AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ranji Trophy Final 2022: रणजी विजेतेपदाच्या शर्यतीत मध्य प्रदेश मुंबईवर भारी, जाणून घ्या फायनलमधील चौथ्या दिवसाचे Update

Ranji Trophy Final 2022: मध्य प्रदेश आणि मुंबई (Mumbai vs Madhya pradesh) या दोन संघांमध्ये रणजी करंडक (Ranji Trophy) स्पर्धेचा अंतिम सामना सुरु आहे. चौथ्या दिवस अखेर मध्य प्रदेशचा संघ मजबूत स्थिती मध्ये आहे.

Ranji Trophy Final 2022: रणजी विजेतेपदाच्या शर्यतीत मध्य प्रदेश मुंबईवर भारी, जाणून घ्या फायनलमधील चौथ्या दिवसाचे Update
rajat-patidar Image Credit source: BCCI
| Updated on: Jun 25, 2022 | 6:59 PM
Share

मुंबई: मध्य प्रदेश आणि मुंबई (Mumbai vs Madhya pradesh) या दोन संघांमध्ये रणजी करंडक (Ranji Trophy) स्पर्धेचा अंतिम सामना सुरु आहे. चौथ्या दिवस अखेर मध्य प्रदेशचा संघ मजबूत स्थिती मध्ये आहे. कालच्या तीन बाद 368 धावांवरुन डाव पुढे सुरु केल्यानंतर मध्य प्रदेशचे आज आणखी 168 धावांची भर घातली. मध्य प्रदेशने पहिल्या डावात सर्वबाद 536 धावा केल्या. मध्य प्रदेशने पहिल्या डावात मुंबईवर 162 धावांची आघाडी घेतली. आता उद्याचा शेवटचा दिवस शिल्लक राहिला असून मध्य प्रदेशकडे अजूनही 49 धावांची आघाडी आहे. म्हणजे मुंबईला हा लीड फेडून एका दिवसात नवीन धावसंख्या उभारावी लागेल. त्यानंतर मध्य प्रदेशला ऑलआऊट करावं लागेल. तूर्तास तरी हे खूप कठीण दिसतय. आयपीएल स्टार रजत पाटीदारच (Rajat Patidar) शतक हे आजच्या दिवसाच्या खेळाचं वैशिष्टय ठरलं. आज सकाळी त्याने 67 धावांवरुन डाव पुढे सुरु केला. त्याने 219 चेंडूत 122 धावा फटकावल्या. त्याला तृषार देशपांडेनं बाद केलं. आपल्या शतकी खेळीत त्याने 20 चौकार मारले.

इथे क्लिक करुन पहा रजत पाटीदारची शानदार शतकी खेळी

मध्य प्रदेशकडून तीन शतकं

आज आदित्य श्रीवास्तवच्या रुपाने मुंबईला पहिलं यश मिळालं. संघाची धावसंख्या 401 असताना, तो आऊट झाला. अवस्थीने त्याला 25 धावांवर सर्फराज खानकरवी झेलबाद केलं. त्यानंतर ठराविक अंतराने मध्य प्रदेशचे फलंदाज बाद होते गेले. खालच्या क्रमांकावर फलंदाजील आलेल्या सारांश जैनने 57 धावांची महत्त्वपूर्ण अर्धशतकी खेळी केली. मध्य प्रदेशकडून यश दुबे (133), शुभम शर्मा (116) आणि रजत पाटीदार ( 122) अशी तिघांनी शतक झळकावली. त्या तुलनेत मुंबईकडून फक्त सर्फराज खानने (134) धावांची खेळी केली. त्यामुळे मुंबईला मोठी धावसंख्या उभारता आली नाही.

पहा एकाडावात पाच विकेट घेणाऱ्या शम्स मुलानीची गोलंदाजी

मुंबईच्या दोन विकेट

चौथ्या दिवस अखेर मुंबईच्या दोन बाद 113 धावा झाल्या आहेत. अजूनही मुंबईचा संघ 49 धावांनी पिछाडीवर आहे. कॅप्टन पृथ्वी शॉ (44) धावांवर बाद झाला. त्याला गौरव यादवने यश दुबेकरवी झेलबाद केलं. पृथ्वीने 52 चेंडूत 44 धावांच्या खेळीत तीन चौकार आणि दोन षटकार लगावले. हार्दिक तामेरेला (25) धावांवर कुमार कार्तिकेयने बोल्ड केलं. आता अरमान जाफर (30) आणि सुवेद पारकर (9) धावांवर खेळत आहेत.

Follow Us
तो सुखरूप घरी परतला हे आमच्यासाठी... दीपकेंच्या वडिलांची प्रतिक्रिया
तो सुखरूप घरी परतला हे आमच्यासाठी... अभिजीत दीपकेंच्या वडिलांची प्रतिक्रिया चर्चेत
मोठी बातमी! दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला, पुण्यात...
राष्ट्रावदीतील हालचाली वाढल्या; दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीमागे नेमकं कारण काय?
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! कर्जमाफी योजनेची पहिली यादी जाहीर
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! कर्जमाफी योजनेची पहिली यादी जाहीर; लाखो शेतकऱ्यांना फायदा
जात प्रमाणपत्र मागितलं की मिळतं; जरांगेंच्या आंदोलनाच्या घोषणेनंतर...
Devendra Fadnavis | जात प्रमाणपत्र मागितलं की मिळतं!; मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या घोषणेनंतर फडणवीसांचं मोठं विधान
अखेर परीक्षा सुधारणा विधेयक मंजूर... लोकसभेत प्रचंड गदारोळ
अखेर परीक्षा सुधारणा विधेयक मंजूर... लोकसभेत प्रचंड गदारोळ
दिल्लीत मोठ्या घडामोडी! किरण रिजिजू थेट अमित शाहांच्या भेटीला
दिल्लीत मोठ्या घडामोडी! किरण रिजिजू थेट अमित शाहांच्या भेटीला; नेमकं काय शिजतंय?
गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डी साईबाबा मंदिरात भाविकांची गर्दी,
गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डी साईबाबा मंदिरात भाविकांची गर्दी, रक्तदान शिबिराचे आयोजन
स्टुडंट, इडियट, अंधभक्त... राहुल गांधींच्या वक्तव्याने सभागृहात गदारोळ
Rahul Gandhi | स्टुडंट, इडियट, अंधभक्त... राहुल गांधींच्या एका वक्तव्याने सभागृहात प्रचंड गदारोळ
कर्जमाफी प्रमाणपत्राची प्रत व्हायरल, सोशल मीडियावर नेमकी कसली चर्चा?
Photo | कर्जमाफी प्रमाणपत्राची प्रत व्हायरल, सोशल मीडियावर नेमकी कसली चर्चा?
एकानेही घरी थांबायचं नाही! ज्या मराठ्यांच्या लेकरांवर अन्याय झालाय...
Manoj Jarange Patil | एकानेही घरी थांबायचं नाही! ज्या मराठ्यांच्या लेकरांवर अन्याय झालाय त्यांनी 28 ऑगस्टला अंतरवालीला या; जरांगेंनी पुन्हा फुंकलं आंदोलनाचं रणशिंग