AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लाज वाटली पाहिजे, मोहम्मद शमीने पाकिस्तानच्या माजी खेळाडूला असा झापला

World Cup 2023 : पाकिस्तानच्या माजी खेळाडूला भारताचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमीने चांगलेच फटकारले आहे. शमीने आपल्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहिली आहे. ज्यामध्ये तो पाकिस्तानच्या खेळाडूची लाज काढत आहे. त्याची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.

लाज वाटली पाहिजे, मोहम्मद शमीने पाकिस्तानच्या माजी खेळाडूला असा झापला
Shami on hasan raza
| Updated on: Nov 09, 2023 | 4:21 PM
Share

Shami on hasan raza : भारतीय खेळाडू वर्ल्डकप 2023 मध्ये उत्तम कामगिरी करत आहेत. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू हसन रझा याने भारतीय गोलंदाजांना वेगळे चेंडू दिले जात असल्याचा आरोप केला होता. त्यामुळेच भारतीय गोलंदाज चांगली कामगिरी इतर असल्याचा आरोप त्याने केला होता. भारतीय गोलंदाज सध्या वर्ल्डकपमध्ये चांगली कामगिरी करत आहे. त्या जोरावर भारताने आठही सामने जिंकले आहेत. यावर हसन रझा म्हणाला होता की, भारतीय गोलंदाजांना खास चेंडू दिले जात आहेत त्यामुळे त्यांची कामगिरी अप्रतिम आहे.

माजी पाकिस्तानी खेळाडूच्या या विधानावर टीका होत असताना आता माजी दिग्गज पाकिस्तानी गोलंदाज वसीम अक्रमनेही हसन रझा यांचे विधान चुकीचे असल्याचे म्हटले होते. यावर आता भारतीय गोलंदाज मोहम्मद शमीने देखील हसन रझा याला उत्तर दिले आहे.

इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करून मोहम्मद शमीने पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूला चांगलेच झापले आहे. शमीने लिहिले, “लाज वाटली, यार, खेळावर लक्ष केंद्रित कर आणि मूर्खपणावर नाही… कधीतरी इतरांच्या यशाचा आनंद घ्या. शिट यार, हा आयसीसी विश्वचषक आहे, तुझी स्थानिक स्पर्धा नाही. तू खेळाडू होतास? वसीम भाई. तेव्हाही मी समजावले होते… हाहाहाहा… तुझावर वसीम अक्रमचाही विश्वास नाही.”

शमीची ही पोस्ट आता सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. या विश्वचषकात मोहम्मद शमीने अप्रतिम गोलंदाजी केली आहे आणि 4 सामन्यात 16 विकेट्स घेण्यात यश मिळवले आहे. शमी विश्वचषकाच्या इतिहासात भारताकडून सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनला आहे. शमीने आतापर्यंत विश्वचषकात भारताकडून एकूण 47 विकेट्स घेतल्या आहेत.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.