AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टी20 वर्ल्डकप फायनलमधील ‘त्या’ क्षणांबाबत रोहित शर्माने केला उलगडा, 30 चेंडूत 30 धावा हव्या असताना…

टी20 वर्ल्डकप स्पर्धा जिंकू आता 16 दिवसांचा कालवधी लोटला तरी त्या मागच्या गोष्टी काही संपता संपत नाहीत. रोज टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील मनोरंजक गोष्टी समोर येत आहेत.आता रोहित शर्माने दक्षिण अफ्रिकेला 30 चेंडूत 30 धावांची गरज असताना मनात काय सुरु होतं ते सांगितलं.

टी20 वर्ल्डकप फायनलमधील 'त्या' क्षणांबाबत रोहित शर्माने केला उलगडा, 30 चेंडूत 30 धावा हव्या असताना...
| Updated on: Jul 16, 2024 | 6:12 PM
Share

टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारत विरुद्ध दक्षिण अफ्रिका यांच्यात रंगला. हा सामना भारताने 7 धावांनी जिंकला. पण एक स्थिती अशी होती की, दक्षिण अफ्रिकेला 30 चेंडूत 30 धावांची आवश्यकता होती. त्यामुळे हा सामना पूर्णपणे दक्षिण अफ्रिकेच्या पारड्यात झुकला होता. त्यामुळे अशा स्थितीत डोकं शांत ठेवून योजना आखणं मोठी जबाबदारी होती. रोहित शर्मानेही जबाबदारी योग्य पद्धतीने बजावली. तसेच दक्षिण अफ्रिकेला फक्त 22 धावा करता आल्या आणि टीम इंडियाने हा सामना 7 धावांनी जिंकला. पण हेन्रिक क्लासेनची फटकेबाजी पाहता हा गमवणार असंच क्रीडाप्रेमींना वाटत होतं. त्याने अक्षर पटेलच्या गोलंदाजीची धुलाई केली. तसेच 23 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. त्यामुळे शेवटच्या पाच षटकात रोहित शर्माच्या डोक्यात नेमकं काय सुरु होतं? याबाबत त्याने स्वत:च खुलासा केला आहे.

‘हो..मी पूर्णपणे ब्लँक होतो. मी फार पुढचा विचार केला नव्हता. माझ्यासाठी त्या क्षणात कामावर लक्ष केंद्रीत करणं खूप महत्त्वाचं होतं. सर्वांना शांत ठेवून अंमलबजावणी करणं महत्त्वाचं होतं. त्यासाठी आमचा प्रयत्न सुरु होता. जेव्हा दक्षिण अफ्रिकेला 30 चेंडूत 30 धावा आवश्यक होत्या तेव्हा आम्ही खूपच तणावात होतो. पण त्या पाच षटकात आम्ही शांत असल्याचं दाखवून दिलं. आम्ही फक्त कामावर लक्ष केंद्रीत केलं. या व्यतिरिक्त आम्ही फार कसला विचार केला नव्हता. आम्ही घाबरलो नाहीत. त्यामुळे आमची बाजू भक्कम झाली.’, असं रोहित शर्माने सांगितलं.

टीम इंडियाचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहने पुन्हा एकदा कोणत्याही परिस्थितीत सामना खेचून आणू शकतो हे दाखवलं. बुमराहने त्याच्या स्पेलच्या शेवटच्या षटकात 6 धावा दिल्या आणि मार्को जानसेनची विकेट घेतली. तर अर्शदीपने फक्त 4 धावा देऊन सामन्याची रंगत वाढवली. हार्दिक पांड्याने 17व्या षटकात क्लासेनची महत्वपूर्ण विकेट घेतली. तर शेवटच्या षटकात डेविड वॉर्नरची पहिल्याच चेंडूवर विकेट घेऊन सामना भारताच्या पारड्यात पाडला. सूर्यकुमार यादवने त्याचा अप्रतिम झेल घेतला. या विजयानंतर टीम इंडियाने 11 वर्षानंतर आयसीसी चषक जिंकला.

Follow Us
सर्वोच्च न्यायालयाची NTA ला पेपरफुटीप्रकरणी कडक ताकीद, उपाययोजनांची तप
सर्वोच्च न्यायालयाची NTA ला वरंवार पेपरफुटीप्रकरणी कडक ताकीद, उपाययोजनांची तपासणी
दिशा सालियान प्रकरण अपघात म्हणून मिटलं तरी... संजय राऊतांचां दावा
दिशा सालियान प्रकरण अपघात म्हणून मिटलं तरी... संजय राऊतांच्या मोठ्या दाव्याने खळबळ
गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांचं मोठं विधान, दोन मंत्री...
गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांचं मोठं विधान, दोन मंत्र्यांना तातडीचे आदेश
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी सतीश सालियान...
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी सतीश सालियान थेट वकीलांसह 'मातोश्री'ला जाणार
ममता बॅनर्जींच्या पाठिंब्यानंतर काँग्रेस उमेदवाराला अटक, बंगाल...
ममता बॅनर्जींच्या पाठिंब्यानंतर काँग्रेस उमेदवाराला अटक, नेमकं प्रकरण काय?
विविध ठिकाणी व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध, तीव्र आंदोलनाचा इशारा
विविध ठिकाणी व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध, तीव्र आंदोलनाचा इशारा
निवडणूक आयोगाने TMC चं चिन्ह गोठवताच, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय थेट
निवडणूक आयोगाने TMC चं चिन्ह गोठताच, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय थेट.... बंगालमध्ये राजकीय हालाचाली वाढल्या?
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड