AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सचिन तेंडुलकरने मोहम्मद सिराज असं काही सांगितलं की आनंद गगनात मावेना

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत मोहम्मद सिराजने चमकदार कामगिरी केली. त्याने या मालिकेत 23 विकेट घेतल्या. पाचव्या कसोटीत 9 विकेट घेत सामनावीराचा मानकरी ठरला. असं असताना मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने सिराजचं कौतुक केलं. त्यामुळे सिराज खूश झाला आहे.

सचिन तेंडुलकरने मोहम्मद सिराज असं काही सांगितलं की आनंद गगनात मावेना
सचिन तेंडुलकरने मोहम्मद सिराज असं काही सांगितलं की आनंद गगनात मावेनाImage Credit source: PTI
| Updated on: Aug 10, 2025 | 7:29 PM
Share

इंग्लंडविरुद्धची पाच सामन्यांची कसोटी मालिका संपून आठवडा उलटला आहे. मात्र या कसोटी मालिकेची चर्चा काही संपलेली नाही. कारण या मालिकेपूर्वी भारत 4-0 ने पराभूत होईल वगैरे अशी भाकीतं वर्तवली जात होती. मात्र भारताने ही मालिका 2-2 ने बरोबरीत सोडवली. लॉर्ड कसोटीत 22 धावांनी पराभव झाला नसता तर कदाचित ही मालिका खिशात घातली असती. या मालिकेत मोहम्मद सिराज हा हिरो ठरला. कारण त्याने जसप्रीत बुमराहच्या गैरहजेरीत भेदक गोलंदाजीचं दर्शन घडवलं. या मालिकेत त्याने एकूण 23 विकेट घेतल्या. पाचव्या कसोटी सामन्यात त्याच्या गोलंदाजीला धार चढली होती. मोहम्मद सिराजने कसोटी कारकि‍र्दीत पहिल्यांदाच सर्वाधिक विकेट घेण्याचा मान मिळवला आहे. त्याच्या या कामगिरीचं सर्वत्र कौतुक होत आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यानेही त्याचं कौतुक केलं. सचिन तेंडुलकरने कौतुक केल्यानंतर मोहम्मद सिराजही खूश झाला.

सचिन तेंडुलकर नेमकं काय म्हणाला?

100MB या एक्स खात्यावर एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. त्यात सचिन तेंडुलकर सिराजचं कौतुक करत आहे. त्याने सांगितलं की, ‘त्याने जबरदस्त कामगिरी केली. मला त्याचा हेतू आवडला. त्याच्यात ऊर्जा होती. ती पाहून मी खूश झालो. जर तुम्ही स्कोअर कार्डकडे पाहीलं नाही आणि सिराजची बॉडी लँग्वेज पाहिली तर तुम्हाला वाटत नाही की त्याने 5 विकेट घेतल्या किंवा एकही विकेट घेतली नाही.’ या व्हिडिओला उत्तर देताना सिराजने लिहिले, “धन्यवाद सर.”

पाचव्या कसोटी सामन्यात सिराजमुळे विजय शक्य

पाचव्या कसोटी सामन्यात एक वेळ अशी होती की इंग्लंड सहज जिंकेल. अशा स्थितीतून भारताने हा सामना जिंकला आहे. सिराजने दुसऱ्या डावात 5 गडी बाद केले. तेही आशा स्थितीत जेव्हा भारताला खरंच गरज होती. खेळाच्या शेवटच्या दिवशी इंग्लंडला विजयासाठी फक्त 35 धावांची आवश्यकता होती आणि त्यांच्याकडे चार विकेट्स शिल्लक होत्या. त्यामुळे हा सामना पूर्णपणे इंग्लंडच्या पारड्यात झुकलेला होता. पण सिराजने यापैकी तीन विकेट्स घेतल्या आणि भारताला विजय मिळवून दिला.

Follow Us
आरोपीला आमच्या ताब्यात द्या अन्... नागरिकांची संतप्त मगाणी, पुण्यात...
आरोपीला आमच्या ताब्यात द्या अन्... नागरिकांची संतप्त मगाणी, पुण्यात....
कोल्हापुरातील आंबाबाई मंदिर परिसर भाविकांनी गजबजला
कोल्हापुरातील आंबाबाई मंदिर परिसर भाविकांनी गजबजला.
इयत्ता बारावीचा गेल्या वर्षीपेक्षा या वर्षीचा एकूण निकाल कमी, किती टक्
इयत्ता बारावीचा गेल्या वर्षीपेक्षा या वर्षीचा एकूण निकाल कमी, किती टक्.
इयत्ता बारावीचा निकाल जाहीर; कोकण विभागाचा दबदबा कायम, तर कमी निकाल...
इयत्ता बारावीचा निकाल जाहीर; कोकण विभागाचा दबदबा कायम, तर कमी निकाल....
पुणे हादरलं! 4 वर्षांच्या चिमूरडीवर लैंगिक अत्याचार, अंगावर काटा आणणाऱ
पुणे हादरलं! 4 वर्षांच्या चिमूरडीवर लैंगिक अत्याचार, अंगावर काटा आणणाऱ.
3 जिल्हे, एकच सर्जन? शस्रक्रियेनंतर महिलेसोबत नेमकं झालं काय?
3 जिल्हे, एकच सर्जन? शस्रक्रियेनंतर महिलेसोबत नेमकं झालं काय?.
चकित करणारे आकडे, अंबादास दानवे, नीलम गोऱ्हे अन् सिद्दीकींच्या संपत्ती
चकित करणारे आकडे, अंबादास दानवे, नीलम गोऱ्हे अन् सिद्दीकींच्या संपत्ती.
11 वाजता बोर्डाची पत्रकार परिषद; तर बारावीचा निकाल आज दुपारी....
11 वाजता बोर्डाची पत्रकार परिषद; तर बारावीचा निकाल आज दुपारी.....
सर्वसामान्यांना महागाईची झळ; गॅसनंतर आता पेट्रोल-डिझेलही महागणार?
सर्वसामान्यांना महागाईची झळ; गॅसनंतर आता पेट्रोल-डिझेलही महागणार?.
महागाईचा फटका! एलपीजी गॅसची किंमत वाढली, किंमत 3000 च्या पुढे...
महागाईचा फटका! एलपीजी गॅसची किंमत वाढली, किंमत 3000 च्या पुढे....