AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA: पहिला टी 20i सामना कटकमध्ये, प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोण असणार? जाणून घ्या पीच रिपोर्ट

India vs South Africa 1st T20i Playing 11 Pitch Report : कटकमधील बाराबती स्टेडियममधील खेळपट्टी फलंदाजांसाठी फायदेशीर ठरणार की गोलंदाज धमाका करणार? जाणून घ्या पीच रिपोर्ट.

IND vs SA: पहिला टी 20i सामना कटकमध्ये, प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोण असणार? जाणून घ्या पीच रिपोर्ट
IND vs SA 1st T20i Playing 11 Pitch ReportImage Credit source: PTI
| Updated on: Dec 09, 2025 | 2:36 AM
Share

टीम इंडिया सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वामध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 5 सामन्यांची टी 20i मालिका खेळण्यासाठी सज्ज आहे. टीम इंडियाने या मालिकेसाठी कंबर कसली आहे. दोन्ही संघांसाठी आगामी टी 20i वर्ल्ड कप 2026 च्या पार्श्वभूमीवर ही मालिका फार महत्त्वाची आहे. त्यामुळे दोन्ही संघांसाठी या मालिकेचं फार महत्त्व आहे. उभयसंघात या मालिकेतील पहिला सामना हा कटकमधील बाराबती स्टेडियममध्ये होणार आहे. हा सामना मंगळवारी 9 डिसेंबरला संध्याकाळी 7 वाजता सुरु होणार आहे. या सामन्यानिमित्ताने टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग ईलेव्हन कशी असेल? तसेच खेळपट्टीतून कुणाला मदत मिळेल? हे सविस्तर जाणून घेऊयात.

खेळपट्टी कुणासाठी फायदेशीर?

कटकमधील बाराबती स्टेडियममध्ये साडे 3 वर्षांनंतर टी 20i सामन्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या मैदानात अखेरीस जून 2022 साली अखेरचा टी 20i सामना खेळवण्यात आला होता. तसेच या मैदानात गेल्या सामन्यात जेव्हा भारत-दक्षिण आफ्रिका संघ भिडले होते तेव्हा गोलंदाजांचा दबदबा पाहायला मिळाला होता. या खेळीपट्टीवर खेळणं फलंदाजांसाठी आव्हानात्मक ठरणार आहे. या खेळपट्टीवर सुरुवातीला वेगवान गोलंदाजांना मदत मिळेल. तर त्यानंतर फिरकीपटूंना मदत मिळण्याची शक्यता आहे.

प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोण असणार?

सूर्यकुमार यादव टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. अभिषेक शर्मा आणि उपकर्णधार शुबमन गिल या दोघांचं ओपनिंग करणार असल्याचं जवळपास निश्चित आहे. जितेश शर्मा याला विकेटकीपर आणि बॅट्समन म्हणून संधी दिली जाऊ शकते. ऑलराउंडर हार्दिक पंड्या याचं कमबॅक निश्चित म्हटलं जात आहे. हार्दिकच्या बॅटिंगमुळे टीम इंडियाच्या बॅटिंग आणि बॉलिंगची ताकद वाढेल. हार्दिकला आशिया कप 2025 स्पर्धेत दुखापर झाली होती. हार्दिक तेव्हापासून टीम इंडियातून बाहेर होता.

अक्षर पटेल आणि कुलदीप यादव या दोघांवर फिरकीची जबाबदारी असेल. वरुण चक्रवर्ती यालाही संधी मिळू शकते. तर वेगवान गोलंदाज म्हणून अर्शदीप सिंह आणि जसप्रीत बुमराह या दोघांचा समावेश केला जाऊ शकतो.

पहिल्या टी 20i साठी टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग ईलेव्हन : अभिषेक शर्मा, शुबमन गिल (उपकर्णधार), तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कॅप्टन), जितेश शर्मा (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंह आणि जसप्रीत बुमराह.

Follow Us
पालिकेची लूटमार सुरू? नव्या गाड्यांच्या प्रस्तावावर पेडणेकर आक्रमक
Kishori Pednekar | पालिकेची लूटमार सुरू आहे का? नव्या गाड्यांच्या प्रस्तावावर किशोरी पेडणेकर आक्रमक
उद्धव ठाकरे ना मंत्री आहेत, ना आमदार तरी थेट... भाजप नेता काय म्हणाला?
उद्धव ठाकरे ना मंत्री आहेत, ना आमदार तरी थेट... राऊतांनी विचारलेल्या प्रश्नांवर भाजप नेत्याने घेरलं
भर मंचावरून केली घोषणा! अखेरचं अन् निर्णायक आंदोलन त्यानंतर...
भर मंचावरून केली घोषणा! अखेरचं अन् निर्णायक आंदोलन त्यानंतर... मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
अक्कलकोटमध्ये गुरुपौर्णिमेचा उत्साह; दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी
Solapur | अक्कलकोटमध्ये गुरुपौर्णिमेचा भक्तिमय उत्साह; स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी
काय ठरलं, CJP पुन्हा जंतर-मंतरवर उतरणार? आंदोलकांवरील...
काय ठरलं, CJP पुन्हा जंतर-मंतरवर उतरणार? आंदोलकांवरील FIR... पुन्हा प्रकरण पेटलं
16.96 लाख शेतकऱ्यांची यादी तयार; बँकांना सरकारचे थेट आदेश
कर्जमाफीत मोठा बदल! 16.96 लाख शेतकऱ्यांची यादी तयार; बँकांना सरकारचे थेट आदेश
84% पेरणी पूर्ण; खताचा तुटवडा नाही! कृषिमंत्र्यांची मोठी गुड न्यूज
Dattatray Bharne | 84% पेरणी पूर्ण; खताचा तुटवडा नाही! कृषिमंत्री दत्ता भरणेंची शेतकऱ्यांना मोठी गुड न्यूज, म्हणाले...
सगळीकडे पाणीच पाणी! हजारो क्युसेकने विसर्ग सुरु, महाराष्ट्रातील...
सगळीकडे पाणीच पाणी! हजारो क्युसेकने विसर्ग सुरु, महाराष्ट्रातील पवित्र नदीचं विक्राळ रुप
अमित शहांच्या पुणे दौऱ्याबाबत मोठी अपडेट समोर; भाजप शहराध्यक्षाचा मोठा
अमित शहांच्या पुणे दौऱ्याबाबत मोठी अपडेट समोर; भाजप शहराध्यक्षाचा मोठा निर्णय
शिंद्यांचा आणि शिक्षणाचा संबंध आहे का?; राऊतांनी सरकारला धारेवर धरलं
Sanjay Raut | शिंद्यांचा आणि शिक्षणाचा काही संबंध आहे का?; संजय राऊतांनी सरकारला धारेवरच धरलं