AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टी20 वर्ल्डकप फायनलमधील ‘त्या’ क्षणांबाबत रोहित शर्माने केला उलगडा, 30 चेंडूत 30 धावा हव्या असताना…

टी20 वर्ल्डकप स्पर्धा जिंकू आता 16 दिवसांचा कालवधी लोटला तरी त्या मागच्या गोष्टी काही संपता संपत नाहीत. रोज टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील मनोरंजक गोष्टी समोर येत आहेत.आता रोहित शर्माने दक्षिण अफ्रिकेला 30 चेंडूत 30 धावांची गरज असताना मनात काय सुरु होतं ते सांगितलं.

टी20 वर्ल्डकप फायनलमधील 'त्या' क्षणांबाबत रोहित शर्माने केला उलगडा, 30 चेंडूत 30 धावा हव्या असताना...
| Updated on: Jul 16, 2024 | 6:12 PM
Share

टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारत विरुद्ध दक्षिण अफ्रिका यांच्यात रंगला. हा सामना भारताने 7 धावांनी जिंकला. पण एक स्थिती अशी होती की, दक्षिण अफ्रिकेला 30 चेंडूत 30 धावांची आवश्यकता होती. त्यामुळे हा सामना पूर्णपणे दक्षिण अफ्रिकेच्या पारड्यात झुकला होता. त्यामुळे अशा स्थितीत डोकं शांत ठेवून योजना आखणं मोठी जबाबदारी होती. रोहित शर्मानेही जबाबदारी योग्य पद्धतीने बजावली. तसेच दक्षिण अफ्रिकेला फक्त 22 धावा करता आल्या आणि टीम इंडियाने हा सामना 7 धावांनी जिंकला. पण हेन्रिक क्लासेनची फटकेबाजी पाहता हा गमवणार असंच क्रीडाप्रेमींना वाटत होतं. त्याने अक्षर पटेलच्या गोलंदाजीची धुलाई केली. तसेच 23 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. त्यामुळे शेवटच्या पाच षटकात रोहित शर्माच्या डोक्यात नेमकं काय सुरु होतं? याबाबत त्याने स्वत:च खुलासा केला आहे.

‘हो..मी पूर्णपणे ब्लँक होतो. मी फार पुढचा विचार केला नव्हता. माझ्यासाठी त्या क्षणात कामावर लक्ष केंद्रीत करणं खूप महत्त्वाचं होतं. सर्वांना शांत ठेवून अंमलबजावणी करणं महत्त्वाचं होतं. त्यासाठी आमचा प्रयत्न सुरु होता. जेव्हा दक्षिण अफ्रिकेला 30 चेंडूत 30 धावा आवश्यक होत्या तेव्हा आम्ही खूपच तणावात होतो. पण त्या पाच षटकात आम्ही शांत असल्याचं दाखवून दिलं. आम्ही फक्त कामावर लक्ष केंद्रीत केलं. या व्यतिरिक्त आम्ही फार कसला विचार केला नव्हता. आम्ही घाबरलो नाहीत. त्यामुळे आमची बाजू भक्कम झाली.’, असं रोहित शर्माने सांगितलं.

टीम इंडियाचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहने पुन्हा एकदा कोणत्याही परिस्थितीत सामना खेचून आणू शकतो हे दाखवलं. बुमराहने त्याच्या स्पेलच्या शेवटच्या षटकात 6 धावा दिल्या आणि मार्को जानसेनची विकेट घेतली. तर अर्शदीपने फक्त 4 धावा देऊन सामन्याची रंगत वाढवली. हार्दिक पांड्याने 17व्या षटकात क्लासेनची महत्वपूर्ण विकेट घेतली. तर शेवटच्या षटकात डेविड वॉर्नरची पहिल्याच चेंडूवर विकेट घेऊन सामना भारताच्या पारड्यात पाडला. सूर्यकुमार यादवने त्याचा अप्रतिम झेल घेतला. या विजयानंतर टीम इंडियाने 11 वर्षानंतर आयसीसी चषक जिंकला.

शिंदेचे आमदार भाजपात घेण्यात अर्थ काय? फडणवीस नेमकं काय म्हणाले?
शिंदेचे आमदार भाजपात घेण्यात अर्थ काय? फडणवीस नेमकं काय म्हणाले?.
तुकाराम मुंढे समर्थकांकडून भाजपच्या कृष्णा खोपडे यांना थेट धमकीचा फोन
तुकाराम मुंढे समर्थकांकडून भाजपच्या कृष्णा खोपडे यांना थेट धमकीचा फोन.
'अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या अंजली दमानिया कोण?'
'अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या अंजली दमानिया कोण?'.
आदित्य ठाकरे स्पष्टच म्हणाले, विरोधी पक्षनेत्यासाठी माझं नाव...
आदित्य ठाकरे स्पष्टच म्हणाले, विरोधी पक्षनेत्यासाठी माझं नाव....
'22 आमदारांपैकी एक जण व्हॉईसकॅप्टन म्हणवतात, त्यांचे काय उद्योगधंदे..'
'22 आमदारांपैकी एक जण व्हॉईसकॅप्टन म्हणवतात, त्यांचे काय उद्योगधंदे..'.
'लंडनच्या इंडिया हाऊसमध्ये वंदे मातरमचा आवाज घुमला अन् ब्रिटिशांना...'
'लंडनच्या इंडिया हाऊसमध्ये वंदे मातरमचा आवाज घुमला अन् ब्रिटिशांना...'.
जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा
जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा.
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?.
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?.
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?.