AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2022: Mumbai Indians चं लाजिरवाणं प्रदर्शन, Rohit Sharma झाला भावुक, एका टि्वटमधून मांडल्या भावना

IPL 2022 Mumbai Indians: इंडियन प्रीमियर लीगचा यंदाचा सीजन मुंबई इंडियन्ससाठी एखाद्या वाईट स्वप्नासारखा आहे. पाचवेळचा चॅम्पियन संघ आतापर्यंत आठ सामने हरला आहे.

IPL 2022: Mumbai Indians चं लाजिरवाणं प्रदर्शन, Rohit Sharma झाला भावुक, एका टि्वटमधून मांडल्या भावना
rohit sharma Image Credit source: IPL
| Updated on: Apr 25, 2022 | 6:23 PM
Share

मुंबई: मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) संघ यंदाच्या सीजनमध्ये खूपच सुमार कामगिरी करतोय. सलग आठ सामन्यात मुंबई इंडियन्सचा पराभव झाला आहे. आयपीएलचा (IPL) यंदाचा 15 वा सीजन आहे. आयपीएलच्या इतिहासातील मुंबई इंडियन्सची ही सर्वात खराब कामगिरी आहे. मुंबईच्या संघाला एक विजय मिळवणं मुश्किल बनलयं. मुंबई इंडियन्सकडून अशाच कामगिरीची कोणीच अपेक्षा केली नव्हती. कारण मुंबई इंडियन्स आयपीएलमधला सर्वात यशस्वी संघ आहे. मुंबई इंडियन्सने आतापर्यंत आयपीएलची पाच विजेतेपद मिळवली आहेत. अशी कामगिरी दुसऱ्या कुठल्याही संघाला करता आलेली नाही. मुंबई पाठोपाठ चेन्नईने आयपीएलची चार विजेतेपद मिळवली आहेत. मुंबई इंडियन्सच्या यंदाच्या प्रदर्शनाने टीम इंडियाचीही चिंता वाढवली आहे. कारण भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit sharma) सुद्धा फॉर्ममध्ये नाहीय. त्याच्या बॅटमधून धावा जणू आटल्या आहेत. आयपीएल संपल्यानंतर एक मोठा आंतरराष्ट्रीय सीजन समोर आहे. त्यामुळे रोहितचा फॉर्म टीम इंडियाच्या चाहत्यांची चिंता वाढवणारा आहे.

काय म्हणाला रोहित?

मुंबईच्या इंडियन्सच्या या कामगिरीवर कॅप्टन रोहित शर्माने अखेर टि्वट केलं आहे. “या स्पर्धेत आम्ही आमची सर्वोत्तम कामगिरी करु शकलेलो नाही. पण असं कधी कधी घडतं. क्रीडा क्षेत्रातील अनेक दिग्गजांना अशा स्थितीतून जावं लागतं. पण माझं मुंबई इंडियन्सवर आणि इथल्या वातावरणावर प्रेम आहे. आमच्या हिंतचितकांचे मी आभार मानतो. या परिस्थितीतही ते संघासोबत आहेत” असं रोहितने त्याच्या टि्वटमध्ये म्हटलं आहे.

वाईट स्वप्नासारखा सीजन

इंडियन प्रीमियर लीगचा यंदाचा सीजन मुंबई इंडियन्ससाठी एखाद्या वाईट स्वप्नासारखा आहे. पाचवेळचा चॅम्पियन संघ आतापर्यंत आठ सामने हरला आहे. गुणतालिकेत मुंबई इंडियन्सची टीम तळाला आहे. आयपीएलच्या इतिहासात प्रथमच मुंबई इंडियन्सने आठ सामने गमावले आहेत. मुंबईच्या या दयनीय प्रदर्शनात फलंदाजी आणि गोलंदाजीचा मोठा रोल आहे. या दोन्ही आघाड्यांवर मुंबईचा संघ अपयशी ठरला आहे. मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये पोहोचणं, जवळपास अशक्यच आहे. पराभवानंतर कुठल्याही संघात गोंधळ उडणं स्वाभाविक आहे. आता मुंबई इंडियन्सच्या संघातही हेच होताना दिसतय.

Follow Us
खासगी विमानात बिघाड झाला, 45 मिनिटे उशीर तरी... VSR कंपनीतील विमानाची
खासगी विमानात बिघाड झाला, 45 मिनिटे उशीर तरी... VSR कंपनीतील विमानाच्या प्रवासाबाबत सुनेत्रा पवार काय म्हणाल्या?
राज्य थरथरलं! अनेक वर्ष चालला काळा कारभार, अल्पवयीन मुलीवर दोघं...भाजप
राज्य थरथरलं! अनेक वर्ष चालला काळा कारभार, अल्पवयीन मुलीवर दोघं... भाजप नगरसेविकेच्या भावाचं हादरवणारं कांड
गोकुळ गीते यांचं बंड आता थंड होण्याची दाट शक्यता?
Gokul Gite Nashik | नाशिकच्या राजकारणात गेमचेंजर घडामोड; गोकुळ गीते यांचं बंड आता थंड होण्याची दाट शक्यता
पाणी सोडलं नाही म्हणून थेट वस्तीवर हल्ला! बुलढाण्यात तुफान राडा
Buldhana News | पाणी सोडलं नाही म्हणून थेट वस्तीवर हल्ला! बुलढाण्यात तुफान राडा, 15 जण जखमी
मोठी बातमी! बड्या अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडलं; सापळा रचला अन् धडक कारवाई
मोठी बातमी! बड्या अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडलं; सापळा रचला अन् धडक कारवाई, चक्क 6 लाख...
पंढरपुरात राजकीय भूकंप! तीर्थक्षेत्र आघाडीचे 9 नगरसेवक भाजपच्या तंबूत
Pandharpur | पंढरपुरात राजकीय भूकंप! तीर्थक्षेत्र आघाडीचे 9 नगरसेवक भाजपच्या तंबूत
अखंडित काँग्रेस उभी राहणार? शरद पवार यांना पुढाकार घेण्याचं राऊतांचं
अखंडित काँग्रेस उभी राहणार? शरद पवार यांना पुढाकार घेण्याचं राऊतांचं आवाहन; देशात मोठ्या उलथापालथी होणार?
पंडित नेहरुंचा कार्यकाळ बारा नाहीतर सोळा वर्षांचा... संजय राऊतांनी
पंडित नेहरुंचा कार्यकाळ 12 नाहीतर 16 वर्षांचा... संजय राऊतांनी मांडलं गणित, काय म्हणाले?
जगातील सर्वात मोठ्या FIFA World Cup ला सुरुवात; भारत World Cup बाहेर?
FIFA World Cup 2026 | जगातील सर्वात मोठ्या FIFA World Cup ला सुरुवात; 104 सामन्यांचा रंगणार थरार, पण भारत पुन्हा World Cup बाहेर?
ब्रेक फेल नव्हता! दादर बेस्ट बस अपघातात RTO चा मोठा खुलासा
ब्रेक फेल नव्हता! दादर बेस्ट बस अपघातात RTO चा मोठा खुलासा; नेमकं कारण आलं समोर