AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA: “गेल्या 4…”, वर्ल्ड कप विजयानंतर कॅप्टन रोहित शर्माने काय म्हटलं?

T20 World Cup Final Rohit Sharma Post Match Presentation: टीम इंडियाने रोहित शर्माच्या नेतृत्वात इतिहास रचत अखेर 17 वर्षांनी टी 20 वर्ल्ड कप जिंकत क्रिकेट चाहत्यांची प्रतिक्षा संपवली आहे. या विजयानंतर रोहित काय म्हणाला? जाणून घ्या.

IND vs SA: गेल्या 4..., वर्ल्ड कप विजयानंतर कॅप्टन रोहित शर्माने काय म्हटलं?
ind vs sa rohit sharmaImage Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Jun 30, 2024 | 2:03 AM
Share

रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाने इतिहास रचला आहे. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेवर 7 धावांनी थरारक विजय मिळवत 11 वर्षांनी आययीसी स्पर्धेतं विजेतेपद आणि 17 वर्षांनी टी 20 वर्ल्ड कप जिंकला. टीम इंडियाने सलग 8 सामने जिंकत वर्ल्ड कप ट्रॉफीवर नाव कोरलं. एका क्षणाला गमावलेल्या सामन्यात भारतीय संघाने दणक्यात कमबॅक करत दक्षिण आफ्रिकेच्या तोंडातील विजयाचा घास हिसकावून घेतला. टीम इंडियाने विराट कोहलीच्या 76 धावांच्या खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेला 177 धावांचं आव्हान दिलं होतं. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेला 20 ओव्हरमध्ये 8 बाद 169 धावांवर रोखलं. रोहित शर्माचा खेळाडू म्हणून हा दुसरा तर कर्णधार म्हणून पहिला टी 20 वर्ल्ड कप विजय ठरला. रोहित शर्मा या ऐतिहासिक विजयानंतर काय म्हणाला?जाणून घेऊयात.

रोहित शर्मा काय म्हणाला?

“गेल्या चार वर्षात आम्ही जे अनुभवले ते सांगणं खूप कठीण आहे. पडद्यामागे एक संघ म्हणून आम्ही खूप मेहनत घेतली. हे आम्ही आज जे केलंय ते एका दिवसात झालेलं नाही, त्यामागे गेल्या 4 वर्षांची मेहनत आहे. खूप दबावाखाली खेळलो. दबावाखाली काय करावं लागेल हे मुलांना (खेळाडूंना उल्लेखून) समजतं”, असं रोहितने म्हटलं.

टीम इंडिया ‘अजिंक्य’

दरम्यान टीम इंडिया या टी 20 वर्ल्ड कप 2024 मध्ये अजिंक्य राहिली. टीम इंडियाने साखळी फेरीतील 3, सुपर 8 मधील 3 सेमी फायनल असे एकूण सलग 7 सामने जिंकून फायनलमध्ये प्रवेश मिळवला. तर त्यानंतर आता दक्षिण आफ्रिकेवर मात करत वर्ल्ड कप ट्रॉफीवर नाव कोरलं. दक्षिण आफ्रिकाही या स्पर्धेत फायनलपर्यंत पोहचेपर्यंत अजिंक्य होती. मात्र अंतिम फेरी विजय मिळवून त्यांना चोकर्सचा शिक्का हटवता आला नाही.

कॅप्टन रोहितने इतिहास रचला

दक्षिण आफ्रिका प्लेइंग ईलेव्हन: क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रीझा हेंड्रिक्स, ट्रिस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅनसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, नॉर्खिया नॉर्टजे आणि तबरेझ शम्सी.

टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराह.

Follow Us
ज्या घटनेनुसार आमदार, मंत्री झाले, त्याच घटनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित
ज्या घटनेनुसार आमदार, मंत्री झाले, त्याच घटनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करता - कपिल सिब्बल
ठाकरेंची शिंदेंना सर्व पदं...कपिल सिब्बल यांचा कोर्टात 'सुप्रीम'...
ठाकरेंची शिंदेंना सर्व पदं...कपिल सिब्बल यांचा कोर्टात 'सुप्रीम' युक्तिवाद; सुनावणीत काय दाखला दिला?
ठाकरेंची शिवसेना हाच राजकीय पक्ष, सिब्बल यांचा कोर्टात सर्वात मोठा...
ठाकरेंची शिवसेना हाच राजकीय पक्ष, सिब्बल यांचा कोर्टात सर्वात मोठा युक्तिवाद!
शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीत मोठा ट्वीस्ट, निवडणुक आयोगाने...
शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीत मोठा ट्वीस्ट, आमदारांच्या अपात्रतेची वाट पाहयला... कोर्टात नेमका युक्तीवाद काय?
मी आमदारांच्या अपात्रतेबाबत... शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीत...
मी आमदारांच्या अपात्रतेबाबत... शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीच्या सुरुवातीलाच कपिल सिब्बल यांनी मांडला महत्त्वाचा मुद्दा
फडणवीसांना दिल्लीत... CM देवेंद्र फडणवीसांच्या केंद्रात जाण्याबाबत...
फडणवीसांना दिल्लीत... CM देवेंद्र फडणवीसांच्या केंद्रात जाण्याबाबत अमृता फडणवीसांच सर्वात मोठं विधान
हिंजवडीच्या वाहतूक समस्येवर आदित्य ठाकरेंचे लक्ष
आदित्य ठाकरे यांनी केली हिंजवडीतील वाहतूक कोंडी आणि मेट्रो कामाची पाहणी
संजू परब यांचे शिंदे सेना-भाजप संबंधांवर स्पष्टीकरण: वैभव नाईकांना जोर
शिंदे सेना-भाजप संघर्ष आणि निलेश राणे यांच्या कामांवरून वैभव नाईकांना प्रत्युत्तर
पुण्यातील खड्डे, औद्योगिक समस्यांचा पवारांकडून आढावा
पुण्यातील खड्डे, वाहतूक कोंडी आणि औद्योगिक समस्यांवर सुनेत्रा पवारांचे बारिक लक्ष, आढावा घेणार
नाना पटोले यांचा सरकारवर गंभीर आरोप
कुंपणच शेत खातंय.जनतेच्या पैशांची लूट, नाना पटोलेंचा घणाघात