AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup 2021: एखादा चमत्कारच भारताला सेमीफायनलमध्ये पोहोचवू शकतो, शाहीद आफ्रिदीची कोपरखळी

विश्वचषकात सलगच्या दुसऱ्या पराभवानंतर सर्वच स्तरातून भारतीय क्रिकेट संघावर टीका होत आहेत. यातच पाकिस्तानचा माजी खेळाडू शाहीदही मागे राहिलेला नाही.

T20 World Cup 2021: एखादा चमत्कारच भारताला सेमीफायनलमध्ये पोहोचवू शकतो, शाहीद आफ्रिदीची कोपरखळी
शाहिद आफ्रिदी
| Edited By: | Updated on: Nov 01, 2021 | 3:55 PM
Share

मुंबई : अव्वल दर्जाच्या खेळाडूंनी भरलेला भारतीय क्रिकेट संघ यंदाच्या टी20 विश्वचषकात मैदानावर मात्र पूरता अपयशी ठरतोय. भारतीय संघासाठी यंदाचा टी-20 विश्वचषक (T20 World Cup) अतिशय निराशाजनक सुरु आहे.पहिल्या सामन्यात पाकिस्तानने 10 विकेट्सनी मात दिल्यानंतर दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने 8 विकेट्सनी भारताला पराभूत केलं आहे. त्यामुळे भारताचं उपांत्य फेरीचं स्वप्नही जवळपास धुळीस मिळालं आहे. ज्यामुळे सर्वचजण भारतीय संघावर टीका करत असून पाकिस्तानचे माजी खेळाडू कुठे मागे राहणार आहेत.

पाकचा माजी ऑलराऊंडर शाहीद आफ्रिदीने (Shahid Afridi) भारतीय संघाला मजेशीर पद्धतीने हिणवताना, ‘भारताचं पुढील फेरीत पोहोचणं एक चमत्कारच असेल’. असं म्हटलं आहे. शाहीदने त्याच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ट्विट करत ही प्रतिक्रिया दिली आहे. यामध्ये त्याने भारत सेमीफायनलमध्ये पोहचण्याची आशा अजूनही कायम आहे, पण त्यांनी मोठे दोन सामने गमावल्यामुळे आता त्यांच पुढे पोहोचणं म्हणजे एक चमत्कारच असू शकतो., असं लिहिलं आहे.

असा जाऊ शकतो भारत सेमीफायनलमध्ये

भारताने सलग दोन मॅच गमावल्यामुळे गुणतालिकेत भारत पाचव्या स्थानावर गेला आहे. त्यामुळे सेमीफायनलमध्ये भारताचं पोहोचणं अवघड झालं असलं तरी क्रिकेट हा एक खेळ असल्याने यामध्ये काहीही होऊ शकतं. भारताचे पुढील सामने अफगाणिस्तान, स्कॉटलंड आणि नामीबिया या संघाविरुद्ध आहेत. या सामन्यांमध्ये भारताला मोठ्या फरकाने विजय मिळवून नेट-रनरेट खूप वाढवावा लागेल. किमान 100 धावांच्या फरकाने सामने जिंकणे भारताला गरजेचे आहे. दुसरीकडे न्यूझीलंडचा संघ स्कॉटलंड आणि नामीबिया संघाविरुद्ध अगदी छोट्या फरकाने पराभूत होणं गरजेचं आहे. तसचं सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे न्यूझीलंडला अफगाणिस्तानकडून पराभव स्वीकारावा लागणं गरजेचं आहे. हे सार फार अवघड असलं तरी हा खेळ असल्याने काहीही होऊ शकतं हे नक्की.

इतर बातम्या

T20 World Cup 2021: 2 पराभवानंतरही भारताची सेमी-फायनलची आशा शिल्लक, वाचा कशी?

लाईव्ह मॅचदरम्यान विराट कोहलीने मारली पलटी, पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात ज्याचं कौतुक केलं त्याचीच उडवली थट्टा

IND vs NZ: अश्विनला Playing XI मध्ये स्थान न देणाऱ्या कोहलीचा बुमराहकडून बचाव, सांगितलं संधी न देण्याचं कारण

(Shahid Afridi says it will be miracle if team india will reach to semi final in t20 world cup)

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.