AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टी20 वर्ल्डकप फायनलमधील ‘त्या’ क्षणांबाबत रोहित शर्माने केला उलगडा, 30 चेंडूत 30 धावा हव्या असताना…

टी20 वर्ल्डकप स्पर्धा जिंकू आता 16 दिवसांचा कालवधी लोटला तरी त्या मागच्या गोष्टी काही संपता संपत नाहीत. रोज टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील मनोरंजक गोष्टी समोर येत आहेत.आता रोहित शर्माने दक्षिण अफ्रिकेला 30 चेंडूत 30 धावांची गरज असताना मनात काय सुरु होतं ते सांगितलं.

टी20 वर्ल्डकप फायनलमधील 'त्या' क्षणांबाबत रोहित शर्माने केला उलगडा, 30 चेंडूत 30 धावा हव्या असताना...
| Updated on: Jul 16, 2024 | 6:12 PM
Share

टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारत विरुद्ध दक्षिण अफ्रिका यांच्यात रंगला. हा सामना भारताने 7 धावांनी जिंकला. पण एक स्थिती अशी होती की, दक्षिण अफ्रिकेला 30 चेंडूत 30 धावांची आवश्यकता होती. त्यामुळे हा सामना पूर्णपणे दक्षिण अफ्रिकेच्या पारड्यात झुकला होता. त्यामुळे अशा स्थितीत डोकं शांत ठेवून योजना आखणं मोठी जबाबदारी होती. रोहित शर्मानेही जबाबदारी योग्य पद्धतीने बजावली. तसेच दक्षिण अफ्रिकेला फक्त 22 धावा करता आल्या आणि टीम इंडियाने हा सामना 7 धावांनी जिंकला. पण हेन्रिक क्लासेनची फटकेबाजी पाहता हा गमवणार असंच क्रीडाप्रेमींना वाटत होतं. त्याने अक्षर पटेलच्या गोलंदाजीची धुलाई केली. तसेच 23 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. त्यामुळे शेवटच्या पाच षटकात रोहित शर्माच्या डोक्यात नेमकं काय सुरु होतं? याबाबत त्याने स्वत:च खुलासा केला आहे.

‘हो..मी पूर्णपणे ब्लँक होतो. मी फार पुढचा विचार केला नव्हता. माझ्यासाठी त्या क्षणात कामावर लक्ष केंद्रीत करणं खूप महत्त्वाचं होतं. सर्वांना शांत ठेवून अंमलबजावणी करणं महत्त्वाचं होतं. त्यासाठी आमचा प्रयत्न सुरु होता. जेव्हा दक्षिण अफ्रिकेला 30 चेंडूत 30 धावा आवश्यक होत्या तेव्हा आम्ही खूपच तणावात होतो. पण त्या पाच षटकात आम्ही शांत असल्याचं दाखवून दिलं. आम्ही फक्त कामावर लक्ष केंद्रीत केलं. या व्यतिरिक्त आम्ही फार कसला विचार केला नव्हता. आम्ही घाबरलो नाहीत. त्यामुळे आमची बाजू भक्कम झाली.’, असं रोहित शर्माने सांगितलं.

टीम इंडियाचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहने पुन्हा एकदा कोणत्याही परिस्थितीत सामना खेचून आणू शकतो हे दाखवलं. बुमराहने त्याच्या स्पेलच्या शेवटच्या षटकात 6 धावा दिल्या आणि मार्को जानसेनची विकेट घेतली. तर अर्शदीपने फक्त 4 धावा देऊन सामन्याची रंगत वाढवली. हार्दिक पांड्याने 17व्या षटकात क्लासेनची महत्वपूर्ण विकेट घेतली. तर शेवटच्या षटकात डेविड वॉर्नरची पहिल्याच चेंडूवर विकेट घेऊन सामना भारताच्या पारड्यात पाडला. सूर्यकुमार यादवने त्याचा अप्रतिम झेल घेतला. या विजयानंतर टीम इंडियाने 11 वर्षानंतर आयसीसी चषक जिंकला.

Follow Us
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!.
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!.
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं.
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा.
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच.
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन.
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.