियमानुसार दक्षिण अफ्रिकेसमोर 121 धावांचं आव्हान देण्यात आलं. हे आव्हान दक्षिण अफ्रिकेने 14.5 षटकात एकही गडी न गमावता पूर्ण केलं. नाणेफेकीचा कौल श्रीलंकेने जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण नाणेफेक जिंकून काहीच फायदा झाला नाही. उलट दक्षिण अफ्रिका श्रीलंकेवर भारी पडली. दक्षिण अफ्रिकेने 10 गडी राखून हा सामना जिंकला.

श्रीलंकेला पराभूत केल्याने दक्षिण अफ्रिकेला मोठा फायदा झाला आहे. या विजयामुळे गुणतालिकेत थेट दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. तसेच उपांत्य फेरीत आपला दावा पक्का केला आहे. दक्षिण अफ्रिकेने आता उर्वरित दोन सामन्यापैकी एका सामन्यात विजय मिळवला तर उपांत्य फेरीतील स्थान पक्कं होणार आहे. दुसरीकडे, इंग्लंडचा संघ देखील उपांत्य फेरीसाठी प्रमुख दावेदार आहे. त्यामुळे चौथ्या स्थानासाठी जोरदार चुरस पाहायला मिळणार आहे. चौथ्या स्थानासाठी भारत आणि न्यूझीलंड यांच्यात रस्सीखेंच असेल असंच दिसत आहे. कारण बांग्लादेश, श्रीलंका आणि पाकिस्तान यांनी एक सामना गमावला तर त्यांचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल.

भारताची स्थिती काय?

भारताचे या स्पर्धेत एकूण तीन सामने शिल्लक आहे. त्या तिन्ही सामन्यात विजय मिळवला तर उपांत्य फेरीत स्थान पक्कं होईल. पण एका सामन्यात पराभव झाल्यास गणित जर तरवर येईल. त्यात भारत न्यूझीलंड हा सामना महत्त्वाचा ठरणार आहे. पण त्याआधी इंग्लंडचा कठीण पेपर सोडवावा लागणार आहे. 19 ऑक्टोबरला भारत आणि इंग्लंड यांच्यात सामना होणार आहे. 23 ऑक्टोबरला भारत न्यूझीलंड हा सामना होईल. तर 26 ऑक्टोबरला भारताचा सामना बांगलादेशशी होईल. आता या तीन सामन्यात कसं समीकरण जुळून येते याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष असेल.

Follow Us
बुलढाण्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का
बुलढाण्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का.
इराण–इस्त्रायल युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस सिलिंडर महाग,महिलांमध्ये...
इराण–इस्त्रायल युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस सिलिंडर महाग,महिलांमध्ये....
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले.
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त.
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?.
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला.
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान.
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग.
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह.
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम.